देशातील एलपीजी पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने शुक्रवारी एक दिलासादायक बातमी दिली. आखाती देशांत तणाव असतानाही, एलपीजीने भरलेली चार भारतीय जहाजे 'होर्मुझची सामुद्रधुनी' यशस्वीपणे पार करून भारतात दाखल झाली आहेत.
मोठा निर्णय! राज्यात १ जानेवारी २०११ पर्यंतची सरकारी जागेवरील निवासी अतिक्रमणे नियमित होणार
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घडामोडीची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, "आम्ही यापूर्वीच कळवले होते की भारतीय जहाजे प्रवासासाठी निघाली आहेत. एलपीजीची चार जहाजे होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करून भारतीय बंदरांवर पोहोचली आहेत.
ऊर्जा खरेदीसंदर्भात रणधीर जयस्वाल म्हणाले, "ऊर्जा संसाधने खरेदी करण्याच्या व्यापक दृष्टिकोनाची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे. हे १.४ अब्ज लोकांच्या गरजा सुरक्षित करण्याच्या आपल्या गरजेवर अवलंबून आहे." त्यांनी पुढे असेही सांगितले की, बाजारातील घडामोडी आणि जागतिक परिस्थिती देखील यात मोठी भूमिका बजावतील. हे तीन मुद्दे आमच्या निर्णयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.पाकिस्तानच्या खोटेपणाविरुद्धही आवाज उठवला
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पुढे १९७१ मध्ये 'ऑपरेशन सर्चलाइन' दरम्यान पाकिस्तानने केलेल्या अत्याचारांची आठवण करून दिली. या नरसंहारात लाखो निष्पाप बांग्लादेशी नागरिकांची लक्ष्यित हत्या करण्यात आली. तसेच, महिलांवर मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचारही झाले. यामुळे मोठ्या संख्येने लोकांना बांगलादेश सोडून भारतात आश्रय घेण्यास भाग पडले. त्यांनी पुढे सांगितले की, या अत्याचारांनी जगाला हादरवून सोडले होते. जरी पाकिस्तान अजूनही आपले गुन्हे कबूल करण्यास नकार देत असला तरी, आम्ही न्यायाच्या शोधात असलेल्या बांग्लादेशला पाठिंबा देतो.
Web Summary : Amidst Gulf tensions, four LPG-laden Indian ships safely navigated Hormuz Strait and reached India. The Ministry of External Affairs confirmed the arrival, emphasizing energy security for 1.4 billion people. Pakistan's 1971 atrocities were also condemned.
Web Summary : खाड़ी देशों में तनाव के बावजूद, एलपीजी से भरे चार भारतीय जहाज होर्मुज जलडमरूमध्य को सुरक्षित रूप से पार कर भारत पहुंचे। विदेश मंत्रालय ने 1.4 अरब लोगों के लिए ऊर्जा सुरक्षा पर जोर दिया। पाकिस्तान के 1971 के अत्याचारों की भी निंदा की गई।