शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:21 IST

बोगस डॉक्टर आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला.

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील अमलीपाडा सामुदायिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या धनौरा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बोगस डॉक्टर आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

धनौरा येथील रहिवासी डमरुधर नागेश आपल्या कुटुंबासह उदंती अभयारण्यात असलेल्या साहेबीनकछार येथील आपल्या सासरच्या घरी मका कापणीसाठी गेला होता. आठवडाभर तिथे राहिल्यादरम्यान, त्यांच्या तीन मुलांची प्रकृती अचानक बिघडली. मुलांना ताप आल्यावर डमरुधरने स्थानिक बोगस डॉक्टरकडे मुलांना नेलं आणि उपचार केले.

परिस्थिती बिकट होत असल्याचं पाहून कुटुंब गावी परतलं, परंतु रुग्णालयात जाण्याऐवजी त्यांनी जादूटोण्यावर विश्वास ठेवला. गावकऱ्यांना मुलांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, परंतु कुटुंबाने त्याकडे दुर्लक्ष केलं. याचे परिणाम भयानक होते. ११ नोव्हेंबर रोजी ८ वर्षीय अनिता हिचा सर्वात आधी मृत्यू झाला. १३ नोव्हेंबर रोजी ७ वर्षीय मुलाचाही मृत्यू झाला आणि काही तासांनंतर त्याच दिवशी ४ वर्षीय गोरेश्वरचाही मृत्यू झाला.

तीन मुलांच्या सलग मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे आणि लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. या आजाराबद्दल गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यू. एस. नवरत्न यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सदस्यीय तपास पथक स्थापन केलं आहे. पथक गावात पोहोचले आहे आणि मृत्यूचे कारण शोधत आहे.

अधिकाऱ्यांन दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील आरोग्य सुविधा अत्यंत खराब आहेत, त्यामुळे गावकऱ्यांना बोगस डॉक्टर आणि पारंपारिक उपचारांवर अवलंबून राहावं लागत आहे. या गावात यापूर्वी जादूटोण्यामुळे लोकांचा मृत्यू झाला. जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, रायपूर येथील एक विशेष पथक गावाला भेट देऊन सविस्तर चौकशी करेल. आधुनिक औषधांवर लोकांचा विश्वास वाढविण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आरोग्य विभाग या आदिवासीबहुल भागात जनजागृती कार्यक्रम सुरू करण्याची तयारी करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bogus Doctor, Superstition Claim Lives of Three Children in Chhattisgarh

Web Summary : In Chhattisgarh, three children died after a family trusted a fake doctor and witchcraft for fever treatment instead of seeking proper medical care. The tragedy highlights the dire state of healthcare and reliance on superstition in remote areas, prompting a health department investigation and awareness campaign.
टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडdoctorडॉक्टर