शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकार तपासणार ट्रकचालकांचे डोळे, आजपासून मोफत शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:34 IST

रस्ते अपघातांना तातडीने रोखण्यासाठी सरकार ट्रकचालकांच्या डोळ््यांची तपासणी करण्याची योजना बनवित आहे. यासाठी देशभर राष्ट्रीय महामार्गांवर मोफत तपासणी शिबिरे घेतली जातील.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : रस्ते अपघातांना तातडीने रोखण्यासाठी सरकार ट्रकचालकांच्या डोळ््यांची तपासणी करण्याची योजना बनवित आहे. यासाठी देशभर राष्ट्रीय महामार्गांवर मोफत तपासणी शिबिरे घेतली जातील. महात्मा गांधी जयंतीनिमित्त (२ आॅक्टोबर) रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे नागपूरमधील पंजारी टोलप्लाझावर शिबिराला प्रारंभ करतील.रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग तयार करणाºया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून २ ते ६ आॅक्टोबर दरम्यान ही विनामूल्य शिबिरे घेतली जातील. ट्रकचालकांसोबत क्लीनरच्या डोळ््यांचीही तपासणी केली जाईल, गरज भासल्यास त्यांना चष्माही मोफत दिला जाईल. याशिवाय नेत्रतज्ज्ञांकडून औषधे आणि इतर आवश्यक सल्ला दिला जाईल. ही शिबिरे वेगवेगळ््या राष्ट्रीय महामार्गांवर ५० ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावले जातील. ही शिबिरे अशासकीय संस्थांच्या मदतीने असतील व त्यांचे संचालन नेत्र विशेषज्ज्ञ व त्यांच्या सहकार्यांकडून केले जाईल. शिबिरांच्या ठिकाणी स्वच्छतागृह (शौचालय), हात धुण्याची सोय व पेय पदार्थांची व्हेंडिंग मशिन असेल. त्याच वेळी ५० ट्रक्सच्या पार्किंगची सोयही तेथे असेल.सरकार सदोष दृष्टी ही रस्ते अपघातांचे मोठे कारण समजते. चालकांच्या डोळ््यांची तपासणी व आवश्यक त्या उपाययोजनांमुळे अपघात कमी करता येऊ शकतील, असे सरकारला वाटते. गेल्या एक वर्षात देशात रस्ते अपघातांचे प्रमाण थोडेसे खाली आले आहे. तरीही वर्षभर दीड लाखांपेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू होतो. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी चार लाख ८० हजार ६५२ रस्ते अपघात झाले व त्यात एक लाख ५० हजार ७८५ लोक मरण पावले, तर चार लाख ९४ हजार ६२४ लोक जखमी झाले.महाराष्ट्रात भलेही जास्त संख्येने रस्ते अपघात होतात, तरी गेल्या एक वर्षात २४ हजार अपघात कमी झाले आहेत.२०१५ मध्ये ६३ हजार ८०५ अपघातझाले होते, तर २०१६ मध्ये ३९ हजार ८५७. अपघातांत मरण पावलेल्यांची संख्या व जखमींची संख्याही कमी झाली आहे, परंतु अपघातांच्या घटलेल्या संख्येच्या तुलनेत ही संख्या फारच कमी आहे. २०१५ मध्ये राज्यात १३ हजार २१२ लोक मरण पावले होते, तर२०१६ मध्ये १२ हजार ९३५.

टॅग्स :Accidentअपघात