शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

माझी बायको परत मिळवून द्या; संसारात सासरच्यांच्या हस्तक्षेपाला कंटाळलेल्या पतीची कोर्टाकडे विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 10:49 IST

बायकोच्या माहेरच्या लोकांचं तिच्यावर जास्तच प्रेम आहे आणि म्हणून घरचे वारंवार आमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे

ठळक मुद्दे बायकोच्या माहेरच्या लोकांचं तिच्यावर जास्तच प्रेम आहे आणि म्हणून घरचे वारंवार आमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहेपत्नीच्या माहेरच्या माणसांच्या या वागणुकीला कंटाळलं असल्याचंही या व्यक्तीने याचिकेत म्हंटलं आहे

नवी दिल्ली, दि. 1- पती-पत्नीमधील काही कारणावरून झालेली किरकोळ भांडण लगेच मिटतात. पण अनेकदा मोठ्या कारणांवरून झालेली भांडण कोर्टापर्यंत पोहचतात. ही भांडणं घटस्फोटापर्यंत जातात आणि एकमेकांपासून वेगळं होण्याचं पती-पत्नी ठरवतात. एका व्यक्तीने कोर्टाकडे त्याची बायको परत मिळविण्यासाठी अपील केलं आहे. बायकोच्या माहेरच्या लोकांचं तिच्यावर जास्तच प्रेम आहे आणि म्हणून घरचे वारंवार आमच्या वैवाहिक जीवनात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे. पत्नीच्या माहेरच्या माणसांच्या या वागणुकीला कंटाळलं असल्याचंही या व्यक्तीने याचिकेत म्हंटलं आहे.  न्यायाधीश संजय गर्ग यांनी अर्जावर सुनावणी करताना याचिकाकर्त्याच्या मागणीनुसार पत्नीला नोटीस पाठवत 23 जानेवारी 2018 रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.

रोबॉटिक इंजिनिअर असलेल्या याचिकाकर्ता पतीचा आरोप आहे की, पत्नीच्या माहेरच्या लोकांचं प्रमाणापेक्षा जास्त प्रेम आणि वारंवार आमच्या वैवाहिक आयुष्यात दखल देण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागलं आहे. वकिल पियुष जैन यांनी हिंदू विवाह कायद्याचा 1995 मधील कलम 9 अंतर्गत याचिका दाखल करताना पत्नीला पुन्हा सासरी परतण्याचे आणि वैवाहिक आयुष्याला सुरुवात करण्याचा आदेश देण्याची मागणी केली आहे. 

याचिकाकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी ही एका कंपनीत सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे. वर्षाला 5 लाख इतकं तिचं उत्पन्न आहे. ती 3 मेपासून तिच्या माहेरी राहते. कुठलंही कारण नसताना पत्नी माहेरी निघून गेली, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. या दोघांचं 25 जानेवारी 2016 रोजी दिल्लीमध्ये लग्न झालंय लग्नानंतर ते दोघे कडकडडूमा कोर्टाच्या जवळील एजीसीआर एन्क्लेवमध्ये राहत होते. त्याच्या पत्नीचं माहेर गाजियाबादच्या स्वर्णजयंती पुरममध्ये आहे. लग्नानंतर ते दोघं सव्वा वर्ष एकत्र राहिले होते. त्या दरम्यान त्याची पत्नी गरोदर होती. पण पत्नीच्या माहेरकडच्या लोकांच्या बेजबाबदारपणामुळे तीन महिन्याच्या आत काही कारणाने गर्भपात झाला, असा आरोप त्या याचिकाकर्त्या व्यक्तीने केला आहे. पत्नीच्या घरचे काहीना काही कारण देऊन तिला माहेरी घेऊन जात असायचे आणि लवकर घरी पाठवत नसायचे. माहेरी जायला नकार दिल्यावर ती भांडणं करायची. त्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबीयांना बोलावून ती घरी निघून जायची, असा आरोप त्या व्यक्तीने केला आहे. 

या सगळ्या प्रकाराला कंटाळून पीडित व्यक्तीने अखेरीस कोर्टात धाव घेतली आहे.  

टॅग्स :Courtन्यायालय