शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

"त्याच्याशिवाय माझं कोणीच नाही", 'ती' बोगद्याबाहेर पाहतेय भावाची वाट; मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 11:14 IST

Glacier Burst in Uttarakhand : उत्तराखंडमधील तपोवनातील हिमकडा कोसळल्याने तिथल्या एक बोगद्यातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं.

नवी दिल्ली - नंदादेवी या हिमालयीन शिखराजवळील हिमकडा कोसळून रविवारी आलेल्या जलप्रलयामुळे उत्तराखंडमध्ये धरण प्रकल्पावरील 203 कर्मचारी बेपत्ता असून 18 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती त्या राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिली आहे. उत्तराखंडमधील तपोवनातील हिमकडा कोसळल्याने (Glacier Burst in Uttarakhand) तिथल्या एक बोगद्यातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. त्यामुळे त्या बोगद्यात काम करणारे अनेक कर्मचारी अडकून पडले. बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान एक 34 वर्षीय व्यक्ती बोगद्याच्या बाहेर बसून आपला भाऊ सुखरूप रित्या बाहेर येईल याची वाट पाहत आहे. 

सती नेगी असं या महिलेचं नाव असून ती बोगद्याच्या बाहेर बसून आपल्या भावाची वाट पाहत आहे. सती नेगीने भावाशिवाय या जगात तिचं कोणीचं नसल्याचं म्हटलं आहे. सात वर्षांपूर्वीच सती यांच्या पतीचं निधन झालं आहे. तेव्हापासून त्या आपला भाऊ परमिंदर बिष्ट याच्याकडेच राहतात, तोच तिचा शेवटचा आधार आहे. मात्र आता या दुर्घटनेनंतर ती आपल्या भावाला पुन्हा भेटू शकेल का? ही भीती सतीला आता सतावते आहे. सतीचा तिचा भाऊ देखील एनटीपीसीच्या तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकल्याचं वाटत आहे. 1900 मीटर लांबीच्या या बोगद्यात 35 लोक अडकल्याचं बोललं जात आहे.

सतीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तिचं भावाशी शेवटचं बोलणं झालं. तो रविवारी काम संपवून गोपेश्वरमध्ये आपल्या कुटुंबास (पत्नी, मुले आणि आई) भेटायला जात असल्याचं त्याने सांगितलं. साधारण आठवडाभराची सुट्टी घेतल्यानंतर तो घरी येणार होता, मात्र त्याआधीट हे सर्व घडलं. रविवारी सकाळी हिमकडा कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच सती त्वरित तपोवनला रवाना झाली. सुमारे 2 तासांनंतर ती बोगद्याजवळ पोहोचली. सतीने तिचा भाऊ गेल्या 7 वर्षांपासून त्या साईटवर काम करत असल्याचं म्हटलं आहे. 

"लोक येथे येतात, फोटो काढतात आणि निघून जातात, पण माझ्या भावाचे काय?, त्याच्या मुलांचं, बायकोचं काय होईल?"

कोणताही अधिकारी त्यांना मदत करू शकत नाही असं सतीने म्हटलं आहे. लोक येथे येतात, फोटो काढतात आणि निघून जातात, पण माझ्या भावाचे काय?, त्याच्या मुलांचं, बायकोचं काय होईल?, असा सवालही सतीने उपस्थित केला आहे. सोमवारी सकाळपासून आईने काहीही खाल्लेलं नाही. कोणीही आम्हाला मदत करत नाही अशी भावनाही सतीने बोलून दाखवली आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. जलप्रलयामुळे रैनी येथे ऋषिगंगा नदीवरील जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला आहे. त्याच्यापासून पाच किमी अंतरावर तपोवन धरणाचे काम सुरू आहे. त्याचेही मोठे नुकसान झाले. या प्रकल्पाच्या एका बोगद्यात 34 कामगार अडकल्याची भीती आहे. त्यांची सुटका करण्यास एनडीआरएफ व आयटीबीपीच्या 300 जवानांनी बचावकार्य हाती घेतलं आहे. 

टॅग्स :IndiaभारतDeathमृत्यू