शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

भारतात भुकेचं संकट गंभीर, हंगर इंडेक्समध्ये झाली घसरण; पाकिस्तानपेक्षाही वाईट परिस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 09:56 IST

एकीकडे आर्थिक आघाडीवर देशाची घसरण होत असताना जागतिक भूक सूचकांक (global hunger index) मध्येही देशाची मोठी घसरण झाली आहे.

नवी दिल्ली - एकीकडे आर्थिक आघाडीवर देशाची घसरण होत असताना जागतिक भूक सूचकांक (global hunger index) मध्येही देशाची मोठी घसरण झाली आहे. 117 देशांचा समावेश असलेल्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताला 102 वे स्थान मिळाले आहे. या यादीत असलेल्या दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताला शेवटचे स्थान मिळाले आहे. भारताव्यतिरिक्त इतर आशियाई देश या क्रमवारीत 66 ते 94 या क्रमांकांदरम्यान आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या क्रमवारीत पाकिस्तानही भारताच्या पुढे आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये समावेश असलेल्या ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) गटातील देशांचा विचार केल्यास या देशांमध्येही भारत खूप मागे आहे.  2015 मध्ये ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचे स्थान 93 व्या क्रमांकावर होते. त्यावेळी पाकिस्तानचे स्थान भारतापेक्षा खाली होते. मात्र यावेळी पाकिस्तानने भारतापेक्षा प्रगती करत 94 वा क्रमांक पटकावला आहे. 2014 ते 2018 या काळात एकत्रित करण्यात आलेल्या माहितीवरून ग्लोबल हंगर इंडेक्सची क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. एकत्रित करण्यात आलेल्या माहितीमध्ये विविध देशातील कुपोषित मुलांची संख्या, कमी वजन आणि वयाच्या तुलनेत कमी उंची असलेले पाच वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या आणि पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचा मृत्युदर यांचा समावेश असतो.    दरम्यान, या क्रमवारीत नेपाळने खूप चांगली प्रगती केली आहे. तर भारतामुळे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये दक्षिण आशियाची स्थिती आफ्रिकेमधील उपसहारा क्षेत्रापेक्षा वाईत झाली आहे. या अहवालानुसार भारतात 6 ते 23 महिने वयोगटातील केवळ 9.6 टक्के मुलांनाच किमान योग्य आहार उपलब्ध होतो. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालात हा आकडा केवळ 6.4 टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना 0 ते 100 गुण दिले जातात. यामध्ये 0 गुण हे सर्वोत्तम समजले जातात. त्याचा अर्थ देशात भुकेची स्थिती नाही, असा होतो.  तर 10 पेक्षा कमी गुण असणे म्हणजे त्या देशात भुकेची स्थिती फारशी गंभीर नाही असा अर्थ होतो. तर 20 ते 34.9 गुण भुकेचे गंभीर संकट दर्शवतात. 35 ते 49.9 गुण परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे दर्शवतात. तर 50 किंवा त्यापेक्षा अधिक गुण हे भुकेची परिस्थिती भयावह असल्याचे दर्शवतात.  

टॅग्स :IndiaभारतHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीयfoodअन्न