शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

रहस्यमयी बियाणांमुळे भारतात खळबळ , तस्करीबाबत सरकारने जारी केला रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 03:45 IST

अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या कृषी उत्पादनाला धोका ठरणाऱ्या रहस्यमय बियाणांबद्दल भारतासह जगभरातील शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये अशी बियाणे जहाजांद्वारे पोहोचवली जात असून, त्याबाबत सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे याबाबत इशारा जारी करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाचे उपायुक्त (गुणवत्ता नियंत्रक) डॉ. दिलीपकुमार श्रीवास्तव यांच्या सहीनिशी जारी झालेल्या पत्रात म्हटले आहे की, अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अशा बियांबाबत सतर्क राहायला हवे. अशा प्रकारच्या बियाणांमधून विविध रोग पसरवण्याचाही कट असू शकतो.‘लोकमत’ने डॉ. श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेश, कृषी विद्यापीठे, संघटना, संबंधित यंत्रणा, आयसीएआर व बियाणे महामंडळांना याबाबत सतर्क करण्यात आले असल्याचे सांगितले. अशा बिया देशातील जैैवविविधतेला धोका ठरू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.भारताच्या कृषी खात्याने ६ आॅगस्ट रोजी जारी केलेल्या या इशाºयाने खळबळ उडवून दिली आहे.पार्सलमधून बियाअमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड, जपान व काही युरोपियन देशांमध्ये अशा प्रकारच्या बिया मोठ्या प्रमाणावर जहाजे/पार्सलमधून पोहोचल्या आहेत. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.स्वीत्झर्लंडस्थित आंतरराष्टÑीय बियाणे फेडरेशनने म्हटले आहे की, भारत जागतिक करारात सहभागी असल्यामुळे भारतालाही याबाबत सतर्क करण्यात येत आहे. अशा प्रकारचे पार्सल किंवा जहाजाद्वारे येणाºया बिया देशातील प्रवेशाआधीच रोखाव्यात.च्अमेरिकेच्या कृषी खात्याने या प्रकाराला कृषी तस्करी म्हटले आहे.

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय