शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुलांपेक्षाही मुली हुश्शार; ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेला देशभरात उत्तम प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 06:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेला देशभरात उत्तम प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेला देशभरात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेच्या यशाची आकडेवारी केवळ थक्क करणारी आहे, असा उल्लेख करीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा गाभा असलेल्या तीनपैकी ‘संवेदनशील सरकार आणि कनवाळू समाज’ या तिसऱ्या सूत्राची मांडणी केली.

‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजनेअंतर्गत देशभरात राबवण्यात आलेल्या योजनांमुळे शाळेत प्रवेश घेणाºया मुलींची टक्केवारी आता शाळेत प्रवेश घेणाºया मुलग्यांपेक्षाही जास्त असल्याचे सीतारामन यांनी सभागृहाला सांगितले. प्राथमिक स्तरावर शाळेत प्रवेश घेणाºया मुलींचे प्रमाण तब्बल ९४.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. याच वयोगटातले ८९.२८% मुले शाळेची पायरी चढतात.

माध्यमिक शाळेत प्रवेश घेणाºया मुलींची टक्केवारी ८१.३२ % आहे, त्या तुलनेत मुलांचे प्रमाण केवळ ७८% आहे. उच्च माध्यमिक स्तरापर्यंत ५९.७०% मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहातात, तर मुलग्यांच्या बाबतीत हेच प्रमाण काहीसे कमी म्हणजे ५७.५४ % आहे, असे सीतारामन म्हणाल्या.

देशात अल्पवयीन मुलींचे विवाह आणि अजान वयात त्यांना मातृत्वाला सामोरे जावे लागण्याचे प्रमाण आजही चिंताग्रस्ततेचेच आहे. याबाबतीत १९२९ चा संमतीवयाचा ‘शारदा कायदा’ आणि त्यानंतर विवाहाचे वय १८ वर्षांवर आणण्याच्या कायद्याचा सीतारामन यांनी उल्लेख केला. तरीही अठरा-वीस हे वय मातृत्वाची जबाबदारी पेलण्यासाठी शरीर सक्षम नसण्याचेच आहे. त्यामुळे माता-बाल कुपोषणाचे चक्र सुरू होते.

या प्रश्नावर तोडगा सुचवण्यासाठी एका विशेष कार्यगटाची नियुक्ती करण्यात येण्यात असल्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली. या समितीचा अहवाल सहा महिन्यांमध्ये अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील स्री-कल्याणाला प्राधान्य देणाºया अर्थसंकल्पाने शहरी, नोकरदार स्रियांच्या मागण्या धुडकावल्याचे दिसते. बहुचर्चित ‘निर्भया’ योजनेचा उल्लेखही यावर्षी झाला नाही.

टॅग्स :WomenमहिलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन