शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
6
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
7
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
8
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
9
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
10
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
11
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
12
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
13
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
15
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
16
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
17
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
18
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
19
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
20
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  

Global Tiger Day: देशात वाघांची संख्या २०२२ पर्यंत दुप्पट करण्याकडे खंबीर वाटचाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 07:57 IST

२९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन. यानिमित्त राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे प्रमुख आणि प्रसिद्ध व्याघ्रतज्ज्ञ आणि वरिष्ठ भारतीय वन सेवेतील अधिकारी डॉ. एस. पी. यादव यांची मुलाखत.

ठळक मुद्देआर्थिक तरतूदही वाढली, संरक्षणाखालील क्षेत्र सुमारे ३,४०० चौरस किलोमीटरने विस्तारलेदेशात सध्या सुमारे तीन हजार जंगली वाघ असून त्यांची शिकारही लक्षणीय संख्येत कमी करण्यात आली आहेतमिळनाडूत नुकतेच नवे व्याघ्र राखीव क्षेत्र निर्माण केले

अभिलाष खांडेकरनवी दिल्ली : विस्तीर्ण भारतात वाघांचे जतन व संरक्षण करण्यात अनेक आव्हाने असली तरी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय गाठण्याच्या दिशेने खंबीरपणे चालत आहे. हे लक्ष्य २०१० मध्ये सेंट पीटसबर्ग परिषदेत निश्चित करण्यात आलेले आहे.

‘लोकमत’ शी बोलताना डॉ. एस. पी. यादव म्हणाले की, “ जगात वाघ जर कुठे सर्वात सुरक्षित असतील तर तो भारत देश आहे.” दिल्लीस्थित एनटीसीएचे डॉ. यादव सदस्य सचिव आहेत. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत वाघांचे संवर्धन करण्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यात नव्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांची भर पडली आहे. एनटीसीएच्या अर्थसंकल्पात अनेक पट (१९५ कोटी रुपयांवरून चालू आर्थिक वर्षात २५० कोटी रुपये) वाढ झाली आणि राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाला सुरक्षितता उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात केंद्रीय देखरेख मंडळाला यश आले आहे.”

देशात सध्या सुमारे तीन हजार जंगली वाघ असून त्यांची शिकारही लक्षणीय संख्येत कमी करण्यात आली आहे. वाघांची शिकार १०० टक्के थांबली असा दावा मी करणार नाही. परंतु, राज्य वन विभाग, एनटीसीए, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या अनेक उपायांनी वाघांचे बळी रोखण्यात यश मिळवले आहे, असे यादव ठामपणे म्हणाले.

व्याघ्र संरक्षणात आव्हाने कोणती, असे विचारल्यावर डॉ. यादव म्हणाले,“आमच्या देशात वाघांच्या वसतिस्थानांचे तुकडे तुकडे होणे आणि वाघांच्या वसतिस्थानातील खेड्यांना हलवणे ही मुख्य आव्हाने आहेत. असे असले तरी आम्ही तमिळनाडूत नुकतेच नवे व्याघ्र राखीव क्षेत्र निर्माण केले, असे ते म्हणाले.  संरक्षणाखालील क्षेत्रात सुमारे ३,४०० चौरस किलोमीटरची (आता एकूण ७३,७६५.५७ चौरस किलोमीटर भाग) वाढ झाली आहे. 

दक्षिण आफ्रिकेतून चित्ता आयात करणारडॉ. यादव म्हणाले की, “वाघांसाठीची राखीव क्षेत्रांची व्यवस्था कशी करावी या शास्रात खूप वेगाने बदल होत आहेत आणि अनेक नव्या व्यवस्थापकीय आणि मूल्यमापनाच्या व्यवस्था व्यवहारात येत आहेत म्हणून भारतातील वाघांना आज उत्तम असे वसतिस्थान लाभले आहे. एनटीसीएनेही प्रथमच देशातील बिबट्यांची मोजणी केली असून हे प्राधिकरण दक्षिण आफ्रिकेतून आता चित्ता आयात करण्यात व्यस्त आहे.”

टॅग्स :Tigerवाघ