शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Covid-19 ची वाढती रूग्णसंख्या वाढवते चिंता, पण तज्ज्ञ म्हणतात- 'नो टेन्शन, फक्त..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 17:01 IST

Covid-19 च्या 'टेन्शन'मध्ये भारतीयांसाठी आली दिलासा देणारी बातमी!

देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 11 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील एकूण 14 राज्यांमध्ये रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. काही आठवड्यांत, संसर्गाचे प्रमाण सुमारे चार पटीने वाढले आहे. दिल्लीतील दोन जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचा दर १३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. कोविडमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही थोडे वाढले आहे. देशात दररोज पॉझिटिव्हीटी रेटही वाढत आहे. मात्र यात दिलासादायक बाब म्हणजे रूग्ण बरे होण्याचा दर अजूनही ९९ टक्क्यांच्या जवळ आहे. पण कोविडच्या प्रकरणांमध्ये दररोज होणारी वाढ चिंता वाढवत आहे. अशातच तज्ज्ञांनी दिलासादायक गोष्ट सांगितली आहे.

जाणकारांनी दिला दिलासा

कोविडच्या शेवटच्या तीन लाटांमध्येही, जेव्हा प्रकरणे वाढली, तेव्हा काही महिन्यांनंतर कोरोनाने उच्चांक गाठला होता. तिसर्‍या लाटेत उच्चांक (पीक) फार लवकर गाठला गेला नाही. त्या लाटेत ना हॉस्पिटलायझेशन झाले, ना मृत्यूच्या घटना वाढल्या. तज्ज्ञ सांगतात, "यावेळी वाढणारी प्रकरणे ही नवीन लाट मूळीच नाही. कोविडच्या प्रकरणांमध्ये असलेली छोटीशी उडी आहे, जी काही दिवसांनी कमी होईल." दिल्लीतील एमडी मेडिसिन आणि कोविड तज्ज्ञ डॉ. कवलजीत सिंग म्हणतात, "कोरोनाचे रुग्ण काही दिवस वाढतील. सध्या संसर्ग पसरत आहे. पुढील काही दिवस केसेस वाढतील. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्याच्या सुरूवातीस, प्रकरणे कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत केसेस नक्कीच वाढतील, पण त्यांचा वेग कमीच राहील. ज्यांना आधीच गंभीर आजार आहे किंवा जे वृद्ध रुग्ण आहेत त्यांनाच जास्त संसर्ग होईल. त्यांनी काळजी घ्यायला हवी."

डॉ. सिंग म्हणतात, "व्हायरसचा पॅटर्न तीन महिन्यांपूर्वी होता तसाच आहे. त्यानंतरही प्रकरणे तशीच वाढत होती. या वेळी इन्फ्लूएंझाच्या भीतीने लोक हॉस्पिटलमध्ये जात आहेत. यादरम्यान त्यांची कोविड चाचणीही केली जात आहे. त्यामुळे कोविडची आणखी प्रकरणे समोर येत आहेत."

घाबरण्याची गरज नाही!

AIIMS नवी दिल्ली येथील मेडिसिन विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांच्या मते, "कोरोनाची प्रकरणे वाढत असली तरी घाबरण्यासारखे काही नाही. देशात कोविड विरुद्ध पाळत ठेवणारी यंत्रणा चांगली आहे. त्यामुळे जरी लोकांना कोविडला हलके न घेण्याचा आणि प्रतिबंधाच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जात असला तरी त्याचा परिणाम फार घातक नाही. पण असे असले तरी मास्क वापरण्याची खात्री करा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा."

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत