शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Global Tiger Day: देशात वाघांची संख्या २०२२ पर्यंत दुप्पट करण्याकडे खंबीर वाटचाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 07:57 IST

२९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन. यानिमित्त राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे प्रमुख आणि प्रसिद्ध व्याघ्रतज्ज्ञ आणि वरिष्ठ भारतीय वन सेवेतील अधिकारी डॉ. एस. पी. यादव यांची मुलाखत.

ठळक मुद्देआर्थिक तरतूदही वाढली, संरक्षणाखालील क्षेत्र सुमारे ३,४०० चौरस किलोमीटरने विस्तारलेदेशात सध्या सुमारे तीन हजार जंगली वाघ असून त्यांची शिकारही लक्षणीय संख्येत कमी करण्यात आली आहेतमिळनाडूत नुकतेच नवे व्याघ्र राखीव क्षेत्र निर्माण केले

अभिलाष खांडेकरनवी दिल्ली : विस्तीर्ण भारतात वाघांचे जतन व संरक्षण करण्यात अनेक आव्हाने असली तरी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय गाठण्याच्या दिशेने खंबीरपणे चालत आहे. हे लक्ष्य २०१० मध्ये सेंट पीटसबर्ग परिषदेत निश्चित करण्यात आलेले आहे.

‘लोकमत’ शी बोलताना डॉ. एस. पी. यादव म्हणाले की, “ जगात वाघ जर कुठे सर्वात सुरक्षित असतील तर तो भारत देश आहे.” दिल्लीस्थित एनटीसीएचे डॉ. यादव सदस्य सचिव आहेत. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत वाघांचे संवर्धन करण्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यात नव्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांची भर पडली आहे. एनटीसीएच्या अर्थसंकल्पात अनेक पट (१९५ कोटी रुपयांवरून चालू आर्थिक वर्षात २५० कोटी रुपये) वाढ झाली आणि राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाला सुरक्षितता उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात केंद्रीय देखरेख मंडळाला यश आले आहे.”

देशात सध्या सुमारे तीन हजार जंगली वाघ असून त्यांची शिकारही लक्षणीय संख्येत कमी करण्यात आली आहे. वाघांची शिकार १०० टक्के थांबली असा दावा मी करणार नाही. परंतु, राज्य वन विभाग, एनटीसीए, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या अनेक उपायांनी वाघांचे बळी रोखण्यात यश मिळवले आहे, असे यादव ठामपणे म्हणाले.

व्याघ्र संरक्षणात आव्हाने कोणती, असे विचारल्यावर डॉ. यादव म्हणाले,“आमच्या देशात वाघांच्या वसतिस्थानांचे तुकडे तुकडे होणे आणि वाघांच्या वसतिस्थानातील खेड्यांना हलवणे ही मुख्य आव्हाने आहेत. असे असले तरी आम्ही तमिळनाडूत नुकतेच नवे व्याघ्र राखीव क्षेत्र निर्माण केले, असे ते म्हणाले.  संरक्षणाखालील क्षेत्रात सुमारे ३,४०० चौरस किलोमीटरची (आता एकूण ७३,७६५.५७ चौरस किलोमीटर भाग) वाढ झाली आहे. 

दक्षिण आफ्रिकेतून चित्ता आयात करणारडॉ. यादव म्हणाले की, “वाघांसाठीची राखीव क्षेत्रांची व्यवस्था कशी करावी या शास्रात खूप वेगाने बदल होत आहेत आणि अनेक नव्या व्यवस्थापकीय आणि मूल्यमापनाच्या व्यवस्था व्यवहारात येत आहेत म्हणून भारतातील वाघांना आज उत्तम असे वसतिस्थान लाभले आहे. एनटीसीएनेही प्रथमच देशातील बिबट्यांची मोजणी केली असून हे प्राधिकरण दक्षिण आफ्रिकेतून आता चित्ता आयात करण्यात व्यस्त आहे.”

टॅग्स :Tigerवाघ