शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

"हे सरकार म्हणजे निवडणूक जिंकणारं मशीन"; मेहबुबा मुफ्तींनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 20:04 IST

पाकिस्तान आणि चीन सोबतच भारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत, मुफ्ती यांचं वक्तव्य

ठळक मुद्देभारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत, मुफ्ती यांचं वक्तव्यकलम ३७० चे अधिकार असते तर कृषी कायदे लागू केले नसते : मुफ्ती

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. हे सरकार म्हणजे निवडणुका जिंकणारं मशीन आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याव्यतिरिक्त त्यांनी कलम ३७० आणि कृषी कायद्यांवरही भाष्य केलं. "पाकिस्तान आणि चीन सोबतच भारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत. जेव्हा पाकिस्तानसोबत संबंध बिघडतात तेव्हा सीमेवरील लोकांनाही त्याचा त्रास होतो. त्याचप्रमाणे चीनसोबत सुरू असलेल्या तणावामुळे आपले २२ जवानही शहीद झाले. हे सरकार म्हणजे निवडणुका जिंकणारं मशीन आहे," असं म्हणत मुफ्ती यांनी सरकारवर निशाणा साधला.  "जम्मू काश्मीरकडे कलम ३७०चे अधिकार असते तर नवे कृषी कायदे जम्मू काश्मीरमध्ये कधीही लागू केले गेले नसते. जम्मू काश्मीरमध्ये तेच कायदे लागू झाले असते ज्याची आवश्यकता होती," असंही त्या म्हणाल्या. यापूर्वीही त्यांनी केंद्र सरकार लोकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप केला होता. लोकांना बोलण्याची परवनागी नाही, ही परिस्थिती एका प्रेशर कुकरप्रमाणे आहे. परंतु जेव्हा प्रेशर कुकरचा स्फोट होते तेल्हा तो पूर्ण घराला जाळतो. एक अशी वेळ येईल जेव्हा सरकार हात जोडून विशेष दर्जासोबत आणखी काय हवं असंही विचारेल असंही त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीChief Ministerमुख्यमंत्रीNepalनेपाळchinaचीनBangladeshबांगलादेशSri Lankaश्रीलंकाFarmerशेतकरी