शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गरजू झाले माळी अन् चाैकीदार; वर्षभरात देशात १.७६ कोटी रोजगार मिळाल्याचा खासगी संस्थेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:32 IST

देशात नोकऱ्या वाढल्याचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७-१८ नंतर सर्वाधिक असल्याचा दावा सीएमआयईने केला आहे. शेती आणि सेवा क्षेत्राने मिळून सर्वाधिक ३५ ते ४० टक्के नोकऱ्या दिल्या आहेत. उद्योगांनी दिलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. 

नवी दिल्ली : देशात निवडणुकीमुळे राजकीय पक्षांकडून नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले जात असतानाच बेरोजगारी घटल्याचे समोर आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात १.७६ कोटी लोकांच्या हातांना काम मिळाल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेच्या अहवालातून हे समोर आले. 

देशात नोकऱ्या वाढल्याचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७-१८ नंतर सर्वाधिक असल्याचा दावा सीएमआयईने केला आहे. शेती आणि सेवा क्षेत्राने मिळून सर्वाधिक ३५ ते ४० टक्के नोकऱ्या दिल्या आहेत. उद्योगांनी दिलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे.  प्रमाण ४.३ टक्क्यांनी वाढले२०२२-२३ या आर्थिक वर्षात देशात नोकरी करणाऱ्यांची एकूण संख्या ४०.५७ कोटी इतकी होती. तर, २०२३-२४ मध्ये हीच संख्या वाढून ४२.३३ कोटी इतकी झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. या वर्षभराच्या कालावधीत नव्या नोकऱ्यांचे प्रमाण जवळपास ४.३ टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. 

गैर-व्यावसायिक सेवांचा वाटा वाढला- सीएमआयईच्या आकडेवारीनुसार सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गैर-व्यावसायिक सेवांचा वाटा २०२२-२३ मध्ये १३.६ टक्के इतका होता.- २०२३-२४ मध्ये यात वाढ होऊन हे प्रमाण १८.१ टक्के इतके झाले आहे. २०२०-२१ मध्ये हे प्रमाण २०.२ टक्के इतके होते तर २०२२-२३ मध्ये यात घट होऊन १६.६ टक्के इतके झाले आहे.

कुणी दिल्या व कुणी घेतल्या कोणत्या नोकऱ्या? सेवा क्षेत्रातील तेजीमुळे रोजगारांच्या निर्मितीला बळ मिळाले आहे. सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये या काळात विक्रमी वाढ झाली. नोकऱ्यांमध्ये २०२२-२३ मध्ये सेवा क्षेत्राने ३६.६ टक्के रोजगार दिल्याचे दिसते. सेवा क्षेत्रातील ७० टक्के कर्मचारी पर्यटन, हॉटेल, किरकोळ विक्री व्यवसाय आणि बिगर व्यावसायिक सेवांमध्ये कार्यरत आहेत. 

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारी