शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

माझी बायको परत मिळवून द्या; संसारात सासरच्यांच्या हस्तक्षेपाला कंटाळलेल्या पतीची कोर्टाकडे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 10:49 IST

बायकोच्या माहेरच्या लोकांचं तिच्यावर जास्तच प्रेम आहे आणि म्हणून घरचे वारंवार आमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे

ठळक मुद्दे बायकोच्या माहेरच्या लोकांचं तिच्यावर जास्तच प्रेम आहे आणि म्हणून घरचे वारंवार आमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहेपत्नीच्या माहेरच्या माणसांच्या या वागणुकीला कंटाळलं असल्याचंही या व्यक्तीने याचिकेत म्हंटलं आहे

नवी दिल्ली, दि. 1- पती-पत्नीमधील काही कारणावरून झालेली किरकोळ भांडण लगेच मिटतात. पण अनेकदा मोठ्या कारणांवरून झालेली भांडण कोर्टापर्यंत पोहचतात. ही भांडणं घटस्फोटापर्यंत जातात आणि एकमेकांपासून वेगळं होण्याचं पती-पत्नी ठरवतात. एका व्यक्तीने कोर्टाकडे त्याची बायको परत मिळविण्यासाठी अपील केलं आहे. बायकोच्या माहेरच्या लोकांचं तिच्यावर जास्तच प्रेम आहे आणि म्हणून घरचे वारंवार आमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे. पत्नीच्या माहेरच्या माणसांच्या या वागणुकीला कंटाळलं असल्याचंही या व्यक्तीने याचिकेत म्हंटलं आहे.  न्यायाधीश संजय गर्ग यांनी अर्जावर सुनावणी करताना याचिकाकर्त्याच्या मागणीनुसार पत्नीला नोटीस पाठवत 23 जानेवारी 2018 रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.

रोबॉटिक इंजिनिअर असलेल्या याचिकाकर्ता पतीचा आरोप आहे की, पत्नीच्या माहेरच्या लोकांचं प्रमाणापेक्षा जास्त प्रेम आणि वारंवार आमच्या वैवाहिक आयुष्यात दखल देण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागलं आहे. वकिल पियुष जैन यांनी हिंदू विवाह कायद्याचा 1995 मधील कलम 9 अंतर्गत याचिका दाखल करताना पत्नीला पुन्हा सासरी परतण्याचे आणि वैवाहिक आयुष्याला सुरुवात करण्याचा आदेश देण्याची मागणी केली आहे. 

याचिकाकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी ही एका कंपनीत सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. वर्षाला 5 लाख इतकं तिचं उत्पन्न आहे. ती 3 मेपासून तिच्या माहेरी राहते. कुठलंही कारण नसताना पत्नी माहेरी निघून गेली, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. या दोघांचं 25 जानेवारी 2016 रोजी दिल्लीमध्ये लग्न झालंय लग्नानंतर ते दोघे कडकडडूमा कोर्टाच्या जवळील एजीसीआर एन्क्लेवमध्ये राहत होते. त्याच्या पत्नीचं माहेर गाजियाबादच्या स्वर्णजयंती पुरममध्ये आहे. लग्नानंतर ते दोघं सव्वा वर्ष एकत्र राहिले होते. त्या दरम्यान त्याची पत्नी गरोदर होती. पण पत्नीच्या माहेरकडच्या लोकांच्या बेजबाबदारपणामुळे तीन महिन्याच्या आत काही कारणाने गर्भपात झाला, असा आरोप त्या याचिकाकर्त्या व्यक्तीने केला आहे. पत्नीच्या घरचे काहीना काही कारण देऊन तिला माहेरी घेऊन जात असायचे आणि लवकर घरी पाठवत नसायचे. माहेरी जायला नकार दिल्यावर ती भांडणं करायची. त्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबीयांना बोलावून ती घरी निघून जायची, असा आरोप त्या व्यक्तीने केला आहे. 

या सगळ्या प्रकाराला कंटाळून पीडित व्यक्तीने अखेरीस कोर्टात धाव घेतली आहे.  

टॅग्स :Courtन्यायालय