शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

'सकाळी उठून आधी राष्ट्रगीत गायचं', राजस्थान सरकारचा हॉस्टेल विद्यार्थ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 20:31 IST

राजस्थानमध्ये आता हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना रोज राष्ट्रगीत गावं लागणार आहे. राज्य सरकारने असा आदेशच जारी केला आहे.

ठळक मुद्देराजस्थानमधील हॉस्टेल विद्यार्थ्यांवर राष्ट्रगीत गाण्याची सक्तीराजस्थानच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने आदेश जारी केला आहे'अशाने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होईल'

जयपूर - राजस्थानमध्ये आता हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना रोज राष्ट्रगीत गावं लागणार आहे. राज्य सरकारने असा आदेशच जारी केला आहे. राजस्थानच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने आदेश जारी करताना सांगितलं आहे की, राज्यभरातील 800 सरकारी हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत गावं लागणार आहे. अशाने विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होईल असं विभागाचे संचालक समित शर्मा यांनी सांगितलं आहे. 

'निवासी शाळांमध्ये रोज राष्ट्रगीत गायलं जायचं आणि आता ही परंपरा सरकारद्वारा आणि सरकारच्या मदतीने चालवण्यात येणा-या हॉस्टेल्समध्ये सुरु करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना वाढण्यास मदत मिळेल', असं समित शर्मा म्हणाले आहेत. हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना रोज सकाळी सात वाजता प्रार्थनेसोबत राष्ट्रगीतही गावं लागणार आहे. राजस्थानमध्ये जयपूर महापालिका कर्मचा-यांना याआधीच रोज राष्ट्रगीत गाण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

महापालिकेने आदेश दिला होता की, सकाळच्या वेळी राष्ट्रीय गाणं आणि संध्याकाळी राष्ट्रगीत गावं लागेल. 'हा आदेश जारी करण्यामागे एकमेव उद्देश होता तो म्हणजे कर्मचा-यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी आणि काम करण्यासाठी उत्तम वाचावरण निर्माण व्हावं', अशी माहिती महापालिका अधिका-यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त अशोक लाहोती यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना म्हटलं होतं की, दिवसाची सुरुवात राष्ट्रीय गीत आणि शेवट राष्ट्रगीताने व्हावा यापेक्षा दुसरी उत्तम गोष्ट नाही. यामुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळते. 

यासोबत त्यांनी म्हटलं होतं की, जर एखाद्याला राष्ट्रगीत गायचं नसेल तर त्या व्यक्तीने पाकिस्तानात जावं. 'मी महापालिकेत काम करतो, त्यामुळे मी महापालिकेला विरोध केला तर त्याचं समर्थन नाही. ज्या देशात आपण राहतो, त्याच देशाच्या राष्ट्रगीताला जर कोणी विरोध करत असेल तर जरुर करावा. तुम्हाला कोणी थांबवत नाही. पण मग तुम्ही पाकिस्तानात निघून जावं', असं अशोक लाहोती बोलले होते. मात्र नंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन पलटी मारली होती आणि सांगितलं होतं की, 'ज्याच्या मनात देशासाठी सन्मान आहे, तो स्वत:हून उभा राहिल. आमचा कोणतही अजेंडा नाही'.  

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीतRajasthanराजस्थान