शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तातडीने मिळणार मदत, सरकार सुरु करतंय टोल-फ्री नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 09:28 IST

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती देण्यासाठी किंवा हायवेवरील एखादी असुविधेबद्दल तक्रार करण्यासाठी केंद्र सरकार नॅशनल टोल-फ्री क्रमांक सुरु करत आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती देण्यासाठी किंवा हायवेवरील एखादी असुविधेबद्दल तक्रार करण्यासाठी केंद्र सरकार नॅशनल टोल-फ्री क्रमांक सुरु करत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा टोल-फ्री क्रमांक लाँच करणार आहे. यानंतर तुम्ही  '1033' या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करुन अपघाताची माहिती किंवा तक्रार नोंदवू शकता. 

'आम्ही यो प्रोजक्टसंबंधी संपुर्ण काम पुर्ण केलं आहे. या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश पीडितांना मदत, बचावकार्य करुन लवकरात लवकर नजीकच्या रुग्णालयात दाखल करणं असणार आहे. आम्ही यासाठी राज्य सरकारांशीही बोलत आहोत. राज्य सरकारांशी बोलणी करुन महामार्गाजवळ रुग्णवाहिका उभ्या करण्याचा विचार आहे. जेणेकरुन आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका तात्काळ मदतीसाठी उपलब्ध असेल', अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे चेअरमन दिपक कुमार यांनी दिली आहे. 

टोल-फ्री क्रमांक जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचावा यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) राष्ट्रीय महामार्गाचं जीआयएस केलं आहे. यामुळे कॉल सेंटरवर एखादा कॉल आल्यास तो कुठून आला आहे याची माहिती मिळेल आणि तेथील मातृभाषेनुसार संबंधित व्यक्तीकडे तो फोन कॉल ट्रान्सफर करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिका-यानुसार, '1033 हा क्रमांक महामार्गाचा वापर करणा-यांसाठी आणीबाणीच्या तसंच इतर वेळी मदतनीस ठरेल'. 

कॉल सेंटरवर एखाद्या अपघाताची किंवा इतर महत्वाची माहिती मिळाल्या क्षणी लगेचच जवळच्या ऑपरेशन सेंटरला यासंबंधी कळवण्यात येईल. यासोबतच रुग्णवाहिका आणि क्रेन घटनास्थळी रवाना होतील अशी माहिती अधिका-याने दिली आहे. भारतात राष्ट्रीय महामार्गांनी फक्त दोन टक्के भाग व्यापला आहे. पण अपघाताची टक्केवारी जवळपास 30 टक्के आहे. 2016 मध्ये राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 52075 जणांचा जीव गेला होता, तर 1.46 लाख जण जखमी झाले होते. जखमींना तातडीने मदत दिली तर 50 टक्के लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो असं सरकारी अहवालात नमूद आहे.  

टॅग्स :Accidentअपघात