भाषा हा वैश्विकतेचा पासवर्ड (जोड १)
By Admin | Updated: March 21, 2015 00:15 IST2015-03-20T22:39:43+5:302015-03-21T00:15:25+5:30
नव्या लेखकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, आपल्या लेखनाला मिळणार्या प्रतिसादावर लक्ष ठेवून त्याचा सकारात्मक विचार करायला हवा. आपला देश हा बहुसांस्कृतिक असून, त्या दृष्टीने आपल्या भाषाही बहुविध व्हाव्यात. त्या तुंबून राहायला नकोत. विद्यापीठांमध्ये त्याबाबत आदान-प्रदान व्हायला हवे. माधवी धारणकर यांनी प्रास्ताविक केले. मनोडॉ. माधुरी सोनवणे, डॉ. मधुकर शेवाळे, विजया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नागार्जुन वाडेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले.

भाषा हा वैश्विकतेचा पासवर्ड (जोड १)
नव्या लेखकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, आपल्या लेखनाला मिळणार्या प्रतिसादावर लक्ष ठेवून त्याचा सकारात्मक विचार करायला हवा. आपला देश हा बहुसांस्कृतिक असून, त्या दृष्टीने आपल्या भाषाही बहुविध व्हाव्यात. त्या तुंबून राहायला नकोत. विद्यापीठांमध्ये त्याबाबत आदान-प्रदान व्हायला हवे. माधवी धारणकर यांनी प्रास्ताविक केले. मनोडॉ. माधुरी सोनवणे, डॉ. मधुकर शेवाळे, विजया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नागार्जुन वाडेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले.
इन्फो :
तेथून न जेवताच निघालो...
कुलगुरू डॉ. साळुंखे यांनीही अध्यक्षीय मनोगतात पाश्चात्त्यांवर टीका केली. आपण ऑस्ट्रेलियात असताना एका कुटुंबाने जेवायला बोलावले. त्यांनी भारताची वाईट प्रतिमा निर्माण होईल, अशी छायाचित्रे आपल्याला दाखवली. त्यामुळे आपण तेथून न जेवताच बाहेर पडलो, असे ते म्हणाले. एका भाषेतील साहित्य हे दुसर्या भाषेत पोहोचायला हवे. ईशान्येकडील राज्यांमध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर जवळपास समान असून, तेथे विवाहासारखे समारंभ अत्यंत कमी खर्चात साजरे केले जातात. त्यांचे पुरोगामित्व महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
भाषांमध्ये नाते निर्माण व्हावे : अरुण साधू
साधू यांनी भाषेबद्दल सखोल चिंतन केले. जागतिकीकरणामुळे देशातील प्रादेशिक भाषा व बहुसांस्कृतिकतेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याला अमेरिका, स्वीडनमधील लेखकांची नावे माहीत असतात; पण तमिळनाडूतील मुरुगन या लेखकाचा छळ सुरू झाल्यावरच तो आपल्याला माहीत होतो. मराठी, हिंदी वा बंगालीमधील मोजकेच देशी साहित्यिक आपण ओळखत असतो. सध्या प्रादेशिक भाषांतील आदानप्रदान पूर्णत: थांबले असून, ते फक्त नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी या संस्थांपुरतेच मर्यादित राहिले आहे. लोकशाहीचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी सर्व भाषांमध्ये जवळचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे. अशा संस्था निर्माण व्हाव्यात. स्थानिक भाषेतून वैश्विक अनुभव लिहिणारे लोक सर्व भाषांत आहेत. आपण फक्त डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. तथापि, इंग्रजीचा तिटकाराही करता कामा नये, असेही ते म्हणाले.
फोटो आहे : २० पीएचएमआर १०६
कॅप्शन : नागालॅँड येथील ज्येष्ठ साहित्यिक तेमसुला आओ यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करताना अरुण साधू. समवेत पंडित गवळी, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. जगदीश अरोरा, माधवी धारणकर.