शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

पुन्हा सरकार विरुद्ध शेतकरी?; शेतकऱ्यांचे आजपासून लखीमपूर खिरीमध्ये आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 7:40 AM

केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना या समितीमध्ये ३ सदस्य नामनिर्देशित करण्याचा आग्रह केला होता.

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरून केंद्र सरकार कृषी सुधारणांबाबत गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक घेण्याची तयारी करीत असतानाच शेतकरी गुरुवारपासून आणखी एक आंदोलन सुरू करीत आहेत. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते जयंत चौधरी राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त किसान मोर्चा गुरुवारी सकाळी तीन दिवसांसाठी लखीमपूर खिरीमध्ये महापंचायत घेणार आहे. जिल्हे, राज्यांमध्ये आंदोलन केल्यानंतर किसान पंचायत दोन ऑक्टोबर रोजी दिल्लीत विशाल निदर्शने करणार आहे.

मागील वर्षी २ ऑक्टोबर रोजीच केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष याने लखीमपूर खिरीमध्ये शेतकऱ्यांवर वाहन चालविले होते. यात चार शेतकरी ठार झाले होते. यानंतर काही कालावधीत केंद्र सरकारने तीन वादग्रस्त कृषी कायदे परत घेतले होते. आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यापासून ते गुन्हे मागे घेण्याची घोषणाही केली होती. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशावरून कृषी सुधारणांसाठी समिती गठित केली होती. मात्र त्यानंतर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

ना भरपाई मिळाली, ना गुन्हे परत घेतले

केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना या समितीमध्ये ३ सदस्य नामनिर्देशित करण्याचा आग्रह केला होता; परंतु संयुक्त किसान मोर्चाने या समितीत सहभागी होण्यास नकार दिला होता. या समितीत सर्व सरकारी सदस्य आहेत व ते आमच्या प्रतिनिधींचा आवाज दाबून टाकतील, असे कारण त्यांनी पुढे केले होते. अजय मिश्रा टेनी यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेली नाही. आजवर ना शेतकऱ्यांना भरपाई मिळाली ना सर्व आंदोलकांवरील राजकीय गुन्हे परत घेतले. अशा स्थितीत आणखी एक आंदोलन करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही. - राकेश टिकैत, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपrakesh tikaitराकेश टिकैत