शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

नोटबंदीसारख्या रांगा देशात पुन्हा लागाव्यात हीच सरकारची इच्छा- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 23:26 IST

गरीब, मोलमजुरी करणारे 30-35 वर्षे जुनी कागदपत्रं कुठून आणणार; प्रियंका गांधींचा सवाल

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशातलं वातावरण पेटलं आहे. अनेक राज्यांमध्ये आंदोलनांना हिंसक वळण लागल्यानंतर राजकीय पक्षदेखील सक्रीय झाले आहेत. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी नव्या कायद्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधींनी इंडिया गेट परिसरात दाखल होत आंदोलनात सहभागी नोंदवत मोदी सरकारवर तोफ डागली. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी गरिबांच्या विरोधात आहे. देशातील गरीब जनतेला नव्या कायद्यांचा सर्वाधिक फटका बसणार आहे. अशा परिस्थितीत मोलमजुरांनी काय करायचं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनता ३०-३५ वर्ष जुनी कागदपत्रं कशी दाखवणार? मोदी सरकार देशाला कोणती परिस्थिती निर्माण करू पाहात आहे?, असे प्रश्न त्यांनी विचारले. नोटबंदीवेळी देशातील जनता रांगेत उभी राहिली होती. आताही त्याचप्रकारे देश रांगेत उभा राहावा, असं सरकारला वाटतं, अशा शब्दांत प्रियंका गांधींनी केंद्राला लक्ष्य केलं. नव्या कायद्यांचा फटका केवळ गरिबांना बसेल, असं प्रियंका म्हणाल्या. श्रीमंत माणसं त्यांच्याकडे असणारा पासपोर्ट दाखवतील. मात्र गरीब, मोलमजुरी करुन जगणारे काय करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नव्या कायद्याविरोधातलं आंदोलन शांततेच्या मार्गानंच सुरू ठेवा, असं आवाहनदेखील यावेळी त्यांनी आंदोलकांना केलं. प्रियंका यांच्या आधी सोनिया गांधींनीदेखील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. जनतेला सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मात्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा आवाज क्रूरपणे दाबत आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी आपल्या व्हिडीओ संदेशातून केला.भाजपाचं सरकार देशभरातील विद्यार्थी आणि जनतेकडून करण्यात येत असलेलं आंदोलन ज्या प्रकारे दाबत आहे, ते पाहून काँग्रेस पक्ष चिंतीत झाला आहे. देशभरातील विद्यापीठं, आयआयटी, आयआयएम आणि अन्य आघाडीच्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी भाजपा सरकारच्या फुटिरतावादी आणि लोकविरोधी धोरणांविरोधात उत्स्फूर्तपणे आंदोलनं करत आहेत. लोकशाहीमध्ये चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवण्याचा आणि चिंता व्यक्त करण्याचा नागरिकांना हक्क आहे. लोकांचं म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मनातील शंकांचं निरसन करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं सोनिया गांधी भाजपा सरकारवर बरसल्या. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधीDemonetisationनिश्चलनीकरण