शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गरजू झाले माळी अन् चाैकीदार; वर्षभरात देशात १.७६ कोटी रोजगार मिळाल्याचा खासगी संस्थेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:32 IST

देशात नोकऱ्या वाढल्याचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७-१८ नंतर सर्वाधिक असल्याचा दावा सीएमआयईने केला आहे. शेती आणि सेवा क्षेत्राने मिळून सर्वाधिक ३५ ते ४० टक्के नोकऱ्या दिल्या आहेत. उद्योगांनी दिलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. 

नवी दिल्ली : देशात निवडणुकीमुळे राजकीय पक्षांकडून नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले जात असतानाच बेरोजगारी घटल्याचे समोर आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात १.७६ कोटी लोकांच्या हातांना काम मिळाल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेच्या अहवालातून हे समोर आले. 

देशात नोकऱ्या वाढल्याचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७-१८ नंतर सर्वाधिक असल्याचा दावा सीएमआयईने केला आहे. शेती आणि सेवा क्षेत्राने मिळून सर्वाधिक ३५ ते ४० टक्के नोकऱ्या दिल्या आहेत. उद्योगांनी दिलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे.  प्रमाण ४.३ टक्क्यांनी वाढले२०२२-२३ या आर्थिक वर्षात देशात नोकरी करणाऱ्यांची एकूण संख्या ४०.५७ कोटी इतकी होती. तर, २०२३-२४ मध्ये हीच संख्या वाढून ४२.३३ कोटी इतकी झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. या वर्षभराच्या कालावधीत नव्या नोकऱ्यांचे प्रमाण जवळपास ४.३ टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. 

गैर-व्यावसायिक सेवांचा वाटा वाढला- सीएमआयईच्या आकडेवारीनुसार सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गैर-व्यावसायिक सेवांचा वाटा २०२२-२३ मध्ये १३.६ टक्के इतका होता.- २०२३-२४ मध्ये यात वाढ होऊन हे प्रमाण १८.१ टक्के इतके झाले आहे. २०२०-२१ मध्ये हे प्रमाण २०.२ टक्के इतके होते तर २०२२-२३ मध्ये यात घट होऊन १६.६ टक्के इतके झाले आहे.

कुणी दिल्या व कुणी घेतल्या कोणत्या नोकऱ्या? सेवा क्षेत्रातील तेजीमुळे रोजगारांच्या निर्मितीला बळ मिळाले आहे. सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये या काळात विक्रमी वाढ झाली. नोकऱ्यांमध्ये २०२२-२३ मध्ये सेवा क्षेत्राने ३६.६ टक्के रोजगार दिल्याचे दिसते. सेवा क्षेत्रातील ७० टक्के कर्मचारी पर्यटन, हॉटेल, किरकोळ विक्री व्यवसाय आणि बिगर व्यावसायिक सेवांमध्ये कार्यरत आहेत. 

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारी