शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची मोठी भेट; महागाई भत्त्यात 4% वाढ; 2025 पर्यंत मिळणार स्वस्त LPG सिलिंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 19:59 IST

आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटची कॅबिनेट बैठक झाली, यात अनेक निर्णय घेण्यात आले.

PM Ujjwala Yojana: आंतरराष्ट्रीय महिला दिन (8 मार्च) आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने LPG सिलिंडरवर मिळणारे अनुदान एका वर्षासाठी वाढवले ​​आहे. सामान्य LPG ग्राहक असो किंवा पीएम उज्ज्वला योजनेचा लाभार्थी असो, दोघांनाही 31 मार्च 2025 पर्यंत LPG  सिलिंडरवर सबसिडी मिळत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी ही माहिती दिली.

31 मार्च 2025 पर्यंत स्वस्त LPG मिळणार29 ऑगस्ट 2023 रोजी मोदी सरकारने महागड्या LPG चा त्रास सहन करणाऱ्या लोकांना एलपीजी सिलिंडर रिफिलिंगवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचा कालावधी 31 मार्च 2024 पर्यंत होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असून, त्यानंतर देशात आचारसंहिता लागू होईल. अशा स्थितीत या योजनेचा कालावधी वाढवणे सरकारला अवघड झाले असते. त्यामुळे सरकारने गुरुवारी(दि.7) मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या कॅबिनेट बैठकीत LPG सिलिंडरवर सबसिडी देण्याचा निर्णय 31 मार्च 2025 पर्यंत वाढवला आहे.

पीएम उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना 600 रुपयांमध्ये सिलिंडरएलपीजी सिलिंडर रिफिलिंग करण्यासाठी सरकार सर्वसामान्य ग्राहकांना प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी देते. 1100 रुपयांचा घरगुती एलपीजी सिलिंडर 900 रुपयांना उपलब्ध आहे. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना एकूण 500 रुपये अनुदान दिले जाते. म्हणजेच PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना LPG रिफिलसाठी फक्त 600 रुपये द्यावे लागतात. 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढकेंद्र सरकारने मोठा निर्णय घेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी (DA hike) वाढ केली आहे. आता महागाई भत्ता 50 टक्के झाला असून, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या वाढीचा फायदा होईल. ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे.

या निर्णयांनाही मान्यता देण्यात आली आहेमंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना पीयूष गोयल म्हणाले की, मंत्रिमंडळाने 5 वर्षांसाठी 10371.92 कोटी रुपयांच्या खर्चासह 'इंडिया एआय मिशन'ला मंजुरी दिली आहे. तागाच्या दराबाबतही मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला. त्यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षात तागाच्या एमएसपीमध्ये 122 टक्के वाढ झाली असून, त्याचा फायदा 44 लाख ताग उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचा फायदा विशेषत: भारतातील पूर्वेकडील प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि ओरिसा येथील शेतकऱ्यांना होणार आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा