शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'फक्त गांधी कुटुंबाचा नव्हे तर प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 10:19 IST

संपूर्ण देशात सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जात आहे

नवी दिल्ली - गांधी परिवाराच्या सुरक्षेचा मुद्दा देशभरात तसेच संसदेत गाजत असताना प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्ट करत सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, प्रियंका, माझी मुले, गांधी परिवार असो वा मी स्वत: यांच्या सुरक्षेचा प्रश्न नाही. हा मुद्दा आहे की, आपल्या देशातील नागरिक, विशेषत: महिलांना सुरक्षित ठेवणं अथवा त्यांना सुरक्षित वाटावं असं आहे. संपूर्ण देशात सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जात आहे. मुलींसोबत छेडछाड, बलात्कार होत आहेत. आपण कोणता समाज बनवतो आहोत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. जर आम्ही आमच्या देशात, आमच्या घरात, रस्त्यावर सुरक्षित नाही, दिवसा सुरक्षित नाही अथवा रात्री सुरक्षित नाही तर आम्ही कुठे आणि केव्हा सुरक्षित आहोत? अशी भावना रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केली आहे. 

एका आठवडाभरापूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता अज्ञात व्यक्तींनी सेल्फी घेण्यासाठी प्रियंका गांधी यांच्या घरात प्रवेश केला. २६ नोव्हेंबरला २ वाजता त्यांच्या घराच्या आवारात एक अज्ञात गाडीने शिरकाव केला. त्यातून काही जण उतरले होते. माहितीनुसार प्रियंका गांधी यांच्या घराच्या आवारात ३ महिला, १ पुरुष आणि १ लहान मुलाने प्रवेश केला होता. 

घरात आलेल्या त्या लोकांनी सांगितले की, आम्ही प्रियंका गांधी यांचे चाहते आहोत. त्यांची भेट घेण्यासाठी आलोत. मात्र सीआरपीएफने याप्रकरणी तक्रार नोंद केली आहे. या घटनेची चौकशी करण्याचं काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. सध्या त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ पोलिसांवर आहे. 

गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा हटविल्यावरुन काँग्रेसने सत्ताधारी भाजपावर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. यावर पलटवार करताना अमित शाह यांनी सुडाचे राजकारण करणे हे भाजपाच्या संस्कारांध्ये नाही, तर ती काँग्रेसची ओळख असल्याचे सांगत हल्लाबोल केला होता. आतापर्यंत एसपीजी सुरक्षेच्या नियमांमध्ये जे बदल झाले होते. ते फक्त एका कुटुंबाला लक्षात घेऊन करण्यात आले होते. मात्र, आता यामध्ये पहिल्यांदा पंतप्रधानांची सुरक्षा पाहून बदल करण्यात येत आहे. एसपीजी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आहे. याचा प्रतिष्ठेचं प्रतिक (status symbol) म्हणून वापर होणार नाही, असे सांगत अमित शाह यांनी गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता टोला लगावला. याचबरोबर, आता फक्त जे पंतप्रधान असतील त्यांनाच ही सुरक्षा मिळेल. शिवाय माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला फक्त ५ वर्ष ही सुरक्षा दिली जाईल, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राAmit Shahअमित शहाPriyanka Gandhiप्रियंका गांधीWomenमहिलाRapeबलात्कार