शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

'फक्त गांधी कुटुंबाचा नव्हे तर प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 10:19 IST

संपूर्ण देशात सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जात आहे

नवी दिल्ली - गांधी परिवाराच्या सुरक्षेचा मुद्दा देशभरात तसेच संसदेत गाजत असताना प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्ट करत सुरक्षेच्या मुद्द्यावर भाष्य करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, प्रियंका, माझी मुले, गांधी परिवार असो वा मी स्वत: यांच्या सुरक्षेचा प्रश्न नाही. हा मुद्दा आहे की, आपल्या देशातील नागरिक, विशेषत: महिलांना सुरक्षित ठेवणं अथवा त्यांना सुरक्षित वाटावं असं आहे. संपूर्ण देशात सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली जात आहे. मुलींसोबत छेडछाड, बलात्कार होत आहेत. आपण कोणता समाज बनवतो आहोत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. जर आम्ही आमच्या देशात, आमच्या घरात, रस्त्यावर सुरक्षित नाही, दिवसा सुरक्षित नाही अथवा रात्री सुरक्षित नाही तर आम्ही कुठे आणि केव्हा सुरक्षित आहोत? अशी भावना रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केली आहे. 

एका आठवडाभरापूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता अज्ञात व्यक्तींनी सेल्फी घेण्यासाठी प्रियंका गांधी यांच्या घरात प्रवेश केला. २६ नोव्हेंबरला २ वाजता त्यांच्या घराच्या आवारात एक अज्ञात गाडीने शिरकाव केला. त्यातून काही जण उतरले होते. माहितीनुसार प्रियंका गांधी यांच्या घराच्या आवारात ३ महिला, १ पुरुष आणि १ लहान मुलाने प्रवेश केला होता. 

घरात आलेल्या त्या लोकांनी सांगितले की, आम्ही प्रियंका गांधी यांचे चाहते आहोत. त्यांची भेट घेण्यासाठी आलोत. मात्र सीआरपीएफने याप्रकरणी तक्रार नोंद केली आहे. या घटनेची चौकशी करण्याचं काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. सध्या त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ पोलिसांवर आहे. 

गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा हटविल्यावरुन काँग्रेसने सत्ताधारी भाजपावर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. यावर पलटवार करताना अमित शाह यांनी सुडाचे राजकारण करणे हे भाजपाच्या संस्कारांध्ये नाही, तर ती काँग्रेसची ओळख असल्याचे सांगत हल्लाबोल केला होता. आतापर्यंत एसपीजी सुरक्षेच्या नियमांमध्ये जे बदल झाले होते. ते फक्त एका कुटुंबाला लक्षात घेऊन करण्यात आले होते. मात्र, आता यामध्ये पहिल्यांदा पंतप्रधानांची सुरक्षा पाहून बदल करण्यात येत आहे. एसपीजी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आहे. याचा प्रतिष्ठेचं प्रतिक (status symbol) म्हणून वापर होणार नाही, असे सांगत अमित शाह यांनी गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता टोला लगावला. याचबरोबर, आता फक्त जे पंतप्रधान असतील त्यांनाच ही सुरक्षा मिळेल. शिवाय माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला फक्त ५ वर्ष ही सुरक्षा दिली जाईल, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राAmit Shahअमित शहाPriyanka Gandhiप्रियंका गांधीWomenमहिलाRapeबलात्कार