शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

सरकार-दारू माफियांचे संगनमत अलिगढ दारूकांडास जबाबदार - प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 06:42 IST

Priyanka Gandhi : अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. हीच दारू प्राशन करणाऱ्या ५० लोकांच्या शवविच्छेदनचा अहवाल यायचा बाकी असून, मृतांचा आकडा शंभरपर्यंत जाऊ शकतो.

नवी दिल्ली :अलिगढ दारूकांडाला योगी आदित्यनाथ सरकार आणि दारू माफियांदरम्यानचे संगनमत जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस आणि काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी केला आहे.अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. हीच दारू प्राशन करणाऱ्या ५० लोकांच्या शवविच्छेदनचा अहवाल यायचा बाकी असून, मृतांचा आकडा शंभरपर्यंत जाऊ शकतो.फेसबुकवरील पोस्टमध्ये प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, सरकार आणि दारू माफियांच्या संगनमतामुळे अलिगढमध्ये ही शोकांतिका घडली. उत्तर प्रदेशात ऑक्सिजन आणि औषधी उपलब्ध होत नव्हती. कामधंदे बंद होते. परंतु, प्रशासन आणि दारू माफियांच्या साटेलोट्यामुळे राज्यांत व्यवसायाची भरभराट होत होती.उत्तर प्रदेश काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांनी या भीषण घटनेविरुद्ध आवाज उठवून या घटनेस जबाबदार असलेल्या सरकारमध्ये बसलेल्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली.दरम्यान, त्यांनी आग्रा रुग्णालयातील ऑक्सिजनच्या मॉक ड्रीलदरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्ला केला. या प्रकरणाचे तथ्य समोर आणून सरकार दोषींना शिक्षा करणार का? असा सवाल त्यांनी ट्विटवर केला आहे

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश