शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सरकारने पुन्हा दिल्या ७१ हजार नोकऱ्या; मोदी यांच्या हस्ते नियुक्तिपत्रांचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 07:39 IST

भारत सरकारची प्रत्येक योजना आणि प्रत्येक धोरणामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले.

नवी दिल्ली : आपल्या सरकारने भरती प्रक्रियेला पारदर्शक, निष्पक्ष बनविल्याने नोकऱ्यांतील भ्रष्टाचार व लागेबांध्यांची शक्यता संपुष्टात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. रोजगार मेळाव्यांतर्गत ७१ हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मोदींच्या हस्ते मंगळवारी नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. तेव्हा या कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. भारत सरकारची प्रत्येक योजना आणि प्रत्येक धोरणामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले.देशभरात ४५ ठिकाणी ‘रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या नियुक्त्या केंद्र सरकारच्या विविध विभागांत तसेच राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांमध्येही झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्याचा आणि या महिन्यात आसाममध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, यातून भारत सरकार आणि भाजपशासित राज्य सरकारांची तरुणांप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. नऊ वर्षांपूर्वी याच दिवशी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने पुढे कूच करणारा भारत आज विकसित भारत बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्टार्ट-अप्सनी किमान १० लाख तरुणांना रोजगार दिला आहे, असेही ते म्हणाले.

३० लाख पदे रिक्त असताना इव्हेंट : खरगे७१ हजार नियुक्तिपत्रांचे वाटप केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहासात्मक टीका केली. सरकारी खात्यांत ३० लाख पदे रिक्त असताना नियुक्तिपत्र वाटपाचा ‘इव्हेंट’ बनविण्यात आला, असे ते म्हणाले. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी आतापर्यंत १८ कोटी तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा केला, असा आरोपही त्यांनी केला. मोदींनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासनाची पातळी आणखी खाली आणली असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.

तुम्ही रोजगार मेळा योजनेचे फायदे तुमच्या टुंबाव्यतिरिक्त इतर लोकांना सांगा आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यास सांगा. रोजगारनिर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे पंतप्रधानांचे वचन पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. - सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEmployeeकर्मचारीBJPभाजपा