शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारने चर्चेच्या दिवसाची वाट पाहिली, दहशतवाद्यांना आधीच मारता आले असतं"; सपा खासदाराचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:49 IST

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केल्याच्या वृत्तावरुन समाजवादी पक्षाच्या खासदाराने सरकारला सवाल विचारला आहे.

Ramashankar Rajbhar on Operation Sindoor: ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याने सोमवारी श्रीनगरच्या लिडवास भागात लपलेल्या ३ दहशतवाद्यांना ठार केले. ऑपरेशन महादेवमध्ये संयुक्त कारवाईत एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी मुसा याला भारतीय सैन्याने संयुक्त कारवाईत ठार मारले आहे. दुसरीकडे संसदेतही पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला आज सुरुवात झाली. मात्र ही चर्चा सुरु होण्याच्या दिवशीच या दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात आल्याने समाजवादी पक्षाच्या खासदाराने शंका उपस्थित केली आहे.

सोमवारी लोकसभेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, सपा खासदार रामशंकर राजभर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशाला ऑपरेशन सिंदूरची नाही तर 'ऑपरेशन तंदूर'ची आवश्यकता होती. या अंतर्गत दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देऊन तंदूरमध्ये टाकले गेले असते, असं विधान रामशंकर राजभर यांनी केलं. पहलगाम हल्ल्यानंतर देशात प्रचंड संताप होता आणि जनतेला तीन दिवसांत दहशतवाद्यांवर कठोर कारवाई हवी होती. पण सरकारने १७ दिवसांनंतर कारवाई सुरू केली, असंही राजभर म्हणाले. तसेच पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी मारल्या गेलेल्या १०० दहशतवाद्यांमध्ये होते का? असाही सवाल राजभर यांनी केला.

"पहलगाम हल्ला हा भारतात दंगली पसरवण्याचा कट होता. पण हिंदू-मुस्लिमांमध्ये असलेल्या ऐक्याने शत्रूचा प्रत्येक कट हाणून पाडला. एकता  भारताची सर्वात मोठी ताकद आहे आणि जातीय सलोखाच देशाला मजबूत ठेवू शकतो," असं सपा खासदाराने म्हटलं. तसेच "ट्रम्प यांनी सार्वजनिक व्यासपीठांवर २६ वेळा दावा केला की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेने शस्त्रास्त्र विक्री केल्यामुळे दक्षिण आशियातील तणाव कमी झाला आहे असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. जर ट्रम्प यांचा दावा बरोबर असेल तर भारताची भूमिका काय होती?," असं रामशंकर राजभर म्हणाले.

दरम्यान, संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना राजभर यांनी लष्कराच्या कारवाईवरुन भाष्य केलं. "आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली, म्हणूनच पहलगामचे दहशतवादी मारले गेले. जर ही चर्चा आधी झाली असती तर हे दहशतवादी आधीच मारले गेले असते. सरकार खूप हुशारीने काम करते. असे दिसते की सरकार चर्चेच्या दिवसाची वाट पाहत होते. संरक्षणमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की आम्ही १०० दहशतवाद्यांना ठार मारले आहे आणि त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पण या देशाला हे जाणून घ्यायचे होते की ते चार दहशतवादी मारले गेले की नाही. सरकार खूप हुशार आहे. जर आज दहशतवादी मारले गेले असतील तर संरक्षणमंत्र्यांनी तसे सांगायला हवे होते, पण त्यांनी हे घडल्याचे सभागृहाला सांगितले नाही," असेही रामशंकर राजभर यांनी म्हटलं.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानRajnath Singhराजनाथ सिंहSamajwadi Partyसमाजवादी पार्टी