शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

लग्नाचं पक्क नसेल तर मुलींनी शारीरिक संबंध ठेवू नयेत - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 14:07 IST

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावणी करताना, न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर यांच्या खंडपीठाने महत्वाची बाब नमूद केली आहे.

ठळक मुद्देएका महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने ही बाब नमूद केली आहे. याप्रकरणात एका पीडित मुलीने तरुणावर बलात्काराचा आरोप लावला होता

इंदौर - लग्नाची गोष्ट पक्की नसेल तर मुलींनी शारिरीक संबंध ठेवू नयेत, असे मध्य प्रदेशच्या इंदौर उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देताना ही बाब नोंदवली आहे. यासंदर्भात जनसत्ता या न्यूज पोर्टलने वृत्त दिले आहे. भारत अद्यापही एक रुढी आणि परंपरा जपणारा देश आहे. देशात सभ्यतेच्या मर्यादा असल्यानेच लग्नाअगोदर मुलगा आणि मुलींमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होण्यास येथे मान्यता नाही.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणी सुनावणी करताना, न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर यांच्या खंडपीठाने महत्वाची बाब नमूद केली आहे. भारत अद्यापही रुढी, परंपरा जपणारा देश आहे, त्यामुळेच सभ्यतेच्या मर्यादा येथे ओलांडल्या नाहीत, जेथे लग्नाअगोदर केवळ वचन आणि आश्वासनांवर मुलगा व मुलींमध्ये शारीरिक संबंध ठेवले जातील. तसेच, जर एखाद्या मुलाने एखाद्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले, तर पुढील जबाबदाऱ्यांचा सामना करण्याची तयारी त्याने ठेवायला हवी, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

एका महिलेने दाखल केलेल्या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने ही बाब नमूद केली आहे. याप्रकरणात एका पीडित मुलीने तरुणावर बलात्काराचा आरोप लावला होता. लग्नाचे अमिष दाखवून युवकाने पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी, दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते, तसेच मुलगा मुस्लीम असल्याने मुलीच्या आई-वडिलांनीच या लग्नाला विरोध केला होता, असे आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. 

दरम्यान, मुलीकडील वकिलांनीही आपली बाजू मांडली. त्यामध्ये, आरोपीने 2018 पासून लग्नाचे अमिष दाखवून पीडितावर सातत्याने बलात्कार केला. त्यानंतर, लग्नासही नकार दिला. तसेच, दुसऱ्या मुलीसोबत लग्न होत असल्याचे समजताच पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ही बाब फिर्यादीच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे.    

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय