शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आरक्षणासाठी सरकार वचनबद्ध; संसदेत विरोधकांच्या गदारोळानंतर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 05:51 IST

एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी योग्य पावले उचलली जातील, अशी ग्वाही सरकारच्या वतीने संसदेच्या सभागृहात देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी योग्य पावले उचलली जातील, अशी ग्वाही सरकारच्या वतीने संसदेच्या सभागृहात देण्यात आली. त्या आधी नेमणुका व पदोन्नतीमध्ये एससी, एसटी, ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्ये बांधील नाहीत, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला घेरले. या प्रश्नावरून लोकसभेत गदारोळ झाला.लोकसभेचे कामकाज सुरू होताच, काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. द्रमुक सदस्यांनी सरकारवर निशाणा साधला. उत्तराखंड सरकारकडून न्यायालयात बाजू मांडल्यानंतर हा निर्णय आला आहे. बसपचे रितेश पांडे म्हणाले की, सरकार दलितविरोधी आहे. राज्यघटनेने आरक्षणाचा अधिकार दिला आहे. अपना दलाच्या अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, एससी, एसटी आणि ओबीसी यांना संविधानाने हा अधिकार दिला आहे. न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी आहे.लोजपाचे चिराग पासवान म्हणाले की, आरक्षण हा संवैधानिक अधिकार आहे. याबाबत सरकारला हस्तक्षेप करायला हवा. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, न्यायालयाने निर्णय बदलावा, यासाठी सत्ताधारी पक्षाने लवकर पावले उचलावीत.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या संवेदनशील मुद्द्यावर विरोधक राजकारण करत आहेत. दोन्ही सभागृहांत निवेदन करताना सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहेलोत यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाचा हा निर्णय २०१२ मधील काँग्रेस सरकारच्या काळातील प्रकरणाशी संबंधित आहे. राज्यसभेत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, न्यायालयाचा निर्णय अन्यायकारक आहे. मात्र, एससी, एसटी यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी मोदी सरकार बांधील आहे.आरक्षण संपविणे हा भाजपचा डाव : राहुल गांधीकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर हल्लाबोल करीत म्हटले की, आरक्षण समाप्त करण्याची इच्छा बाळगणे हे भाजप आणि आरएसएसच्या डीएनएमध्येच आहे. वंचित वर्गाचे अधिकार हिसकावण्यासाठी हे षड्यंत्र आखले जात आहे. मात्र, एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण काँग्रेस समाप्त होऊ देणार नाही.

टॅग्स :lok sabhaलोकसभाreservationआरक्षण