शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

गिलगिट-बाल्टिस्तानवरून भारताने पाकला खडसावले, राज्याचा दर्जा देण्याच्या हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 05:26 IST

Gilgit-Baltistan : भारताच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत म्हटले आहे की, भारतीय भागात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करू नये. हा भारताचा भाग असून, शेजारी देशाने तो तातडीने रिकामा करावा.

नवी दिल्ली : गिलगिट-बाल्टिस्तानला तथाकथित राज्याचा दर्जा देण्याच्या हालचालीबद्दल भारताने पाकला रविवारी पुन्हा एकदा खडसावले आहे. या प्रकाराद्वारे पाकिस्तान पीओकेची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करून तो भाग बळकाविण्याचा कट रचत आहे. हा प्रकार कोणत्याही स्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असेही भारताने बजावले आहे.भारताच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत म्हटले आहे की, भारतीय भागात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करू नये. हा भारताचा भाग असून, शेजारी देशाने तो तातडीने रिकामा करावा. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी गिलगिट-बाल्टिस्तान भागाला आम्ही राज्याचा दर्जा देणार आहोत, असे म्हटले आहे, तसेच या भागात निवडणुका घेण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यावर भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे.अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर, लडाख आणि गिलगिट हे भारताचे अविभाज्य भाग आहेत, हे आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करीत आहोत. पाकने बेकायदेशीररीत्या आणि बळजबरीने गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग बळकावला आहे. पाकिस्तानचा हा प्रयत्न म्हणजे मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रकार होय. या भागातील नागरिकांवर पाकिस्तानने सात दशके अत्याचार केले असून, ते झाकण्यासाठीच ही खेळी खेळली जात आहे. या भागाला प्रांताचा दर्जा देण्याऐवजी तो भाग भारताला परत केला पाहिजे.

भारताने नोंदविला तीव्र आक्षेप - या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सरकारला २०१८ मधील प्रशासनिक आदेशात दुरुस्ती करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, या भागात सार्वत्रिक निवडणुका घेण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या राजदूतांना बोलावून पाकिस्तानच्या या हालचालींबाबत तीव्र आक्षेप नोंदविला होता.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान