शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

डोक्यावर सोन्याच्या पादुका, हजारो किमी प्रवास; हैदराबादहून 'अयोध्येची पायी वारी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 17:39 IST

हैदराबाद ते अयोध्या असा हजारो किमीचा प्रवास करुन श्रीनिवास शास्त्री अयोध्येला पायी निघाले आहेत.

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, २२ जानेवारी रोजी अयोध्येत पोहोचण्यासाठी रामभक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येकडे निघाले आहेत. अनेक वर्षांच्या संघर्षांची आणि प्रतिक्षेचं फलित म्हणजे २२ जानेवारीचा सोहळा आहे. राम मंदिर उभारणीसाठी कारसेवा दिलेल्या रामभक्तांसाठी या सोहळ्याचं वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे, कुणी पायी, कुणी दुचाकीवर, कुणी रेल्वेने, तर कोणी विमानाने अयोध्येतील या सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार आहे.  हैदराबादमधील एका रामभक्ताने  हजारो  किमीचा पायी प्रवास करुन अयोध्येची वाट धरली आहे. चल्ला श्रीनिवास शास्त्री असं त्यांचं नाव असून ते ६४ वर्षांचे आहेत. 

हैदराबाद ते अयोध्या असा  हजारो किमीचा प्रवास करुन श्रीनिवास शास्त्री अयोध्येला पायी निघाले आहेत. आपल्या डोक्यावर सोन्याच्या पादुका ठेऊन त्यांची ही यात्रा सुरू झाली आहे. या पादुकांना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. त्यामुळे, या पादुकांची किंमत ६४ लाख रुपये आहे. यापूर्वी शास्त्रींनी चांदीच्या ५ वीटा राम मंदिरासाठी दानपेटीत अर्पण केल्या आहेत. ते रामेश्वरम मार्गाने अयोध्येची यात्रा करत आहेत. आपल्याकडील सोन्याच्या चरण पादुका ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे देणार आहेत.  

आपल्या पायी यात्रेत प्रभू श्रीरामांनी ज्या ठिकाणी शिवलिंग स्थापन केले, त्या प्रत्येक शिवलिंगाचे दर्शन घेऊनच ते पुढे प्रवास करणार आहेत. २० जुलै रोजी त्यांनी आपली अयोध्या यात्रा सुरू केली होती. मात्र, मध्येच त्यांना युकेला जावे लागले. त्यामुळे, त्यांची यात्रा थांबली होती. मात्र, तेथून परतल्यानंतर त्यांनी पुन्हा यात्रा सुरू केली. सध्या ते, उत्तर प्रदेशपासून २७२ किमी दूर चित्रकूट येथे आहेत. ओडिशातील पुरी, महाराष्ट्रातील त्र्यंबक, गुजरातचे द्वारका मंदिरात दर्शन करुन ते अयोध्येला पोहोचत आहेत. पुढील १० दिवसांत अयोध्येत पोहोचण्याचं त्यांचं लक्ष्य आहे. त्यांच्यासोबत त्यांचे ५ सहकारीही आहेत. 

शास्त्री यांच्या वडिलांनी अयोध्येसाठी कारसेवा केला होती. ते हनुमानाचे निस्सीम भक्त होते. अयोध्येत राम मंदिर बनलं पाहिजे, अशी त्यांनी मनोकामना होती. त्यामुळे, वडिलांची इच्छा पूर्तीसाठी मी अयोध्येची वारी करत असल्याचं शास्त्रींनी सांगितलं. शास्त्री हे अयोध्या भाग्यनगर फाऊंडेशनचे संस्थापकही आहेत. अयोध्येत घर घेऊन तिथेच स्थायिक होण्याचा त्यांचा मानस आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याhyderabad-pcहैदराबादRam Mandirराम मंदिर