शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे की नाही"; सर्वोच्च न्यायालयाने आयआयटी मुंबईला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 08:58 IST

IIT JEE Admission fail: अखेर सर्वोच्च न्यायालयाने आयआयटीला आदेश देत त्या अनाथ मुलाला दिलासा दिला आहे. चुकीची लिंक क्लिक केल्याने त्याची जागा गेली होती.

आग्र्याचा सिद्धांत बत्रा याला ऑक्टोबरमध्ये IIT JEE (अॅडव्हान्स) २०२० मध्ये ऑल इंडिया २७० वी रँक मिळाली होती. परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या या अनाथ तरुणाने एवढे मोठे यश मिळविल्याने देशभरातून त्याची वाहवा होत होती. मात्र, त्याने चुकीची लिंक क्लिक केली आणि त्याचे मुंबई आयआयटीचे स्वप्न भंगले होते. याविरोधात त्याने आधी उच्च न्यायालय, नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आयआयटीला आदेश देत त्या अनाथ मुलाला दिलासा दिला आहे. 

झाले असे की, त्याने १८ ऑक्टोबरला सीट वाटपाचे पहिले राऊंड पूर्ण केले होते. ३१ ऑक्टोबरला तो त्याच्या रोल नंबर अपडेट झालेला पाहत होता तेव्हा त्याला एक लिंक मिळाली. त्या लिंकवर "जागा निश्चिती आणि पुढील राऊंडपासून बाहेर पडा" असे लिहिले होते. यावरून सिद्धांतला असे वाटले की, त्याला सीट मिळाली असल्याने पुढील राऊंडची गरज नसल्याने ही लिंक आली असावी. यामुळे त्याने ती लिंक क्लिक केली. 

मात्र, त्याने १० नोव्हेंबरला पाहिले तेव्हा त्याचे नाव इलेक्ट्रीकल कोर्ससाठीच्या यादीत दिसलेच नाही. या कोर्ससाठी एकूण ९३ जागा होत्या. त्याने दिलासा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले.  यावर १९ नोव्हेंबरला सुनावणी झाली. न्यायालयाने आयआयटीला त्याच्या या अपिलावर विचार करण्यास सांगितले. मात्र, आयआयटीने नियमानुसार त्याला असे करण्याचा अधिकार नाही. सिद्धांतला पुढील वर्षी पुन्हा परिक्षा द्यावी लागेल, असे सांगत नकार दिला. 

यानंतर सिद्धांतने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तसेच जादा सीट वाढविण्याची मागणी केली आहे. सिद्धांत सध्या त्याचे आजी, आजोबा आणि मामासोबत राहत आहे. त्याला अनाथ पेन्शन मिळते. खरेतर त्याचे पालनपोषण त्याच्या आईने केले होते. मात्र, दोन वर्षापूर्वीच तिचे निधन झाल्याने तो अनाथ झाला होता.

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले....न्यायमूर्ती एस. के. कौल, दिनेश माहेश्वरी आणि हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने घेतलेल्या व्हर्च्युअल सुनावणीमध्ये आयआयटी काऊन्सिलला काही प्रश्न विचारले. ''आम्हाला सांगा की तुम्ही त्याला प्रवेशाची परवानगी का नाकारत आहात? हे योग्य नाहीय. जर एखाद्याचे अॅडमीशन झाले आहे, तो प्रवेश मिळाल्यानंतर रदद् का करेल?''

यावर आयआयटी काऊन्सिलचे सोनल जैन यांनी नियम सांगत, बत्राने त्याची जागा पक्की केली होती. त्या जॉईंट सीट अलोकेशन ऑथॉरिटीमध्ये स्पष्ट करण्यात आले होते की, अशा विद्यार्थ्यांना पुढील राऊंडमध्ये जाण्याची गरज नाही. मात्र, बत्राने मुद्दामहून आठ टप्प्यांच्या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नियमांनुसार त्याला पुन्हा रिस्टोरेशनची परवानगी नाहीय.यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, कॉमन सेन्स नावाची कोणती गोष्ट असते की नाही. आम्ही तिन्ही न्यायमूर्तींनी यावर चर्चा केली आहे. आम्ही त्याला प्रवेश देण्याची परवानगी देत आहोत.  

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय