शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

...तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 09:06 IST

4 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

लखनऊ: उत्तर प्रदेश सरकार पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे. कामात बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास सरकारी सेवेत असलेल्या 16 लाखांपैकी 4 लाख कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते. दैनंदित कामात बेजबाबदार असलेल्या, कामात सकारात्मक नसलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा एक अहवाल तयार करण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिली. यासाठी 31 जुलैपर्यंतची कामगिरी विचारात घेण्यात येणार आहे. याबद्दलचा अहवाल त्यांच्या वरिष्ठांना सोपवण्यात येईल. 'वयाची पन्नाशी उलटलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा अहवाल 31 जुलै 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 31 मार्च 2018 पर्यंत वयाची पन्नाशी पूर्ण केलेल्यांच्या कामगिरीचा यासाठी विचार करण्यात येईल,' अशी माहिती अतिरिक्त सचिव मुकुल सिंह यांनी सांगितलं. नियमांनुसार कोणताही कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतो, असंही सरकारनं सांगितलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. असे निर्णय फक्त कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी घेतले जातात, असं उत्तर प्रदेश सचिवालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष यादवेंद्र मिश्रा यांनी म्हटलं. 'अशा प्रकारची कारवाई सहन केली जाणार नाही. याबद्दल आज बैठक घेऊन पुढील रणनिती निश्चित केली जाईल. राज्य सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास आमची संघटना संपावर जाईल,' असा इशारादेखील त्यांनी दिला.  

टॅग्स :GovernmentसरकारUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ