शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

जगभरात सात वर्षांमध्ये वाघांच्या संख्येत 40 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 15:27 IST

अस्तित्वाला असलेला धोका मात्र अद्यापही कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरात गेल्या सात वर्षांमध्ये वाघांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. याबाबत भारत, नेपाळमध्ये उत्तम स्थिती आहे. वाघांची संख्या वाढली असली तरी त्यांच्या अस्तित्वाला असलेला धोका अद्याप कमी झालेला नाही, असा निष्कर्ष इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने केलेल्या एका पाहणीतून काढण्यात आला आहे. 

२०१५ साली जगभरात ३२०० वाघ होते. तो आकडा आता ४२०० वर गेला आहे. जगातील ७६ टक्के वाघ दक्षिण आशियामध्ये आढळून येते. भारत व नेपाळमध्ये वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रशियामध्ये वाघांच्या आकडेवारीत फारसा फरक पडलेला नाही. 

‘भारतातील वाघांची वाढती संख्या ही चांगली घटना’वाघविषयक तज्ज्ञ डॉ. जॉन गुडरिच यांनी सांगितले की, भारत, नेपाळ, थायलंडमधील अभयारण्यांमध्ये वाघांची वाढती संख्या ही चांगली बातमी आहे. मागील दशकांत वाघांच्या संख्येत जशी वाढ झाली तशीच स्थिती येत्या सात-आठ वर्षांतही कायम राहायला हवी. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेने सध्या वाघाचा समावेश अस्तित्वाला धोका असलेल्या प्राण्यांच्या यादीत केला आहे.

अजूनही लक्ष्य पूर्ण झाले नाहीवाघांच्या घटत्या संख्येबाबत चर्चा करण्यासाठी २०१० साली रशियामध्ये जागतिक वाघ परिषद झाली होती. २०२२पर्यंत जगभरात वाघांचा आकडा ६ हजारांवर नेण्याचे लक्ष्य या परिषदेत ठरविण्यात आले होते. यंदाच्या वर्षी दुसरी जागतिक वाघ परिषद होणार आहे. त्यात वाघांची संख्या वाढविण्याबाबत आणखी उपाययोजनांवर चर्चा होईल.

जगभरातील वाघांची स्थिती शंभर वर्षांपूर्वी वाघांची संख्या १ लाख होती. ती आता ४२०० इतकी आहे.nभारतातील मणिपूर, जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, हिमाचल प्रदेश, नागालँड येथून वाघाचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती आहे.nअफगाणिस्तान, अझरबैजान, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, उझबेकिस्तान, तुर्कस्थान, पाकिस्तान यासहित अनेक देशांतून वाघांचे अस्तित्व संपले आहे.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल