शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सुशासन आणि लाभार्थ्यांनी दिला भाजपला विक्रमी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 06:12 IST

राष्ट्रीय स्तरावर आप बनू शकतो मुख्य विरोधी पक्षासाठी काँग्रेसला पर्याय, हाती आलेला विजय काँग्रेसने आपसातील लढाईने दूर लोटला, १९८५ नंतर यूपीत एका पक्षाचे पुन्हा सरकार

- शरद गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने निवडणुका लढण्याची नवीन परिभाषा लिहिली तर आम आदमी पार्टीने सुशासनाला मुख्य निवडणूक मुद्दा बनविला. सर्वाधिक नुकसान काँग्रेसला झाले तर सर्वाधिक फायदा भाजप व आपचा झाला.

पाचही राज्यांतील निकाल ऐतिहासिक राहिले आहेत. १९८५ नंतर प्रथमच उत्तर प्रदेशात एखाद्या पक्षाचे सरकार पुन्हा निवडून आलेले आहे. १९९९ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर उत्तराखंडमध्येही प्रथमच एखाद्या पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेवर येत आहे. पंजाबमध्ये प्रथमच अकाली दल व काँग्रेसशिवाय अन्य एखाद्या पक्षाचे सरकार सत्तेत येत आहे. गोवा व मणिपूरमध्येही भाजप आपली सरकारे वाचविण्यात यशस्वी झाले आहे.

उत्तराखंडमध्ये ७० टक्के जागा जिंकल्या तरी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव होणे याचा अर्थ भाजपला मिळालेला विजय राज्य सरकारांच्या प्रदर्शनामुळे नव्हेतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला, असा काढला जात आहे. उत्तर प्रदेशात जाट, ब्राह्मण यांच्याबरोबरच कुर्मी, मौर्य, राजभर, चौहान यासारख्या जाती व बेरोजगार युवकांची नाराजी असतानाही भाजपने जोरदार यश मिळविले आहे. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या रॅलींमध्ये जसा उत्साह होता, तसा उत्साह सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या रॅलींमध्ये होता. केंद्र व राज्य सरकारांनी चालविलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांनी उत्तर प्रदेशात अशी काही ‘व्होट बँक’ उभी केली की, त्यावर ना जातीय समीकरणाचा परिणाम झाला ना धर्माशी संबंधित भावनात्मक मुद्द्यांचा.

अंतर्गत कलहाने नाव बुडालीपंजाब व उत्तराखंडच्या काँग्रेसमधील अंतर्गत कहलामुळे ही स्थिती झाली. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू, माजी अध्यक्ष सुनील जाखड व मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यातील मतभेदांनी पंजाबमध्ये काँग्रेसची नाव बुडविली. तर उत्तराखंडमध्ये माजी अध्यक्ष प्रीतम सिंह व केंद्रीय प्रभारी देवेंद्र यादव यांच्या हस्तक्षेपामुळे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हरीश रावत एवढे नाराज झाले की, त्यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शविली होती. ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपानंतरही मतभेद दूर झाले नव्हते.

राष्ट्रीय राजकारणावर परिणाम राष्ट्रीय राजकारणात आम आदमी पार्टी हळूहळू काँग्रेसची जागा घेत आहे का, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. पंजाबमध्ये पक्षाला ४२ टक्के मते मिळाली तर उत्तराखंडमध्ये एकही जागा वाट्याला आली नसली तरी ३.३७ टक्के मते मिळाली आहेत. गोव्यात ७ टक्के मते घेऊन दोन जागा जिंकल्या आहेत.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२