शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Global Tiger Day: देशात वाघांची संख्या २०२२ पर्यंत दुप्पट करण्याकडे खंबीर वाटचाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 07:57 IST

२९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन. यानिमित्त राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे प्रमुख आणि प्रसिद्ध व्याघ्रतज्ज्ञ आणि वरिष्ठ भारतीय वन सेवेतील अधिकारी डॉ. एस. पी. यादव यांची मुलाखत.

ठळक मुद्देआर्थिक तरतूदही वाढली, संरक्षणाखालील क्षेत्र सुमारे ३,४०० चौरस किलोमीटरने विस्तारलेदेशात सध्या सुमारे तीन हजार जंगली वाघ असून त्यांची शिकारही लक्षणीय संख्येत कमी करण्यात आली आहेतमिळनाडूत नुकतेच नवे व्याघ्र राखीव क्षेत्र निर्माण केले

अभिलाष खांडेकरनवी दिल्ली : विस्तीर्ण भारतात वाघांचे जतन व संरक्षण करण्यात अनेक आव्हाने असली तरी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय गाठण्याच्या दिशेने खंबीरपणे चालत आहे. हे लक्ष्य २०१० मध्ये सेंट पीटसबर्ग परिषदेत निश्चित करण्यात आलेले आहे.

‘लोकमत’ शी बोलताना डॉ. एस. पी. यादव म्हणाले की, “ जगात वाघ जर कुठे सर्वात सुरक्षित असतील तर तो भारत देश आहे.” दिल्लीस्थित एनटीसीएचे डॉ. यादव सदस्य सचिव आहेत. ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत वाघांचे संवर्धन करण्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यात नव्या व्याघ्र संवर्धन क्षेत्रांची भर पडली आहे. एनटीसीएच्या अर्थसंकल्पात अनेक पट (१९५ कोटी रुपयांवरून चालू आर्थिक वर्षात २५० कोटी रुपये) वाढ झाली आणि राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाला सुरक्षितता उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात केंद्रीय देखरेख मंडळाला यश आले आहे.”

देशात सध्या सुमारे तीन हजार जंगली वाघ असून त्यांची शिकारही लक्षणीय संख्येत कमी करण्यात आली आहे. वाघांची शिकार १०० टक्के थांबली असा दावा मी करणार नाही. परंतु, राज्य वन विभाग, एनटीसीए, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या अनेक उपायांनी वाघांचे बळी रोखण्यात यश मिळवले आहे, असे यादव ठामपणे म्हणाले.

व्याघ्र संरक्षणात आव्हाने कोणती, असे विचारल्यावर डॉ. यादव म्हणाले,“आमच्या देशात वाघांच्या वसतिस्थानांचे तुकडे तुकडे होणे आणि वाघांच्या वसतिस्थानातील खेड्यांना हलवणे ही मुख्य आव्हाने आहेत. असे असले तरी आम्ही तमिळनाडूत नुकतेच नवे व्याघ्र राखीव क्षेत्र निर्माण केले, असे ते म्हणाले.  संरक्षणाखालील क्षेत्रात सुमारे ३,४०० चौरस किलोमीटरची (आता एकूण ७३,७६५.५७ चौरस किलोमीटर भाग) वाढ झाली आहे. 

दक्षिण आफ्रिकेतून चित्ता आयात करणारडॉ. यादव म्हणाले की, “वाघांसाठीची राखीव क्षेत्रांची व्यवस्था कशी करावी या शास्रात खूप वेगाने बदल होत आहेत आणि अनेक नव्या व्यवस्थापकीय आणि मूल्यमापनाच्या व्यवस्था व्यवहारात येत आहेत म्हणून भारतातील वाघांना आज उत्तम असे वसतिस्थान लाभले आहे. एनटीसीएनेही प्रथमच देशातील बिबट्यांची मोजणी केली असून हे प्राधिकरण दक्षिण आफ्रिकेतून आता चित्ता आयात करण्यात व्यस्त आहे.”

टॅग्स :Tigerवाघ