शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

अनिश्चितकालीन युद्धासाठी सज्ज होऊ या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 4:31 AM

दहशतवाद ही आता केवळ एखाददुसऱ्या देशाची समस्या राहिलेली नसून ती जागतिक समस्या झाली आहे.

- एम. एन. सिंगअतिरेकी कारवाया होत नाहीत अथवा झाल्या नाहीत, असा क्वचितच देश असावा. न्यूझीलँड, आॅस्ट्रेलिया, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम, स्पेन, युरोप, चीन, अमेरिका, श्रीलंका अशा विविध देशांमध्ये दहशतवाद फोफावला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. इस्लामिक भारताची घोषणा करीत आयसिससारखी संघटनाही भारतात पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे.

दहशतवादी संघटनाही आपल्या कारवायांसाठी लागणारी नियोजनव्यवस्था दरवेळी बदलत आहेत. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करीत घातपात घडवत आहेत. विचारपूर्वक आपले लक्ष्य ठरवत आहेत. कट आखण्यासाठी कमालीची गुप्तता पाळत आहेत. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनाही घातपातांच्या कटांची माहिती मिळण्यात अडथळे येत आहेत. सध्या महत्त्वाचे आहे ते अतिरेकी कारवायांसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि या संघटनांना पुरविली जाणारी आर्थिक रसद या दोन बाबींवर लक्ष केंद्रित करणे. तपासयंत्रणांना लवकरात लवकर याबाबतची माहिती मिळवून, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे हे ठरवावे लागेल. त्याशिवाय अतिरेकी संघटनांकडून वापरली जाणारी संपर्क आणि दळणवळण व्यवस्था, शस्त्रे हेही महत्त्वाचे विषय आहेत.अलीकडच्या काही काळात, आपण फोर्स वनसारखी पथके तयार केली आहेत. पूर्वीपेक्षा आता आपली अधिक तयारी आहे, पण अजून खूपच मोठा पल्ला गाठायचा आहे. भारताला खूप मोठा सागरी किनारा आहे. तेथून कशी घुसखोरी करता येईल, याकडे दहशतवादी संघटनांचे लक्ष आहे. म्हणूनच तटरक्षक दल, नौदल आणि पोलीस या यंत्रणांमधील समन्वय आणखी वाढवावा लागेल. खोल समुद्रात केवळ तटरक्षक दल आणि नौदलाचाच वावर असतो. त्यांच्याकडून येणाºया माहितीवर पोलीस स्थानिक पातळीवर काम करीत असतात.

देशातील विमानतळे, सीमा भागातील कारवाया, बंदरांमध्ये होणाºया हालचाली यावर करडी नजर ठेवावी लागेल. सध्या काश्मीर आणि पंजाबच्या सीमा भागात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर होत आहेत. दुसरीकडे बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर भारतात घुसखोरी होत असते. या पार्श्वभूमीवर या महत्त्वांच्या ठिकाणी करडी नजर ठेवावी लागेल. सीमा भागातून घुसखोरी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. गुप्तवार्ता मिळविण्यासाठी स्थानिक तपासयंत्रणांना केंद्रीय यंत्रणांवर अबलंवून राहावे लागते. तेथून माहिती मिळवितानाच स्थानिक यंत्रणांनीही आपली क्षमता वाढविणे आवश्यक आहे. २६/११च्या मुंबईवरील दहशदवादी हल्ल्याआधी अतिरेकी डेव्हिड हेडली याने मुंबईला भेट देत अनेक ठिकाणांची रेकी केली. शिवसेना भवनसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती घेतली. त्यासाठी त्याने येथे आपला सामाजिक संपर्कही वाढविला. या सगळ्याचा कुणालाच संशय आला नाही. आपल्या यंत्रणा केवळ कायदा आणि सुव्यवस्था आणि राजकीय घडामोडींमध्ये अडकून पडतात. मुंबई पोलीस तपास करीत असताना काही तपशील त्यांच्या हाती येतो. त्याची खातरजमा करावी लागते. त्यात काही काळ जातो. म्हणूनच स्थानिक पातळीवर सक्षम गुप्तचर विभाग तयार केले गेले पाहिजेत. अर्थात, हे मोठे काम आहे, पण धोकाही मोठा असल्याने भविष्यात ते करावेच लागेल.

एकूणच आता आपल्याला विश्रांती घेण्याची परवानगी नाही. देशाच्या भागाभागांत या संघटना हस्तकांमार्फत पोहोचल्या आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर अगदी अंतर्गत भागातही त्या पसरल्या आहेत. या संघटनांचा अजेंडा पाहिला, तर दीर्घकालीन लढाईला आपण सज्ज झाले पाहिजे.(लेखक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत.)