शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

"त्याच्याशिवाय माझं कोणीच नाही", 'ती' बोगद्याबाहेर पाहतेय भावाची वाट; मन सुन्न करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 11:14 IST

Glacier Burst in Uttarakhand : उत्तराखंडमधील तपोवनातील हिमकडा कोसळल्याने तिथल्या एक बोगद्यातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं.

नवी दिल्ली - नंदादेवी या हिमालयीन शिखराजवळील हिमकडा कोसळून रविवारी आलेल्या जलप्रलयामुळे उत्तराखंडमध्ये धरण प्रकल्पावरील 203 कर्मचारी बेपत्ता असून 18 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती त्या राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिली आहे. उत्तराखंडमधील तपोवनातील हिमकडा कोसळल्याने (Glacier Burst in Uttarakhand) तिथल्या एक बोगद्यातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. त्यामुळे त्या बोगद्यात काम करणारे अनेक कर्मचारी अडकून पडले. बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान एक 34 वर्षीय व्यक्ती बोगद्याच्या बाहेर बसून आपला भाऊ सुखरूप रित्या बाहेर येईल याची वाट पाहत आहे. 

सती नेगी असं या महिलेचं नाव असून ती बोगद्याच्या बाहेर बसून आपल्या भावाची वाट पाहत आहे. सती नेगीने भावाशिवाय या जगात तिचं कोणीचं नसल्याचं म्हटलं आहे. सात वर्षांपूर्वीच सती यांच्या पतीचं निधन झालं आहे. तेव्हापासून त्या आपला भाऊ परमिंदर बिष्ट याच्याकडेच राहतात, तोच तिचा शेवटचा आधार आहे. मात्र आता या दुर्घटनेनंतर ती आपल्या भावाला पुन्हा भेटू शकेल का? ही भीती सतीला आता सतावते आहे. सतीचा तिचा भाऊ देखील एनटीपीसीच्या तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्पातील बोगद्यात अडकल्याचं वाटत आहे. 1900 मीटर लांबीच्या या बोगद्यात 35 लोक अडकल्याचं बोललं जात आहे.

सतीने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तिचं भावाशी शेवटचं बोलणं झालं. तो रविवारी काम संपवून गोपेश्वरमध्ये आपल्या कुटुंबास (पत्नी, मुले आणि आई) भेटायला जात असल्याचं त्याने सांगितलं. साधारण आठवडाभराची सुट्टी घेतल्यानंतर तो घरी येणार होता, मात्र त्याआधीट हे सर्व घडलं. रविवारी सकाळी हिमकडा कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच सती त्वरित तपोवनला रवाना झाली. सुमारे 2 तासांनंतर ती बोगद्याजवळ पोहोचली. सतीने तिचा भाऊ गेल्या 7 वर्षांपासून त्या साईटवर काम करत असल्याचं म्हटलं आहे. 

"लोक येथे येतात, फोटो काढतात आणि निघून जातात, पण माझ्या भावाचे काय?, त्याच्या मुलांचं, बायकोचं काय होईल?"

कोणताही अधिकारी त्यांना मदत करू शकत नाही असं सतीने म्हटलं आहे. लोक येथे येतात, फोटो काढतात आणि निघून जातात, पण माझ्या भावाचे काय?, त्याच्या मुलांचं, बायकोचं काय होईल?, असा सवालही सतीने उपस्थित केला आहे. सोमवारी सकाळपासून आईने काहीही खाल्लेलं नाही. कोणीही आम्हाला मदत करत नाही अशी भावनाही सतीने बोलून दाखवली आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. जलप्रलयामुळे रैनी येथे ऋषिगंगा नदीवरील जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वाहून गेला आहे. त्याच्यापासून पाच किमी अंतरावर तपोवन धरणाचे काम सुरू आहे. त्याचेही मोठे नुकसान झाले. या प्रकल्पाच्या एका बोगद्यात 34 कामगार अडकल्याची भीती आहे. त्यांची सुटका करण्यास एनडीआरएफ व आयटीबीपीच्या 300 जवानांनी बचावकार्य हाती घेतलं आहे. 

टॅग्स :IndiaभारतDeathमृत्यू