पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सरकार- न्यू २
By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:18+5:302015-08-16T23:44:18+5:30
मौदा उपविभागात १ हजार २२३ घरे क्षतिग्रस्त झाली आहे. या घराच्या स्थलांतरापोटी २८ हजार २५० लोकांना २ कोटी ८५ लाख रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. सावनेर उपविभागात ६१२ घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी १ हजार ५८८ लोकांना २७ लाख रुपयाची खावटी मंजूर करण्यात आली आहे. पारशिवनी तालुक्यात ३ हजार ४२८ लोकांना खावटी मंजूर करण्यात आली आहे. ३१६ घरे क्षतिग्रस्त झाल्याचा अंदाज आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सरकार- न्यू २
म दा उपविभागात १ हजार २२३ घरे क्षतिग्रस्त झाली आहे. या घराच्या स्थलांतरापोटी २८ हजार २५० लोकांना २ कोटी ८५ लाख रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. सावनेर उपविभागात ६१२ घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी १ हजार ५८८ लोकांना २७ लाख रुपयाची खावटी मंजूर करण्यात आली आहे. पारशिवनी तालुक्यात ३ हजार ४२८ लोकांना खावटी मंजूर करण्यात आली आहे. ३१६ घरे क्षतिग्रस्त झाल्याचा अंदाज आहे. चौकट... २६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान जिल्ह्यात २६ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टी व पुराचा तडाखा बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यात सावनेर तालुक्यातील ११ हजार ४६९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.