शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत वाढ; देशभरात १ हजार ५६२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:43 IST

२०१९ या वर्षाची सातवे उष्ण वर्ष म्हणून नोंद

मुंबई : जागतिक तापमानवाढीचा धोका दिवसागणिक वाढतच असून, वेगाने बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून नैसर्गिक आपत्तीही ओढविण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे उष्ण वर्षांच्या नोंदीही वाढतच असून, २०१९ या वर्षाची सातवे उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली असतानाच या वर्षात घडलेल्या आपत्कालीन घटनांत महाराष्ट्रात २३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैव म्हणजे आपत्कालीन दुर्घटनांमुळे राष्ट्रीय स्तरावरील मनुष्यहानीचा विचार करता अशा दुर्घटनांत १ हजार ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारत सरकारचे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय व भारतीय हवामान शास्त्र विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, २ जुलै ते २६ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात आलेल्या महापुरासह मुसळधार पावसामुळे १३६ जणांचा मृत्यू झाला. २० मार्च ते ३० ऑक्टोबर या कालावधीतवीज कोसळून झालेल्या दुर्घटनांत ५१ जणांचा मृत्यू झाला. २ एप्रिल ते ९ जून या कालावधीत आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ४४ जणांचामृत्यू झाला. आपत्कालीन घटनांमध्ये प्रामुख्याने हिमस्खलन, महापूर, मुसळधार पाऊस, वादळे, वीज कोसळणे, उष्णतेच्या लाटांसह शीत लहरीसारख्या घटनांचा समावेश आहे.२०१९ साली घडलेल्या आपत्कालीन घटना आणि मनुष्यहानीजम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे ३३ जणांचा मृत्यू,  राजस्थानमध्ये महापुरासह मुसळधार पावसामुळे ८० तर वादळामुळे १४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशात वीज कोसळून २४ जणांचा मृत्यू, कर्नाटकात महापुरामुळे ४३ जणांचा मृत्यू, केरळमध्ये महापुरामुळे ८६ जणांचा मृत्यूलेहमध्ये हिमस्खलनामुळे १८ जणांचा मृत्यू, हिमाचल प्रदेशात महापुरामुळे २७ जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशात महापुरामुळे १०७ तर शीत लहरीमुळे २८ जणांचा मृत्यू, बिहारमध्ये आलेल्या महापुराने ३०६, तर वादळामुळे ७१ जणांचा आणि उष्णतेच्या लाटेने २९२ जणांचा मृत्यूझारखंडमध्ये वादळाने १२५ तर उष्णतेच्या लाटेने १३ जणांचा मृत्यू ओडिशामध्ये महापुरामुळे ६४ जणांचा मृत्यू

टॅग्स :Heat Strokeउष्माघात