शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार तपासणार ट्रकचालकांचे डोळे, आजपासून मोफत शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:34 IST

रस्ते अपघातांना तातडीने रोखण्यासाठी सरकार ट्रकचालकांच्या डोळ््यांची तपासणी करण्याची योजना बनवित आहे. यासाठी देशभर राष्ट्रीय महामार्गांवर मोफत तपासणी शिबिरे घेतली जातील.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : रस्ते अपघातांना तातडीने रोखण्यासाठी सरकार ट्रकचालकांच्या डोळ््यांची तपासणी करण्याची योजना बनवित आहे. यासाठी देशभर राष्ट्रीय महामार्गांवर मोफत तपासणी शिबिरे घेतली जातील. महात्मा गांधी जयंतीनिमित्त (२ आॅक्टोबर) रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे नागपूरमधील पंजारी टोलप्लाझावर शिबिराला प्रारंभ करतील.रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग तयार करणाºया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून २ ते ६ आॅक्टोबर दरम्यान ही विनामूल्य शिबिरे घेतली जातील. ट्रकचालकांसोबत क्लीनरच्या डोळ््यांचीही तपासणी केली जाईल, गरज भासल्यास त्यांना चष्माही मोफत दिला जाईल. याशिवाय नेत्रतज्ज्ञांकडून औषधे आणि इतर आवश्यक सल्ला दिला जाईल. ही शिबिरे वेगवेगळ््या राष्ट्रीय महामार्गांवर ५० ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावले जातील. ही शिबिरे अशासकीय संस्थांच्या मदतीने असतील व त्यांचे संचालन नेत्र विशेषज्ज्ञ व त्यांच्या सहकार्यांकडून केले जाईल. शिबिरांच्या ठिकाणी स्वच्छतागृह (शौचालय), हात धुण्याची सोय व पेय पदार्थांची व्हेंडिंग मशिन असेल. त्याच वेळी ५० ट्रक्सच्या पार्किंगची सोयही तेथे असेल.सरकार सदोष दृष्टी ही रस्ते अपघातांचे मोठे कारण समजते. चालकांच्या डोळ््यांची तपासणी व आवश्यक त्या उपाययोजनांमुळे अपघात कमी करता येऊ शकतील, असे सरकारला वाटते. गेल्या एक वर्षात देशात रस्ते अपघातांचे प्रमाण थोडेसे खाली आले आहे. तरीही वर्षभर दीड लाखांपेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू होतो. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी चार लाख ८० हजार ६५२ रस्ते अपघात झाले व त्यात एक लाख ५० हजार ७८५ लोक मरण पावले, तर चार लाख ९४ हजार ६२४ लोक जखमी झाले.महाराष्ट्रात भलेही जास्त संख्येने रस्ते अपघात होतात, तरी गेल्या एक वर्षात २४ हजार अपघात कमी झाले आहेत.२०१५ मध्ये ६३ हजार ८०५ अपघातझाले होते, तर २०१६ मध्ये ३९ हजार ८५७. अपघातांत मरण पावलेल्यांची संख्या व जखमींची संख्याही कमी झाली आहे, परंतु अपघातांच्या घटलेल्या संख्येच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे. २०१५ मध्ये राज्यात १३ हजार २१२ लोक मरण पावले होते, तर२०१६ मध्ये १२ हजार ९३५.

टॅग्स :Accidentअपघात