शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

गिलगिट-बाल्टिस्तानवरून भारताने पाकला खडसावले, राज्याचा दर्जा देण्याच्या हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 05:26 IST

Gilgit-Baltistan : भारताच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत म्हटले आहे की, भारतीय भागात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करू नये. हा भारताचा भाग असून, शेजारी देशाने तो तातडीने रिकामा करावा.

नवी दिल्ली : गिलगिट-बाल्टिस्तानला तथाकथित राज्याचा दर्जा देण्याच्या हालचालीबद्दल भारताने पाकला रविवारी पुन्हा एकदा खडसावले आहे. या प्रकाराद्वारे पाकिस्तान पीओकेची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करून तो भाग बळकाविण्याचा कट रचत आहे. हा प्रकार कोणत्याही स्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असेही भारताने बजावले आहे.भारताच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी याबाबत म्हटले आहे की, भारतीय भागात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने करू नये. हा भारताचा भाग असून, शेजारी देशाने तो तातडीने रिकामा करावा. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी गिलगिट-बाल्टिस्तान भागाला आम्ही राज्याचा दर्जा देणार आहोत, असे म्हटले आहे, तसेच या भागात निवडणुका घेण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यावर भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे.अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर, लडाख आणि गिलगिट हे भारताचे अविभाज्य भाग आहेत, हे आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करीत आहोत. पाकने बेकायदेशीररीत्या आणि बळजबरीने गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग बळकावला आहे. पाकिस्तानचा हा प्रयत्न म्हणजे मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रकार होय. या भागातील नागरिकांवर पाकिस्तानने सात दशके अत्याचार केले असून, ते झाकण्यासाठीच ही खेळी खेळली जात आहे. या भागाला प्रांताचा दर्जा देण्याऐवजी तो भाग भारताला परत केला पाहिजे.

भारताने नोंदविला तीव्र आक्षेप - या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सरकारला २०१८ मधील प्रशासनिक आदेशात दुरुस्ती करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार, या भागात सार्वत्रिक निवडणुका घेण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या राजदूतांना बोलावून पाकिस्तानच्या या हालचालींबाबत तीव्र आक्षेप नोंदविला होता.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान