शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अचानक कुठे गेल्या ATM मधल्या नोटा?; अर्थमंत्री जेटलींनी सांगितलं कशा फुटल्या वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 13:10 IST

नोटांच्या तुटवड्यावर जेटलींचं स्पष्टीकरण

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर एटीएममध्ये जसा खडखडाट झाला होता, तसंच चित्र देशाच्या अनेक भागांत दिसू लागल्यानं आश्चर्य आणि चिंता व्यक्त होतेय. एटीएममधल्या नोटा गेल्या कुठे?, असा प्रश्न विचारला जातोय. परंतु, या चलनचणचणीमागे कुठलाही गडबड-घोटाळा नसल्याचा खुलासा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या रोख रकमेचा तुटवडा जाणवतो आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. 'देशातील काही भागांमध्ये रोख रकमेची मागणी जास्त असल्यानं इतर भागांमध्ये चणचण जाणवी लागली आहे. देशातील बाजारात सध्या गरजेपेक्षा जास्त रक्कम उपलब्ध आहे,' असं जेटलींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री प्रसाद शुक्ल यांनी नोटांचा तुटवडा तीन दिवसांमध्ये संपुष्टात येईल, अशी माहिती दिली. 'काही भागांमध्ये नोटांची चणचण जाणवत आहे. नोटांचा तुटवडा असलेल्या भागांमध्ये लवकरच चलन पुरवठा केला जाईल,' असं शुक्ल यांनी सांगितलं. 'सध्याच्या घडीला आमच्याकडे 1 लाख 25 हजार कोटी रुपयांची रोकड आहे. काही राज्यांमध्ये जास्त रोकड असल्यानं समतोल बिघडला आहे. त्यामुळेच सरकारनं राज्य स्तरावर एक समिती स्थापना केली आहे,' अशी माहितीही त्यांनी दिली. नोटांची कमतरता असलेल्या भागांमध्ये तीन दिवसांमध्ये नोटांचा पुरवठा केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात गेल्या आठवड्यापासून रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रोकड नेमकी गेली कुठे?, असा प्रश्न लोकांना पडला आहे. दोन हजारांच्या नोटादेखील बाजारातून अचानक गायब झाल्यानं पुन्हा एकदा साठेबाजी सुरू झाली का, असा संशयदेखील व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीदेखील याबद्दल शंका उपस्थित करत यामागे कटकारस्थान असल्याची शक्यता वर्तवली आहेत. 

टॅग्स :atmएटीएमArun Jaitleyअरूण जेटली