शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो' यात्रेत गौरी लंकेश यांच्या मातोश्री आणि बहीणीचा सहभाग, राहुल गांधी झाले भावूक; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 20:14 IST

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या कर्नाटकात आहे. शुक्रवारी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या आई आणि बहीण या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या कर्नाटकात आहे. शुक्रवारी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या आई आणि बहीण या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. दोघांनी राहुल गांधींसोबत पदयात्रा केली. गौरी लंकेश यांच्या आई इंदिरा लंकेश आणि बहीण कविता लंकेश यांनी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर यात्रेत काही अंतर चालल्या देखील. राहुल गांधी यांनी इंदिरा लंकेश यांची गळाभेट घेत यात्रेत स्वागत केलं. पदयात्रेदरम्यान राहुल गांधी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या मातोश्रींचा हात धरुन चालताना दिसले.

गौरी लंकेश यांचे कुटुंबीय 'भारत जोडो यात्रे'त सामील झाले तेव्हा राहुल गांधी भावूक झाले. या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे. 'गौरी सत्याच्या बाजूने उभी राहिली. गौरी हिंमत करून उभी राहिली. गौरी स्वातंत्र्यासाठी उभी राहिली. मी गौरी लंकेश आणि त्यांच्यासारख्या असंख्य लोकांसाठी उभा आहे, जे भारताच्या खऱ्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात. भारत जोडो यात्रा हा त्यांचा आवाज आहे आणि तो कधीच शांत करता येणार नाही", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

घाबरणार नाही, झुकणार नाही आणि थांबणार नाहीकाँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर यासंबंधीचा एक फोटो शेअर केला आहे. "दिवंगत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांचे कुटुंब भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत आले होते. गौरी लंकेश यांचा धाडसी आणि निर्भीड आवाज द्वेष आणि हिंसाचाराच्या प्रतिनिधींनी दाबला होता. देशात पसरलेल्या या द्वेषाच्या विरोधात ही यात्रा सुरु आहे. आता आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, थांबणार नाही", असं काँग्रेसनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री राजराजेश्वरी नगर, बेंगळुरू येथील त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

एका देशात दोन ''भारत'' मान्य नाहीउद्योगपतींची कर्जमाफी आणि शेतकरी आत्महत्यांशी संबंधित मुद्दे उपस्थित करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'दोन भारत' एका देशात मान्य नाही, असं ट्विट राहुल यांनी केलं. 'काल मी एका महिलेला भेटलो, तिच्या शेतकरी पतीने 50,000 रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्या केली. एक भारत, भांडवलदार मित्रांना ६ टक्के व्याजाने कर्ज आणि कोटींची कर्जमाफी. दुसरा भारत, अन्नदात्यांचे २४ टक्के व्याजावर कर्ज आणि संकटांनी भरलेले जीवन", असं ट्विट राहुल यांनी केलं होतं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस