शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
6
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
10
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
11
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
12
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
13
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
14
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
15
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
16
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
17
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
18
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
19
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
20
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

सरकार तपासणार ट्रकचालकांचे डोळे, आजपासून मोफत शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:34 IST

रस्ते अपघातांना तातडीने रोखण्यासाठी सरकार ट्रकचालकांच्या डोळ््यांची तपासणी करण्याची योजना बनवित आहे. यासाठी देशभर राष्ट्रीय महामार्गांवर मोफत तपासणी शिबिरे घेतली जातील.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : रस्ते अपघातांना तातडीने रोखण्यासाठी सरकार ट्रकचालकांच्या डोळ््यांची तपासणी करण्याची योजना बनवित आहे. यासाठी देशभर राष्ट्रीय महामार्गांवर मोफत तपासणी शिबिरे घेतली जातील. महात्मा गांधी जयंतीनिमित्त (२ आॅक्टोबर) रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे नागपूरमधील पंजारी टोलप्लाझावर शिबिराला प्रारंभ करतील.रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग तयार करणाºया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून २ ते ६ आॅक्टोबर दरम्यान ही विनामूल्य शिबिरे घेतली जातील. ट्रकचालकांसोबत क्लीनरच्या डोळ््यांचीही तपासणी केली जाईल, गरज भासल्यास त्यांना चष्माही मोफत दिला जाईल. याशिवाय नेत्रतज्ज्ञांकडून औषधे आणि इतर आवश्यक सल्ला दिला जाईल. ही शिबिरे वेगवेगळ््या राष्ट्रीय महामार्गांवर ५० ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावले जातील. ही शिबिरे अशासकीय संस्थांच्या मदतीने असतील व त्यांचे संचालन नेत्र विशेषज्ज्ञ व त्यांच्या सहकार्यांकडून केले जाईल. शिबिरांच्या ठिकाणी स्वच्छतागृह (शौचालय), हात धुण्याची सोय व पेय पदार्थांची व्हेंडिंग मशिन असेल. त्याच वेळी ५० ट्रक्सच्या पार्किंगची सोयही तेथे असेल.सरकार सदोष दृष्टी ही रस्ते अपघातांचे मोठे कारण समजते. चालकांच्या डोळ््यांची तपासणी व आवश्यक त्या उपाययोजनांमुळे अपघात कमी करता येऊ शकतील, असे सरकारला वाटते. गेल्या एक वर्षात देशात रस्ते अपघातांचे प्रमाण थोडेसे खाली आले आहे. तरीही वर्षभर दीड लाखांपेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू होतो. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी चार लाख ८० हजार ६५२ रस्ते अपघात झाले व त्यात एक लाख ५० हजार ७८५ लोक मरण पावले, तर चार लाख ९४ हजार ६२४ लोक जखमी झाले.महाराष्ट्रात भलेही जास्त संख्येने रस्ते अपघात होतात, तरी गेल्या एक वर्षात २४ हजार अपघात कमी झाले आहेत.२०१५ मध्ये ६३ हजार ८०५ अपघातझाले होते, तर २०१६ मध्ये ३९ हजार ८५७. अपघातांत मरण पावलेल्यांची संख्या व जखमींची संख्याही कमी झाली आहे, परंतु अपघातांच्या घटलेल्या संख्येच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे. २०१५ मध्ये राज्यात १३ हजार २१२ लोक मरण पावले होते, तर२०१६ मध्ये १२ हजार ९३५.

टॅग्स :Accidentअपघात