शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"त्याच्याशिवाय माझं कोणीच नाही", 'ती' बोगद्याबाहेर पाहतेय भावाची वाट; मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 11:14 IST

Glacier Burst in Uttarakhand : उत्तराखंडमधील तपोवनातील हिमकडा कोसळल्याने तिथल्या एक बोगद्यातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं.

नवी दिल्ली - नंदादेवी या हिमालयीन शिखराजवळील हिमकडा कोसळून रविवारी आलेल्या जलप्रलयामुळे उत्तराखंडमध्ये धरण प्रकल्पावरील 203 कर्मचारी बेपत्ता असून 18 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती त्या राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिली आहे. उत्तराखंडमधील तपोवनातील हिमकडा कोसळल्याने (Glacier Burst in Uttarakhand) तिथल्या एक बोगद्यातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. त्यामुळे त्या बोगद्यात काम करणारे अनेक कर्मचारी अडकून पडले. बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान एक 34 वर्षीय व्यक्ती बोगद्याच्या बाहेर बसून आपला भाऊ सुखरूप रित्या बाहेर येईल याची वाट पाहत आहे. 

सती नेगी असं या महिलेचं नाव असून ती बोगद्याच्या बाहेर बसून आपल्या भावाची वाट पाहत आहे. सती नेगीने भावाशिवाय या जगात तिचं कोणीचं नसल्याचं म्हटलं आहे. सात वर्षांपूर्वीच सती यांच्या पतीचं निधन झालं आहे. तेव्हापासून त्या आपला भाऊ परमिंदर बिष्ट याच्याकडेच राहतात, तोच तिचा शेवटचा आधार आहे. मात्र आता या दुर्घटनेनंतर ती आपल्या भावाला पुन्हा भेटू शकेल का? ही भीती सतीला आता सतावते आहे. सतीचा तिचा भाऊ देखील एनटीपीसीच्या तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकल्याचं वाटत आहे. 1900 मीटर लांबीच्या या बोगद्यात 35 लोक अडकल्याचं बोललं जात आहे.

सतीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तिचं भावाशी शेवटचं बोलणं झालं. तो रविवारी काम संपवून गोपेश्वरमध्ये आपल्या कुटुंबास (पत्नी, मुले आणि आई) भेटायला जात असल्याचं त्याने सांगितलं. साधारण आठवडाभराची सुट्टी घेतल्यानंतर तो घरी येणार होता, मात्र त्याआधीट हे सर्व घडलं. रविवारी सकाळी हिमकडा कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच सती त्वरित तपोवनला रवाना झाली. सुमारे 2 तासांनंतर ती बोगद्याजवळ पोहोचली. सतीने तिचा भाऊ गेल्या 7 वर्षांपासून त्या साईटवर काम करत असल्याचं म्हटलं आहे. 

"लोक येथे येतात, फोटो काढतात आणि निघून जातात, पण माझ्या भावाचे काय?, त्याच्या मुलांचं, बायकोचं काय होईल?"

कोणताही अधिकारी त्यांना मदत करू शकत नाही असं सतीने म्हटलं आहे. लोक येथे येतात, फोटो काढतात आणि निघून जातात, पण माझ्या भावाचे काय?, त्याच्या मुलांचं, बायकोचं काय होईल?, असा सवालही सतीने उपस्थित केला आहे. सोमवारी सकाळपासून आईने काहीही खाल्लेलं नाही. कोणीही आम्हाला मदत करत नाही अशी भावनाही सतीने बोलून दाखवली आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. जलप्रलयामुळे रैनी येथे ऋषिगंगा नदीवरील जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला आहे. त्याच्यापासून पाच किमी अंतरावर तपोवन धरणाचे काम सुरू आहे. त्याचेही मोठे नुकसान झाले. या प्रकल्पाच्या एका बोगद्यात 34 कामगार अडकल्याची भीती आहे. त्यांची सुटका करण्यास एनडीआरएफ व आयटीबीपीच्या 300 जवानांनी बचावकार्य हाती घेतलं आहे. 

टॅग्स :IndiaभारतDeathमृत्यू