शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

गुलाम नबी कॉंग्रेसमधून 'आझाद', पाच दशकांनंतर पाच पानी राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 05:29 IST

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जवळपास पाच दशकांच्या सोबतीनंतर शुक्रवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

नवी दिल्ली :

काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जवळपास पाच दशकांच्या सोबतीनंतर शुक्रवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अलीकडच्या काळात कपिल सिब्बल व आणि अश्विनीकुमार यांसारख्या दिग्गज होता. आझाद यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राजीनामा देताना आझाद यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाच पानी पत्र लिहिले. देशातील सर्वात जुना पक्ष आता पूर्णपणे नष्ट झाला असून, सध्या बनावट संघटनात्मक निवडणुकीच्या नावाखाली धोका दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय जड अंत:करणाने घेत आहोत. दरबारी मंडळी पक्ष चालवत असून, त्यामुळे पक्ष देशासाठी लढण्याची इच्छाशक्ती व क्षमता गमावून बसला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आझाद यांनी अलीकडेच जम्मू-काश्मीर प्रदेश प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. आझाद यांची कृती दुर्दैवी असून, पक्ष महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून भाजपशी लढत असताना राजीनामा दिला. राजीनाम्यासाठी निवडलेली वेळ भयंकर आहे, असे काँग्रेसने म्हटले,

राजीनामापत्रात काय म्हटले आहे?संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया एक फार्सपक्षातील संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला फार्स संबोधून ते म्हणाले की, पक्षात कोणत्याही स्तरावर निवडणूक झालेली नाही. २४ अकबर रोडवर बसलेल्या अ. भा. काँग्रेस समितीच्या, (एआयसीसी) निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना एआयसीसी चालवणाऱ्या छोट्या गटांनी तयार केलेल्या याद्यांवर सह्या करण्यास भाग पाडण्यात आले.सोनिया गांधी केवळ नावापुरत्या नेत्याराहुल गांधी यांनी सर्व वरिष्ठ अपमानित केल्यानंतर घाईगडबडीने राजीनामा दिला आणि त्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून तुम्ही पदभार सांभाळला. हे पद आपण तीन वर्षापासून सांभाळत आहात. सोनिया गांधी आता केवळ नावापुरत्या नेत्या आहेत.

सल्लामसलत प्रणाली उद्ध्वस्त, खुशामतखोरांकडे सत्रे काँग्रेसच्या व दुर्दैवाने राहुल गांधी यांच्या राजकारण प्रवेशानंतर विशेषकरून जानेवारी २०१३ नंतर (जेव्हा तुम्ही त्यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनवले) तत्पूर्वी अस्तित्वात असलेली पक्षाची सल्लामसलत प्रणाली त्यांनी उदध्वस्त केली. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला सारून नव्या अननुभवी, खुशामतखोरांच्या हाती पक्षाची सूत्रे देण्यात आली. राहुल गांधी यांचे सुरक्षारक्षक, खासगी सचिव निर्णय घेतात या रिमोट कंट्रोल मॉडेलने आधी संपुआ सरकारची संस्थात्मक एकात्मता नष्ट केली आणि आता पक्षाची.

४९ विधानसभा निवडणुकांपैकी ३९ ठिकाणी काँग्रेसचा पराभव२०१४ च्या निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पराभव झाला. नंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. २०१४ ते २०२२ दरम्यान ४९ विधानसभा निवडणुकांपैकी ३९ निवडणुकांत काँग्रेसच्या वाट्याला पराभव आला.अपरिपक्व कृतीमुळेच पक्षाचा पराभवसंपुआ सरकारच्यावेळी राहुल गांधी यांनी अध्यादेशाच्या प्रती फाडल्याच्या घटनेचा उल्लेख करून ते म्हणाले की, अपरिपक्वतेचे हे उत्कृष्ट उदाहरण होते. या बालिश कृतीने पंतप्रधान आणि भारत सरकारच्या प्रतिमेवर मोठा आघात झाला. या कृतीनेच २०१४ च्या निवडणुकीत संपुआला पराभवाचे तोंड पहावे लागले.काँग्रेस पूर्णपणे नष्ट,आता स्थिती बदलणे अशक्य दुर्दैवाने कॉंग्रेसची स्थिती या स्तरावर गेली आहे की, परतीचा मार्ग दिसत नाही. पक्षाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी ते आता प्रतिनिधी तयार करू लागले आहेत. मात्र, हा प्रयोगही फसणार आहे. कारण, काँग्रेस पूर्णपणे नष्ट झालेली असून, ही स्थिती बदलता येऊ शकत नाही.भारत जोडो नव्हे, काँग्रेस जोडो यात्रेची गरजबूथ, ब्लॉक, जिल्हा किंवा राज्य स्तरावर कुठेही मतदार यादी प्रकाशित केलेली नाही. पक्षाशी झालेल्या या विश्वासघातासाठी नेतृत्व जबाबदार आहे. भारत जोडो यात्रा काढण्यापूर्वी काँग्रेस जोडो यात्रा काढायला हवी.,हा काही परिपक्व निर्णय नाही. आझाद हे दीर्घकाळापासून काँग्रेसमध्ये होते. राहुल गांधी हे आमचे नेते आहेत आणि राहतील. पक्षासाठी काही करणे हे आमचे कर्तव्य आहे. कहानी यह नहीं की वे गए, कहानी ये है की हम नहीं जा रहे हैं.-सलमान खुर्शीद, काँग्रेस नेते 

आझाद यांनी नेतृत्वावर केलेले आरोप अयोग्य आहेत. ज्यांची ओळखच देशात काँग्रेसमुळे आहे, त्यांच्याकडून अशी विधाने अपेक्षित नाहीत. ज्या व्यक्तीला पक्षाने ४२ वर्षे पदाशिवाय ठेवले नाही ती व्यक्ती काँग्रेसबाबत अशी वक्तव्ये करते, याची अपेक्षा नव्हती.-अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

 

टॅग्स :congressकाँग्रेस