शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

कारगिल युद्धावेळी इतर देशांनी भारताला लुबाडलं; तत्कालीन लष्करप्रमुख व्ही.पी. मलिकांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 10:57 IST

भारताचं जितकं शोषण करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न या देशांनी केला.

ठळक मुद्देकारगिल युद्धाच्या 20 वर्षानंतर अनेक धक्कादायक खुलासे उघड परदेशातून भारताला जुनी शस्त्रे मिळाली, तत्कालीन लष्कर प्रमुख व्ही.पी. मलिक यांचा दावाया देशांनी बाजार दरापेक्षा जास्त दराने पैसे उकळले

चंदीगड - कारगिल युद्धाच्या २० वर्षानंतर याच्याशी जोडले गेलेले अनेक खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. भारतीय लष्कराचे तत्कालीन प्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांनी दावा केला आहे की, कारगिल युद्धावेळीभारताला मोठ्या प्रमाणात विदेशातून शस्त्रसाठा, दारुगोळा मागवावा लागला होता. त्यावेळी इतर देशांनी मदत करण्याऐवजी प्रचंड पैसा उकळला आणि ३ वर्ष जुने सॅटेलाइट फोटो भारताला दिले होते. 

जनरल मलिक हे मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, कारगिल युद्धावेळी भारताला शस्त्रसाठा आणि दारुगोळ्याची नितांत गरज होती. त्यामुळे इतर देशाकडून आपण ही मागणी केली. त्यावेळी या देशांनी भारताला मदतीच्या नावावर जुनी झालेली शस्त्र सोपविली. भारताचं जितकं शोषण करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न या देशांनी केला. आम्ही एका देशाकडून तोफा मागितल्या होत्या. त्या देशाने सुरुवातील तोफा देण्याचं आश्वासन दिलं पण नंतर जुन्या तोफांची दुरुस्ती करुन भारताला पाठविल्या असं त्यांनी सांगितले. 

तसेच दारुगोळाची गरज असताना भारताने अन्य एका देशाची संपर्क साधला असता त्यांनी १९७० च्या दशकातील दारुगोळा भारताला दिला होता. त्याचसोबत सॅटेलाइट फोटोसाठी भारताला प्रत्येकी ३६ हजार रुपये द्यावे लागले होते. इतके पैसे देऊनही भारताला ३ वर्ष जुने सॅटेलाइट फोटो देण्यात आले होते असा खुलासा जनरल व्ही.पी. मलिक यांनी केला आहे. 

टॅग्स :Indiaभारतwarयुद्धIndian Armyभारतीय जवान