शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

"हे सरकार म्हणजे निवडणूक जिंकणारं मशीन"; मेहबुबा मुफ्तींनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 20:04 IST

पाकिस्तान आणि चीन सोबतच भारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत, मुफ्ती यांचं वक्तव्य

ठळक मुद्देभारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत, मुफ्ती यांचं वक्तव्यकलम ३७० चे अधिकार असते तर कृषी कायदे लागू केले नसते : मुफ्ती

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. हे सरकार म्हणजे निवडणुका जिंकणारं मशीन आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याव्यतिरिक्त त्यांनी कलम ३७० आणि कृषी कायद्यांवरही भाष्य केलं. "पाकिस्तान आणि चीन सोबतच भारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत. जेव्हा पाकिस्तानसोबत संबंध बिघडतात तेव्हा सीमेवरील लोकांनाही त्याचा त्रास होतो. त्याचप्रमाणे चीनसोबत सुरू असलेल्या तणावामुळे आपले २२ जवानही शहीद झाले. हे सरकार म्हणजे निवडणुका जिंकणारं मशीन आहे," असं म्हणत मुफ्ती यांनी सरकारवर निशाणा साधला.  "जम्मू काश्मीरकडे कलम ३७०चे अधिकार असते तर नवे कृषी कायदे जम्मू काश्मीरमध्ये कधीही लागू केले गेले नसते. जम्मू काश्मीरमध्ये तेच कायदे लागू झाले असते ज्याची आवश्यकता होती," असंही त्या म्हणाल्या. यापूर्वीही त्यांनी केंद्र सरकार लोकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप केला होता. लोकांना बोलण्याची परवनागी नाही, ही परिस्थिती एका प्रेशर कुकरप्रमाणे आहे. परंतु जेव्हा प्रेशर कुकरचा स्फोट होते तेल्हा तो पूर्ण घराला जाळतो. एक अशी वेळ येईल जेव्हा सरकार हात जोडून विशेष दर्जासोबत आणखी काय हवं असंही विचारेल असंही त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीChief Ministerमुख्यमंत्रीNepalनेपाळchinaचीनBangladeshबांगलादेशSri Lankaश्रीलंकाFarmerशेतकरी