शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तातडीने मिळणार मदत, सरकार सुरु करतंय टोल-फ्री नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 09:28 IST

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती देण्यासाठी किंवा हायवेवरील एखादी असुविधेबद्दल तक्रार करण्यासाठी केंद्र सरकार नॅशनल टोल-फ्री क्रमांक सुरु करत आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती देण्यासाठी किंवा हायवेवरील एखादी असुविधेबद्दल तक्रार करण्यासाठी केंद्र सरकार नॅशनल टोल-फ्री क्रमांक सुरु करत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा टोल-फ्री क्रमांक लाँच करणार आहे. यानंतर तुम्ही  '1033' या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करुन अपघाताची माहिती किंवा तक्रार नोंदवू शकता. 

'आम्ही यो प्रोजक्टसंबंधी संपुर्ण काम पुर्ण केलं आहे. या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश पीडितांना मदत, बचावकार्य करुन लवकरात लवकर नजीकच्या रुग्णालयात दाखल करणं असणार आहे. आम्ही यासाठी राज्य सरकारांशीही बोलत आहोत. राज्य सरकारांशी बोलणी करुन महामार्गाजवळ रुग्णवाहिका उभ्या करण्याचा विचार आहे. जेणेकरुन आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका तात्काळ मदतीसाठी उपलब्ध असेल', अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे चेअरमन दिपक कुमार यांनी दिली आहे. 

टोल-फ्री क्रमांक जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचावा यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) राष्ट्रीय महामार्गाचं जीआयएस केलं आहे. यामुळे कॉल सेंटरवर एखादा कॉल आल्यास तो कुठून आला आहे याची माहिती मिळेल आणि तेथील मातृभाषेनुसार संबंधित व्यक्तीकडे तो फोन कॉल ट्रान्सफर करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिका-यानुसार, '1033 हा क्रमांक महामार्गाचा वापर करणा-यांसाठी आणीबाणीच्या तसंच इतर वेळी मदतनीस ठरेल'. 

कॉल सेंटरवर एखाद्या अपघाताची किंवा इतर महत्वाची माहिती मिळाल्या क्षणी लगेचच जवळच्या ऑपरेशन सेंटरला यासंबंधी कळवण्यात येईल. यासोबतच रुग्णवाहिका आणि क्रेन घटनास्थळी रवाना होतील अशी माहिती अधिका-याने दिली आहे. भारतात राष्ट्रीय महामार्गांनी फक्त दोन टक्के भाग व्यापला आहे. पण अपघाताची टक्केवारी जवळपास 30 टक्के आहे. 2016 मध्ये राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 52075 जणांचा जीव गेला होता, तर 1.46 लाख जण जखमी झाले होते. जखमींना तातडीने मदत दिली तर 50 टक्के लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो असं सरकारी अहवालात नमूद आहे.  

टॅग्स :Accidentअपघात