शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

‘वायू’ ने पुन्हा बदलला मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 03:33 IST

सौराष्ट्र, कच्छ भागात पुन्हा अलर्ट जारी

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळाने वारंवार आपला मार्ग बदलल्याने हवामान विभागासह प्रशासनाला बुचकळ्यात टाकले असून शनिवारी त्याने आपला मार्ग पुन्हा बदलून कच्छ दिशेने सरकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सौराष्ट्र, कच्छ भागात पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.कर्नाटकाच्या दक्षिण भागात आगमन झालेल्या मान्सूनची शनिवारी प्रगती झाली नाही़ येत्या दोन दिवसात कर्नाटक, तमिळनाडूचा उर्वरित भाग तसेच ईशान्यकडील बंगालचा उपसागर, सिक्कीममध्ये आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ हे गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार असे जाहीर करण्यात आले होते़ त्यादृष्टीने हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुजरात राज्य सरकारने खबरदारीच्या उपाय योजना केल्या होत्या़ त्यानंतर गुरुवारी ‘वायू’ने आपला मार्ग बदलून तो पुन्हा समुद्राच्या दिशेने वळला होता़ त्यामुळे ‘वायू’ आता समुद्रातच शमणार, ते गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले़ त्यानंतर शनिवारी पहाटे पुन्हा एकदा त्याने आपला मार्ग बदलून ते आता कच्छ दिशेने पुढे सरकू लागले आहे़ शनिवारी दुपारी ते पोरबंदरपासून ३२५ किमी, वेरावळपासून ३८० किमी आणि दीवपासून ४३५ किमी अंतरावर होते.येत्या २४ तासात या चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून तीव्र चक्रीवादळाचे चक्रीवादळात रुपांतर होईल़ १७ जूनला त्याची तीव्रता आणखी कमी होऊन सायंकाळी ते गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़ सौराष्ट्र, कच्छ भागात पुढील तीन दिवस तर उत्तर गुजरात, दक्षिण राजस्थानमध्ये १८ जूनला मुसळधार पावसाची शक्यता आहे़मुंबईत मान्सूनची प्रतीक्षाचमुंबई : अरबी समुद्रात पश्चिम दिशेला सरकलेल्या वायू चक्रीवादळाची दिशा बदल्यामुळे मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचलेल्या पावसाला कोकणात येण्यास आणखी विलंब होणार आहे. परिणामी, शहरात गेले दोन दिवस अधूनमधून हलक्या सरी सुरू असल्या, तरी मुंबईला आणखी काही दिवस मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.या वर्षी मान्सून विलंबानेच केरळमध्ये पोहोचला आहे. त्यातच अरबी समुद्रात वायू चक्रीवादळ धडकले. त्यामुळे गेले काही दिवस मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. या वादळाचा प्रभाव पुढील दोन दिवसही राज्यातील किनारपट्टींवर कायम असणार आहे. त्यामुळे मुंबईत ढगाळ वातावरण व हलक्या सरी सुरू राहतील. मात्र, मान्सूनचे मुंबईतील आगमन पुढच्या आठवड्यापर्यंत लांबणीवर पडले आहे.