शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Ghulam Nabi Azad, Kashmir Politics: काश्मीरच्या राजकारणात नवी 'एन्ट्री'! गुलाब नबी आझाद यांनी जाहीर केलं पक्षाचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 13:07 IST

आझाद यांनी २६ ऑगस्टला काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

Ghulam Nabi Azad, Kashmir Politics: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नव्या पक्षाची आज घोषणा केली. त्यांच्या पक्षाचे नाव 'डेमोक्रेटिक आझाद पार्टी' आहे. जम्मूमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नाव जाहीर केले. आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेससोबतचे त्यांचे पाच दशकांहून अधिक जुने नाते तोडले होते. ते रविवारी तीन दिवसांच्या दौऱ्यावर जम्मूत आले आहेत. त्या दरम्यान आज त्यांनी नव्या पक्षाच्या नावाची घोषणा केली. पक्षाची विचारधारा आपल्या नावासारखीच 'आझाद' असेल आणि सर्व धर्मनिरपेक्ष लोक त्यात सामील होतील, असे ते म्हणाले. त्यांनी पक्षाचा अजेंडा आधीच स्पष्ट केला आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवणे याचा समावेश आहे.

मार्च २०२२ मध्ये, गुलाम नबी आझाद यांना माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून पद्मभूषण पुरस्कार मिळाला. १९७३ मध्ये गुलाम नबी आझाद यांनी डोडा जिल्ह्यातील भालेसा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून राजकारणाला सुरुवात केली. यानंतर त्यांची कार्यशैली पाहून काँग्रेसने त्यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली. १९८० मध्ये त्यांनी महाराष्ट्रातून पहिली लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. १९८२ मध्ये त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. आझाद यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या UPA सरकारमध्ये देशाचे आरोग्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. या दरम्यान त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा विस्तार केला. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या शहरी गरिबांना सेवा देण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान देखील सुरू केले. आझाद यांनी अनेक महत्त्वाची मंत्रीपदे भूषवली. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते संसदीय कामकाज आणि नागरी विमान वाहतूक मंत्रीही होते.

गुलाम नबी आझाद यांच्या राजकीय कारकिर्दीतील सुवर्णकाळ २००५ मध्ये आला. ते जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री बनले. आझाद जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २१ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला. २००८ मध्ये अमरनाथ जमीन आंदोलनामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पुन्हा एकदा स्वत:च्या पक्षाच्या मार्फत ते राजकीय वाटचाल सुरू ठेवणार आहेत.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliticsराजकारणcongressकाँग्रेस