शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

Covid-19 ची वाढती रूग्णसंख्या वाढवते चिंता, पण तज्ज्ञ म्हणतात- 'नो टेन्शन, फक्त..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 17:01 IST

Covid-19 च्या 'टेन्शन'मध्ये भारतीयांसाठी आली दिलासा देणारी बातमी!

देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 11 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि कर्नाटकात सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. देशातील एकूण 14 राज्यांमध्ये रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. काही आठवड्यांत, संसर्गाचे प्रमाण सुमारे चार पटीने वाढले आहे. दिल्लीतील दोन जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचा दर १३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. कोविडमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही थोडे वाढले आहे. देशात दररोज पॉझिटिव्हीटी रेटही वाढत आहे. मात्र यात दिलासादायक बाब म्हणजे रूग्ण बरे होण्याचा दर अजूनही ९९ टक्क्यांच्या जवळ आहे. पण कोविडच्या प्रकरणांमध्ये दररोज होणारी वाढ चिंता वाढवत आहे. अशातच तज्ज्ञांनी दिलासादायक गोष्ट सांगितली आहे.

जाणकारांनी दिला दिलासा

कोविडच्या शेवटच्या तीन लाटांमध्येही, जेव्हा प्रकरणे वाढली, तेव्हा काही महिन्यांनंतर कोरोनाने उच्चांक गाठला होता. तिसर्‍या लाटेत उच्चांक (पीक) फार लवकर गाठला गेला नाही. त्या लाटेत ना हॉस्पिटलायझेशन झाले, ना मृत्यूच्या घटना वाढल्या. तज्ज्ञ सांगतात, "यावेळी वाढणारी प्रकरणे ही नवीन लाट मूळीच नाही. कोविडच्या प्रकरणांमध्ये असलेली छोटीशी उडी आहे, जी काही दिवसांनी कमी होईल." दिल्लीतील एमडी मेडिसिन आणि कोविड तज्ज्ञ डॉ. कवलजीत सिंग म्हणतात, "कोरोनाचे रुग्ण काही दिवस वाढतील. सध्या संसर्ग पसरत आहे. पुढील काही दिवस केसेस वाढतील. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्याच्या सुरूवातीस, प्रकरणे कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत केसेस नक्कीच वाढतील, पण त्यांचा वेग कमीच राहील. ज्यांना आधीच गंभीर आजार आहे किंवा जे वृद्ध रुग्ण आहेत त्यांनाच जास्त संसर्ग होईल. त्यांनी काळजी घ्यायला हवी."

डॉ. सिंग म्हणतात, "व्हायरसचा पॅटर्न तीन महिन्यांपूर्वी होता तसाच आहे. त्यानंतरही प्रकरणे तशीच वाढत होती. या वेळी इन्फ्लूएंझाच्या भीतीने लोक हॉस्पिटलमध्ये जात आहेत. यादरम्यान त्यांची कोविड चाचणीही केली जात आहे. त्यामुळे कोविडची आणखी प्रकरणे समोर येत आहेत."

घाबरण्याची गरज नाही!

AIIMS नवी दिल्ली येथील मेडिसिन विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांच्या मते, "कोरोनाची प्रकरणे वाढत असली तरी घाबरण्यासारखे काही नाही. देशात कोविड विरुद्ध पाळत ठेवणारी यंत्रणा चांगली आहे. त्यामुळे जरी लोकांना कोविडला हलके न घेण्याचा आणि प्रतिबंधाच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला जात असला तरी त्याचा परिणाम फार घातक नाही. पण असे असले तरी मास्क वापरण्याची खात्री करा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा."

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत