शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांबद्दल दया वाटणाऱ्या शाहिद आफ्रिदीची गौतम गंभीरनं अक्कल काढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 12:35 IST

भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरनं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. 

नवी दिल्ली -  भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरनं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत खात्मा करण्यात आलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत शाहिदनं सहानुभूती व्यक्त केल्याबाबत गंभीरनं त्याची चांगलीच अक्कल काढली आहे. 

'काश्मीरची परिस्थिती ही अस्वस्थ, चिंता करणारी आहे',असे ट्विट आफ्रिदीनं केले होते.  यावर गौतम गंभीर म्हणाला की, शाहिद आफ्रिदीच्या ट्विटसंदर्भात मीडियानं माझी प्रतिक्रिया मागितली. यावर काय बोलणार. शाहिद आफ्रिदीने 'यूएन'वर नजरा लावल्या आहेत. मात्र त्याच्या डिक्शनरीत 'यूएन'चा अर्थ अंडर 19 असा आहे आणि हे त्याचे वयही आहे. मीडियाने त्याच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. नो बॉलवर विकेट घेण्याचा आनंद घेण्याची पाकिस्तानी खेळाडूंची सवयच आहे.''

 

 

शाहिद आफ्रिदीनं नेमके काय केले ट्विट?जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने कंठस्नान घातलेल्या अतिरेक्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला. लष्कराकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात त्याने गरळ ओकली. शाहिद आफ्रिदीने याबाबत ट्विट करत काश्मीरमधील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रसह आतंरराष्ट्रीय संघटनेच्याबाततीत सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत.    'भारत व्याप्त काश्मीर (जम्मू काश्मीर) येथील परिस्थिती चिंताजनक आहे. याठिकाणी स्वातंत्र्य आणि स्वत:च्या निर्णयावर बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा आवाज दडपशाहीने दाबला जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना का पुढाकार घेत नाहीत? हा रक्तपात थांबविण्यासाठी त्या का प्रयत्न करत नाहीत?'' असे शाहिदीनं ट्विटमध्ये म्हटले. शाहिद आफ्रिदीने हा पहिल्यांदाच काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला नाही. याआधी म्हणजेच गेल्यावर्षी त्याने याबाबतीत ट्विट केले होते. त्यावेळी त्याने म्हटले होते, काश्मीरमध्ये गेल्या काही दशकांपासून क्रूरतेचे शिकार होत आहेत. आता वेळ आली आहे की या समस्येचे निराकरण केले पाहिजे, ज्यामुळे अनेक लोक मारले गेले. तसचे, दुस-या ट्विटमध्ये काश्मीर धरतीवरील स्वर्ग आहे आणि आम्ही निरपराधांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. 

13 दहशतवाद्यांचा खात्मादरम्यान, सोमवारी दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी दहशतवाद्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत 13 दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात सक्रिय दहशतवाद्यांविरुद्ध हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा प्रतिहल्ला आहे. सुरक्षा दलाने केलेल्या या हल्ल्याने हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांना मोठा झटका बसला आहे.

टॅग्स :Shahid Afridiशाहिद अफ्रिदीGautam Gambhirगौतम गंभीरJammu Kashmirजम्मू-काश्मीर