शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

Asaduddin Owaisi : "यूपीमध्ये बंदुकीच्या जोरावर सरकार चालतं"; ओवेसींनी केली CM योगींच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 10:30 IST

Asaduddin Owaisi And Yogi Adityanath : यूपी सरकारवर हल्लाबोल करताना ओवेसी म्हणाले, "ही हत्या यूपी पोलिसांच्या उपस्थितीत झाली आहे. अतिरेकी वाढत आहेत."

प्रयागराजमध्ये तीन हल्लेखोरांनी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांच्या उपस्थितीत गोळ्या झाडून हत्या केली. या हत्याकांडावर आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार कायद्यानुसार चालत नाही, तर बंदुकीच्या जोरावर चालत असल्याचं म्हणत त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे लोकांचा संविधानावरील विश्वास कमी होईल आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी शब्द नाहीत, असे ओवेसी म्हणाले.

मीडियाशी बोलताना ओवेसी म्हणाले की, 'कोर्टाच्या माध्यमातून पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना शिक्षा दिली आहे. काल झालेला मर्डर पाहून संविधानावर विश्वास ठेवणारा प्रत्येक भारतीय नागरिक आज स्वतःला कमकुवत समजत आहे. काल घडलेली ही घटना हैराण करणारी आहे. तो ज्या पद्धतीने शस्त्र वापरतो, तो व्यावसायिक गुन्हेगारासारखा कसा वापरतो ते तुम्ही पाहा. मी स्वसंरक्षणासाठी शस्त्रे वापरायलाही शिकलो आहे. गोळीबार करताना त्याचा हातही हलत नाही. हे लोक प्रोफेशनल आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने चौकशी करावी

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येची सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशी करण्याची मागणी करत ओवेसी म्हणाले, 'यामध्ये उत्तर प्रदेशच्या भाजपा सरकारची भूमिका काय आहे, पोलीस आणि मीडियाच्या उपस्थितीत कोल्ड ब्लडेड मर्डर करणारे हे लोक कोण आहेत? याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हायला हवी. मी न्यायालयाला विनंती करतो की या प्रकरणाची स्वतःहून चौकशी करावी. त्यांनी समिती स्थापन केली. एक तपास पथक तयार करा आणि कालबद्ध तपास करा, ज्यामध्ये यूपीचा कोणताही अधिकारी नसावा. तपास वेळेत पूर्ण झाला पाहिजे. ते लोक तिथे कसे घुसले आणि पोलिसांनी त्यांना का रोखले नाही, हे कोणालाच सांगता येत नाही.

"योगींनी राजीनामा द्यावा"

यूपी सरकारवर हल्लाबोल करताना ओवेसी म्हणाले, "ही हत्या यूपी पोलिसांच्या उपस्थितीत झाली आहे. अतिरेकी वाढत आहेत. काल खून करणारे हे कोण आहेत, जर त्यांचा यूपी सरकारशी संबंध नाही, तर ते कट्टरपंथी कसे झाले. त्याचा हात पाहा, तो हात न हलवता कसा सतत गोळीबार करत होता. जो शूटिंग करताना धार्मिक घोषणा देतो. भाजपची सत्ता आहे, उद्या दुसरा कोणी असेल, मग काय होईल... न्यायालय शिक्षा देईल तेव्हा आनंद साजरा करा. सगळ्यांना गोळ्या घातल्या तर कोर्ट काय करणार? इंदिरा गांधी, बेअंत सिंह, महात्मा गांधी, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यूपीच्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. काल झालेल्या हत्येची जबाबदारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यांच्यात घटनात्मक नैतिकता जिवंत असेल, तर त्यांना पद सोडावे लागेल, त्यांनी राजीनामा द्यावा." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीyogi adityanathयोगी आदित्यनाथCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश