शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

"सरकारने चर्चेच्या दिवसाची वाट पाहिली, दहशतवाद्यांना आधीच मारता आले असतं"; सपा खासदाराचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:49 IST

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केल्याच्या वृत्तावरुन समाजवादी पक्षाच्या खासदाराने सरकारला सवाल विचारला आहे.

Ramashankar Rajbhar on Operation Sindoor: ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सैन्याने सोमवारी श्रीनगरच्या लिडवास भागात लपलेल्या ३ दहशतवाद्यांना ठार केले. ऑपरेशन महादेवमध्ये संयुक्त कारवाईत एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी मुसा याला भारतीय सैन्याने संयुक्त कारवाईत ठार मारले आहे. दुसरीकडे संसदेतही पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला आज सुरुवात झाली. मात्र ही चर्चा सुरु होण्याच्या दिवशीच या दहशतावाद्यांचा खात्मा करण्यात आल्याने समाजवादी पक्षाच्या खासदाराने शंका उपस्थित केली आहे.

सोमवारी लोकसभेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान, सपा खासदार रामशंकर राजभर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशाला ऑपरेशन सिंदूरची नाही तर 'ऑपरेशन तंदूर'ची आवश्यकता होती. या अंतर्गत दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देऊन तंदूरमध्ये टाकले गेले असते, असं विधान रामशंकर राजभर यांनी केलं. पहलगाम हल्ल्यानंतर देशात प्रचंड संताप होता आणि जनतेला तीन दिवसांत दहशतवाद्यांवर कठोर कारवाई हवी होती. पण सरकारने १७ दिवसांनंतर कारवाई सुरू केली, असंही राजभर म्हणाले. तसेच पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी मारल्या गेलेल्या १०० दहशतवाद्यांमध्ये होते का? असाही सवाल राजभर यांनी केला.

"पहलगाम हल्ला हा भारतात दंगली पसरवण्याचा कट होता. पण हिंदू-मुस्लिमांमध्ये असलेल्या ऐक्याने शत्रूचा प्रत्येक कट हाणून पाडला. एकता  भारताची सर्वात मोठी ताकद आहे आणि जातीय सलोखाच देशाला मजबूत ठेवू शकतो," असं सपा खासदाराने म्हटलं. तसेच "ट्रम्प यांनी सार्वजनिक व्यासपीठांवर २६ वेळा दावा केला की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेने शस्त्रास्त्र विक्री केल्यामुळे दक्षिण आशियातील तणाव कमी झाला आहे असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. जर ट्रम्प यांचा दावा बरोबर असेल तर भारताची भूमिका काय होती?," असं रामशंकर राजभर म्हणाले.

दरम्यान, संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना राजभर यांनी लष्कराच्या कारवाईवरुन भाष्य केलं. "आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली, म्हणूनच पहलगामचे दहशतवादी मारले गेले. जर ही चर्चा आधी झाली असती तर हे दहशतवादी आधीच मारले गेले असते. सरकार खूप हुशारीने काम करते. असे दिसते की सरकार चर्चेच्या दिवसाची वाट पाहत होते. संरक्षणमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की आम्ही १०० दहशतवाद्यांना ठार मारले आहे आणि त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पण या देशाला हे जाणून घ्यायचे होते की ते चार दहशतवादी मारले गेले की नाही. सरकार खूप हुशार आहे. जर आज दहशतवादी मारले गेले असतील तर संरक्षणमंत्र्यांनी तसे सांगायला हवे होते, पण त्यांनी हे घडल्याचे सभागृहाला सांगितले नाही," असेही रामशंकर राजभर यांनी म्हटलं.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानRajnath Singhराजनाथ सिंहSamajwadi Partyसमाजवादी पार्टी