शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

पुण्यातील 'गिरिप्रेमी'ची ऐतिहासिक कामगिरी, कांचनजुंगा शिखरावर फडकवला तिरंगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 10:49 IST

भारतातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था असलेली गिरीप्रेमी यातील गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली 10 गिर्यारोहकांनी जगातील तिसरे उंच शिखर आणि भारतातील सर्वात उंच शिखर सर करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

सिक्कीम - भारतातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था असलेली गिरिप्रेमी यातील गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली 10 गिर्यारोहकांनी जगातील तिसरे उंच शिखर आणि भारतातील सर्वात उंच शिखर सर करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 8 हजार 596 मीटर उंच असलेले माउंट कांचनजुंगा शिखर जगातील उंचीनुसार तिसरे शिखर आहे. या शिखरावर खूप कमी मोहिमा केल्या जातात. आत्तापर्यंत 400 गिर्यारोहकांनी या शिखरावर चढाई केली आहे. 

पुण्यातील गिरिप्रेमींनी सातवी अष्टहजारी शिखर सर करण्याची यशस्वी कामगिरी केली आहे. सहा यशस्वी मोहिमेनंतर गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली 10 गिर्यारोहकांच्या चमुने कांचनजुंगा शिखरावर चढून तिरंगा फडकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सकाळी 6 च्या सुमारास गिर्यारोहकांनी ही मोहीम यशस्वी केली. इको प्रोजेक्ट हे या कांचनजुंगा मोहिमेचे वैशिष्ट आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेले संशोधन करण्यासाठी आवश्यक असलेले नमुने या मोहिमेत गोळा करण्यात आले आहेत. 

गिरिप्रेमींसाठी कांचनजुंगा मोहीम ही भारतातील सर्वात मोठी नागरी मोहीम होती. या चढाईच्या दरम्यान अतिउंचावरील माती आणि दगड गोळा करण्याचे कामही गिर्यारोहकांकडून करण्यात आले. कांचनजुंगा शिखर चढणे हे तांत्रिकदृष्ट्या अवघड असते. गिरिप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे यांनी आज सकाळी ही यशस्वी शिखर चढाई केली. पुण्याची ही टीम मार्च अखेरीस काठमांडूकडे रवाना झाली होती. 

टॅग्स :Puneपुणे