शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

Asaduddin Owaisi : "यूपीमध्ये बंदुकीच्या जोरावर सरकार चालतं"; ओवेसींनी केली CM योगींच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 10:30 IST

Asaduddin Owaisi And Yogi Adityanath : यूपी सरकारवर हल्लाबोल करताना ओवेसी म्हणाले, "ही हत्या यूपी पोलिसांच्या उपस्थितीत झाली आहे. अतिरेकी वाढत आहेत."

प्रयागराजमध्ये तीन हल्लेखोरांनी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांच्या उपस्थितीत गोळ्या झाडून हत्या केली. या हत्याकांडावर आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार कायद्यानुसार चालत नाही, तर बंदुकीच्या जोरावर चालत असल्याचं म्हणत त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे लोकांचा संविधानावरील विश्वास कमी होईल आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी शब्द नाहीत, असे ओवेसी म्हणाले.

मीडियाशी बोलताना ओवेसी म्हणाले की, 'कोर्टाच्या माध्यमातून पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना शिक्षा दिली आहे. काल झालेला मर्डर पाहून संविधानावर विश्वास ठेवणारा प्रत्येक भारतीय नागरिक आज स्वतःला कमकुवत समजत आहे. काल घडलेली ही घटना हैराण करणारी आहे. तो ज्या पद्धतीने शस्त्र वापरतो, तो व्यावसायिक गुन्हेगारासारखा कसा वापरतो ते तुम्ही पाहा. मी स्वसंरक्षणासाठी शस्त्रे वापरायलाही शिकलो आहे. गोळीबार करताना त्याचा हातही हलत नाही. हे लोक प्रोफेशनल आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने चौकशी करावी

अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येची सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशी करण्याची मागणी करत ओवेसी म्हणाले, 'यामध्ये उत्तर प्रदेशच्या भाजपा सरकारची भूमिका काय आहे, पोलीस आणि मीडियाच्या उपस्थितीत कोल्ड ब्लडेड मर्डर करणारे हे लोक कोण आहेत? याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हायला हवी. मी न्यायालयाला विनंती करतो की या प्रकरणाची स्वतःहून चौकशी करावी. त्यांनी समिती स्थापन केली. एक तपास पथक तयार करा आणि कालबद्ध तपास करा, ज्यामध्ये यूपीचा कोणताही अधिकारी नसावा. तपास वेळेत पूर्ण झाला पाहिजे. ते लोक तिथे कसे घुसले आणि पोलिसांनी त्यांना का रोखले नाही, हे कोणालाच सांगता येत नाही.

"योगींनी राजीनामा द्यावा"

यूपी सरकारवर हल्लाबोल करताना ओवेसी म्हणाले, "ही हत्या यूपी पोलिसांच्या उपस्थितीत झाली आहे. अतिरेकी वाढत आहेत. काल खून करणारे हे कोण आहेत, जर त्यांचा यूपी सरकारशी संबंध नाही, तर ते कट्टरपंथी कसे झाले. त्याचा हात पाहा, तो हात न हलवता कसा सतत गोळीबार करत होता. जो शूटिंग करताना धार्मिक घोषणा देतो. भाजपची सत्ता आहे, उद्या दुसरा कोणी असेल, मग काय होईल... न्यायालय शिक्षा देईल तेव्हा आनंद साजरा करा. सगळ्यांना गोळ्या घातल्या तर कोर्ट काय करणार? इंदिरा गांधी, बेअंत सिंह, महात्मा गांधी, राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यूपीच्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. काल झालेल्या हत्येची जबाबदारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यांच्यात घटनात्मक नैतिकता जिवंत असेल, तर त्यांना पद सोडावे लागेल, त्यांनी राजीनामा द्यावा." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीyogi adityanathयोगी आदित्यनाथCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश