शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो' यात्रेत गौरी लंकेश यांच्या मातोश्री आणि बहीणीचा सहभाग, राहुल गांधी झाले भावूक; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 20:14 IST

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या कर्नाटकात आहे. शुक्रवारी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या आई आणि बहीण या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या कर्नाटकात आहे. शुक्रवारी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या आई आणि बहीण या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. दोघांनी राहुल गांधींसोबत पदयात्रा केली. गौरी लंकेश यांच्या आई इंदिरा लंकेश आणि बहीण कविता लंकेश यांनी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर यात्रेत काही अंतर चालल्या देखील. राहुल गांधी यांनी इंदिरा लंकेश यांची गळाभेट घेत यात्रेत स्वागत केलं. पदयात्रेदरम्यान राहुल गांधी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या मातोश्रींचा हात धरुन चालताना दिसले.

गौरी लंकेश यांचे कुटुंबीय 'भारत जोडो यात्रे'त सामील झाले तेव्हा राहुल गांधी भावूक झाले. या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे. 'गौरी सत्याच्या बाजूने उभी राहिली. गौरी हिंमत करून उभी राहिली. गौरी स्वातंत्र्यासाठी उभी राहिली. मी गौरी लंकेश आणि त्यांच्यासारख्या असंख्य लोकांसाठी उभा आहे, जे भारताच्या खऱ्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात. भारत जोडो यात्रा हा त्यांचा आवाज आहे आणि तो कधीच शांत करता येणार नाही", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

घाबरणार नाही, झुकणार नाही आणि थांबणार नाहीकाँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर यासंबंधीचा एक फोटो शेअर केला आहे. "दिवंगत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांचे कुटुंब भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत आले होते. गौरी लंकेश यांचा धाडसी आणि निर्भीड आवाज द्वेष आणि हिंसाचाराच्या प्रतिनिधींनी दाबला होता. देशात पसरलेल्या या द्वेषाच्या विरोधात ही यात्रा सुरु आहे. आता आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, थांबणार नाही", असं काँग्रेसनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री राजराजेश्वरी नगर, बेंगळुरू येथील त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

एका देशात दोन ''भारत'' मान्य नाहीउद्योगपतींची कर्जमाफी आणि शेतकरी आत्महत्यांशी संबंधित मुद्दे उपस्थित करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'दोन भारत' एका देशात मान्य नाही, असं ट्विट राहुल यांनी केलं. 'काल मी एका महिलेला भेटलो, तिच्या शेतकरी पतीने 50,000 रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्या केली. एक भारत, भांडवलदार मित्रांना ६ टक्के व्याजाने कर्ज आणि कोटींची कर्जमाफी. दुसरा भारत, अन्नदात्यांचे २४ टक्के व्याजावर कर्ज आणि संकटांनी भरलेले जीवन", असं ट्विट राहुल यांनी केलं होतं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस