शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

'कुराणवर कुणी काही बोलत नाही, कारण...', रामचरितमानसवरील टीकेवर केंद्रीय मंत्र्यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 16:45 IST

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी बिहारचे मुख्मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांवर जोरदार टीका केली.

Giriraj Singh On Ramcharit Manas Remarks Row: भगवान श्रीराम आमि रामचरितमानसवर बिहारचे मंत्री चंद्रशेखर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा प्रचंड विरोध होत आहे. या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गिरीराज सिंह यांनी रविवारी (22 जानेवारी) पाटणा येथे बोलताना म्हटले की, "जसा भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ आहे, त्याचप्रमाणे कुराण हा मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ आहे. कुराणबद्दल कोणी काहीही बोलत नाही, कारण 'सर तन से जुदा' केले जाते. हिंदूंच्या पवित्र ग्रंथाविरुद्ध बोलण्याची आजच्या काळात फॅशन झाली आहे,'' अशी टीका त्यांनी केली.

बिहारचे शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी अलीकडेच म्हटले होते की, "तुलसीदासांच्या रामचरितमानसने सामाजिक भेदभाव आणि समाजात द्वेष पसरवण्याला प्रोत्साहन दिले. रामचरितमानसला विरोध झाला कारण त्यात, म्हटले होते की समाजातील खालचा वर्ग शिक्षित झाल्यावर विषारी होतो. रामचरितमानस, मनुस्मृती आणि एम.एस. गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स सारख्या पुस्तकांनी सामाजिक विभाजन निर्माण केले," असे विधान त्यांनी केल होते.

गुलाम रसूल यांच्या वक्तव्यावरही प्रत्युत्तर दिलेयापूर्वी गिरीराज सिंह यांनी जेडीयू आमदार गुलाम रसूल बलियावी यांच्या वक्तव्यावरही जोरदार हल्ला चढवला होता. गुलाम रसूल म्हणाले होते की, ''जर पैगंबर मुहम्मद यांच्याकडे कोणी बोट उचलले तर मुस्लिम प्रत्येक शहरात मोठा विरोध दर्शवतील. मुस्लिम अजिबात संकोच करणार नाहीत, कारण मुस्लिमांचे जीवन आणि श्वास फक्त पैगंबरांसाठी आहे.''

नितीशकुमारांवर निशाणा साधला

गिरीराज सिंह यांनी जेडीयू नेत्यावर अशी विधाने करून देशातील जातीय सलोखा बिघडवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "तुकडे तुकडे टोळीचे नेते रामायणाचा अपमान करुन हिंदूंचा अपमान करतात, पण कुराणावर भाष्य करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. नितीशकुमार हे लाचार मुख्यमंत्री आहेत, ते धृतराष्ट्रासारखे फक्त पाहत आहेत," अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :ramayanरामायणCentral Governmentकेंद्र सरकारBiharबिहारBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार