शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने पुन्हा दिल्या ७१ हजार नोकऱ्या; मोदी यांच्या हस्ते नियुक्तिपत्रांचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 07:39 IST

भारत सरकारची प्रत्येक योजना आणि प्रत्येक धोरणामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले.

नवी दिल्ली : आपल्या सरकारने भरती प्रक्रियेला पारदर्शक, निष्पक्ष बनविल्याने नोकऱ्यांतील भ्रष्टाचार व लागेबांध्यांची शक्यता संपुष्टात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. रोजगार मेळाव्यांतर्गत ७१ हजार नवनियुक्त कर्मचाऱ्यांना मोदींच्या हस्ते मंगळवारी नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. तेव्हा या कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना ते बोलत होते. भारत सरकारची प्रत्येक योजना आणि प्रत्येक धोरणामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले.देशभरात ४५ ठिकाणी ‘रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या नियुक्त्या केंद्र सरकारच्या विविध विभागांत तसेच राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांमध्येही झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्याचा आणि या महिन्यात आसाममध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, यातून भारत सरकार आणि भाजपशासित राज्य सरकारांची तरुणांप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. नऊ वर्षांपूर्वी याच दिवशी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने पुढे कूच करणारा भारत आज विकसित भारत बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्टार्ट-अप्सनी किमान १० लाख तरुणांना रोजगार दिला आहे, असेही ते म्हणाले.

३० लाख पदे रिक्त असताना इव्हेंट : खरगे७१ हजार नियुक्तिपत्रांचे वाटप केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहासात्मक टीका केली. सरकारी खात्यांत ३० लाख पदे रिक्त असताना नियुक्तिपत्र वाटपाचा ‘इव्हेंट’ बनविण्यात आला, असे ते म्हणाले. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी आतापर्यंत १८ कोटी तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा केला, असा आरोपही त्यांनी केला. मोदींनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासनाची पातळी आणखी खाली आणली असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.

तुम्ही रोजगार मेळा योजनेचे फायदे तुमच्या टुंबाव्यतिरिक्त इतर लोकांना सांगा आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यास सांगा. रोजगारनिर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे पंतप्रधानांचे वचन पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. - सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEmployeeकर्मचारीBJPभाजपा