शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

सुशासन आणि लाभार्थ्यांनी दिला भाजपला विक्रमी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 06:12 IST

राष्ट्रीय स्तरावर आप बनू शकतो मुख्य विरोधी पक्षासाठी काँग्रेसला पर्याय, हाती आलेला विजय काँग्रेसने आपसातील लढाईने दूर लोटला, १९८५ नंतर यूपीत एका पक्षाचे पुन्हा सरकार

- शरद गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने निवडणुका लढण्याची नवीन परिभाषा लिहिली तर आम आदमी पार्टीने सुशासनाला मुख्य निवडणूक मुद्दा बनविला. सर्वाधिक नुकसान काँग्रेसला झाले तर सर्वाधिक फायदा भाजप व आपचा झाला.

पाचही राज्यांतील निकाल ऐतिहासिक राहिले आहेत. १९८५ नंतर प्रथमच उत्तर प्रदेशात एखाद्या पक्षाचे सरकार पुन्हा निवडून आलेले आहे. १९९९ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर उत्तराखंडमध्येही प्रथमच एखाद्या पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेवर येत आहे. पंजाबमध्ये प्रथमच अकाली दल व काँग्रेसशिवाय अन्य एखाद्या पक्षाचे सरकार सत्तेत येत आहे. गोवा व मणिपूरमध्येही भाजप आपली सरकारे वाचविण्यात यशस्वी झाले आहे.

उत्तराखंडमध्ये ७० टक्के जागा जिंकल्या तरी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव होणे याचा अर्थ भाजपला मिळालेला विजय राज्य सरकारांच्या प्रदर्शनामुळे नव्हेतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला, असा काढला जात आहे. उत्तर प्रदेशात जाट, ब्राह्मण यांच्याबरोबरच कुर्मी, मौर्य, राजभर, चौहान यासारख्या जाती व बेरोजगार युवकांची नाराजी असतानाही भाजपने जोरदार यश मिळविले आहे. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या रॅलींमध्ये जसा उत्साह होता, तसा उत्साह सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या रॅलींमध्ये होता. केंद्र व राज्य सरकारांनी चालविलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांनी उत्तर प्रदेशात अशी काही ‘व्होट बँक’ उभी केली की, त्यावर ना जातीय समीकरणाचा परिणाम झाला ना धर्माशी संबंधित भावनात्मक मुद्द्यांचा.

अंतर्गत कलहाने नाव बुडालीपंजाब व उत्तराखंडच्या काँग्रेसमधील अंतर्गत कहलामुळे ही स्थिती झाली. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, माजी अध्यक्ष सुनील जाखड व मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यातील मतभेदांनी पंजाबमध्ये काँग्रेसची नाव बुडविली. तर उत्तराखंडमध्ये माजी अध्यक्ष प्रीतम सिंह व केंद्रीय प्रभारी देवेंद्र यादव यांच्या हस्तक्षेपामुळे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हरीश रावत एवढे नाराज झाले की, त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली होती. ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपानंतरही मतभेद दूर झाले नव्हते.

राष्ट्रीय राजकारणावर परिणाम राष्ट्रीय राजकारणात आम आदमी पार्टी हळूहळू काँग्रेसची जागा घेत आहे का, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. पंजाबमध्ये पक्षाला ४२ टक्के मते मिळाली तर उत्तराखंडमध्ये एकही जागा वाट्याला आली नसली तरी ३.३७ टक्के मते मिळाली आहेत. गोव्यात ७ टक्के मते घेऊन दोन जागा जिंकल्या आहेत.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२