शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

...तर लोकसभेसोबतच काश्मीरमध्ये निवडणूक घेऊ- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 20:00 IST

काँग्रेसच्या प्रश्नाला राजनाथ सिंह यांचं उत्तर

 नवी दिल्ली: काँग्रेसची सत्ता असताना काश्मीरमध्ये सुवर्णकाळ होता. तर मग काश्मीरमधील स्थिती आज अशी का?, असा सवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत उपस्थित केला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काश्मीरमधील स्थितीवर भाष्य करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर राजनाथ सिंह यांनी आझाद यांना प्रत्युत्तर दिलं. निवडणूक आयोगानं सूचना केली, तर लोकसभेसोबतच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होईल, असंही सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी गुलाम नबी आझाद यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस आणि भाजपा सरकारची तुलना केली. 'काँग्रेसनं जम्मू-काश्मीरचा विकास केला. मग आज तिथली परिस्थिती अशी का?' असा प्रश्न सिंह यांनी विचारला. 'पंतप्रधान मोदींनी गेल्या 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरच्या विकासाकडे विशेष लक्ष दिलं. मागील 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरला जितका निधी देण्यात आला, तितका याआधी कधीही देण्यात आला नव्हता. आमच्या सत्ताकाळात दहशतवादी घटना कमी झाल्या. राज्यात शांतता नांदावी, यासाठी आम्ही हुर्रियतशी बोलायलादेखील तयार होतो. मात्र त्यांनी बातचीत करण्यास नकार दिला,' असं सिंह यांनी सभागृहाला सांगितलं.भाजपा सरकार निवडणूक आयोगाला लोकसभेसोबतच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घ्यायला सांगणार का, असा प्रश्न राजनाथ सिंह यांना गुलाम नबी आझाद यांनी विचारला. त्यावर निवडणूक आयोगानं सूचना दिल्यास सरकारला दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यात काहीही अडचण येणार नाही, असं उत्तर सिंह यांनी दिलं. गेल्या वर्षी जून महिन्यात भाजपानं जम्मू-काश्मीरमधील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. यानंतर नोव्हेंबरमध्ये पीडीपीनं काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीनं सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली होती. मात्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्याआधीच विधानसभा विसर्जित केली.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाPDPपीडीपीNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक