शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जगभरात सात वर्षांमध्ये वाघांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 15:27 IST

अस्तित्वाला असलेला धोका मात्र अद्यापही कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरात गेल्या सात वर्षांमध्ये वाघांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. याबाबत भारत, नेपाळमध्ये उत्तम स्थिती आहे. वाघांची संख्या वाढली असली तरी त्यांच्या अस्तित्वाला असलेला धोका अद्याप कमी झालेला नाही, असा निष्कर्ष इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने केलेल्या एका पाहणीतून काढण्यात आला आहे. 

२०१५ साली जगभरात ३२०० वाघ होते. तो आकडा आता ४२०० वर गेला आहे. जगातील ७६ टक्के वाघ दक्षिण आशियामध्ये आढळून येते. भारत व नेपाळमध्ये वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रशियामध्ये वाघांच्या आकडेवारीत फारसा फरक पडलेला नाही. 

‘भारतातील वाघांची वाढती संख्या ही चांगली घटना’वाघविषयक तज्ज्ञ डॉ. जॉन गुडरिच यांनी सांगितले की, भारत, नेपाळ, थायलंडमधील अभयारण्यांमध्ये वाघांची वाढती संख्या ही चांगली बातमी आहे. मागील दशकांत वाघांच्या संख्येत जशी वाढ झाली तशीच स्थिती येत्या सात-आठ वर्षांतही कायम राहायला हवी. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने सध्या वाघाचा समावेश अस्तित्वाला धोका असलेल्या प्राण्यांच्या यादीत केला आहे.

अजूनही लक्ष्य पूर्ण झाले नाहीवाघांच्या घटत्या संख्येबाबत चर्चा करण्यासाठी २०१० साली रशियामध्ये जागतिक वाघ परिषद झाली होती. २०२२पर्यंत जगभरात वाघांचा आकडा ६ हजारांवर नेण्याचे लक्ष्य या परिषदेत ठरविण्यात आले होते. यंदाच्या वर्षी दुसरी जागतिक वाघ परिषद होणार आहे. त्यात वाघांची संख्या वाढविण्याबाबत आणखी उपाययोजनांवर चर्चा होईल.

जगभरातील वाघांची स्थिती शंभर वर्षांपूर्वी वाघांची संख्या १ लाख होती. ती आता ४२०० इतकी आहे.nभारतातील मणिपूर, जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, हिमाचल प्रदेश, नागालँड येथून वाघाचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती आहे.nअफगाणिस्तान, अझरबैजान, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, उझबेकिस्तान, तुर्कस्थान, पाकिस्तान यासहित अनेक देशांतून वाघांचे अस्तित्व संपले आहे.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल