शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत वाढ; देशभरात १ हजार ५६२ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:43 IST

२०१९ या वर्षाची सातवे उष्ण वर्ष म्हणून नोंद

मुंबई : जागतिक तापमानवाढीचा धोका दिवसागणिक वाढतच असून, वेगाने बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून नैसर्गिक आपत्तीही ओढविण्याचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे उष्ण वर्षांच्या नोंदीही वाढतच असून, २०१९ या वर्षाची सातवे उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली असतानाच या वर्षात घडलेल्या आपत्कालीन घटनांत महाराष्ट्रात २३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्दैव म्हणजे आपत्कालीन दुर्घटनांमुळे राष्ट्रीय स्तरावरील मनुष्यहानीचा विचार करता अशा दुर्घटनांत १ हजार ५६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारत सरकारचे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय व भारतीय हवामान शास्त्र विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, २ जुलै ते २६ सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात आलेल्या महापुरासह मुसळधार पावसामुळे १३६ जणांचा मृत्यू झाला. २० मार्च ते ३० ऑक्टोबर या कालावधीतवीज कोसळून झालेल्या दुर्घटनांत ५१ जणांचा मृत्यू झाला. २ एप्रिल ते ९ जून या कालावधीत आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे ४४ जणांचामृत्यू झाला. आपत्कालीन घटनांमध्ये प्रामुख्याने हिमस्खलन, महापूर, मुसळधार पाऊस, वादळे, वीज कोसळणे, उष्णतेच्या लाटांसह शीत लहरीसारख्या घटनांचा समावेश आहे.२०१९ साली घडलेल्या आपत्कालीन घटना आणि मनुष्यहानीजम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलनामुळे ३३ जणांचा मृत्यू,  राजस्थानमध्ये महापुरासह मुसळधार पावसामुळे ८० तर वादळामुळे १४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशात वीज कोसळून २४ जणांचा मृत्यू, कर्नाटकात महापुरामुळे ४३ जणांचा मृत्यू, केरळमध्ये महापुरामुळे ८६ जणांचा मृत्यूलेहमध्ये हिमस्खलनामुळे १८ जणांचा मृत्यू, हिमाचल प्रदेशात महापुरामुळे २७ जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशात महापुरामुळे १०७ तर शीत लहरीमुळे २८ जणांचा मृत्यू, बिहारमध्ये आलेल्या महापुराने ३०६, तर वादळामुळे ७१ जणांचा आणि उष्णतेच्या लाटेने २९२ जणांचा मृत्यूझारखंडमध्ये वादळाने १२५ तर उष्णतेच्या लाटेने १३ जणांचा मृत्यू ओडिशामध्ये महापुरामुळे ६४ जणांचा मृत्यू

टॅग्स :Heat Strokeउष्माघात