शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

"सरकारने चर्चेच्या दिवसाची वाट पाहिली, दहशतवाद्यांना आधीच मारता आले असतं"; सपा खासदाराचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:49 IST

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केल्याच्या वृत्तावरुन समाजवादी पक्षाच्या खासदाराने सरकारला सवाल विचारला आहे.

Ramashankar Rajbhar on Operation Sindoor: ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याने सोमवारी श्रीनगरच्या लिडवास भागात लपलेल्या ३ दहशतवाद्यांना ठार केले. ऑपरेशन महादेवमध्ये संयुक्त कारवाईत एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी मुसा याला भारतीय सैन्याने संयुक्त कारवाईत ठार मारले आहे. दुसरीकडे संसदेतही पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला आज सुरुवात झाली. मात्र ही चर्चा सुरु होण्याच्या दिवशीच या दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात आल्याने समाजवादी पक्षाच्या खासदाराने शंका उपस्थित केली आहे.

सोमवारी लोकसभेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, सपा खासदार रामशंकर राजभर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशाला ऑपरेशन सिंदूरची नाही तर 'ऑपरेशन तंदूर'ची आवश्यकता होती. या अंतर्गत दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देऊन तंदूरमध्ये टाकले गेले असते, असं विधान रामशंकर राजभर यांनी केलं. पहलगाम हल्ल्यानंतर देशात प्रचंड संताप होता आणि जनतेला तीन दिवसांत दहशतवाद्यांवर कठोर कारवाई हवी होती. पण सरकारने १७ दिवसांनंतर कारवाई सुरू केली, असंही राजभर म्हणाले. तसेच पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी मारल्या गेलेल्या १०० दहशतवाद्यांमध्ये होते का? असाही सवाल राजभर यांनी केला.

"पहलगाम हल्ला हा भारतात दंगली पसरवण्याचा कट होता. पण हिंदू-मुस्लिमांमध्ये असलेल्या ऐक्याने शत्रूचा प्रत्येक कट हाणून पाडला. एकता  भारताची सर्वात मोठी ताकद आहे आणि जातीय सलोखाच देशाला मजबूत ठेवू शकतो," असं सपा खासदाराने म्हटलं. तसेच "ट्रम्प यांनी सार्वजनिक व्यासपीठांवर २६ वेळा दावा केला की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेने शस्त्रास्त्र विक्री केल्यामुळे दक्षिण आशियातील तणाव कमी झाला आहे असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. जर ट्रम्प यांचा दावा बरोबर असेल तर भारताची भूमिका काय होती?," असं रामशंकर राजभर म्हणाले.

दरम्यान, संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना राजभर यांनी लष्कराच्या कारवाईवरुन भाष्य केलं. "आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली, म्हणूनच पहलगामचे दहशतवादी मारले गेले. जर ही चर्चा आधी झाली असती तर हे दहशतवादी आधीच मारले गेले असते. सरकार खूप हुशारीने काम करते. असे दिसते की सरकार चर्चेच्या दिवसाची वाट पाहत होते. संरक्षणमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की आम्ही १०० दहशतवाद्यांना ठार मारले आहे आणि त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पण या देशाला हे जाणून घ्यायचे होते की ते चार दहशतवादी मारले गेले की नाही. सरकार खूप हुशार आहे. जर आज दहशतवादी मारले गेले असतील तर संरक्षणमंत्र्यांनी तसे सांगायला हवे होते, पण त्यांनी हे घडल्याचे सभागृहाला सांगितले नाही," असेही रामशंकर राजभर यांनी म्हटलं.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानRajnath Singhराजनाथ सिंहSamajwadi Partyसमाजवादी पार्टी