शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

गरजू झाले माळी अन् चाैकीदार; वर्षभरात देशात १.७६ कोटी रोजगार मिळाल्याचा खासगी संस्थेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:32 IST

देशात नोकऱ्या वाढल्याचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७-१८ नंतर सर्वाधिक असल्याचा दावा सीएमआयईने केला आहे. शेती आणि सेवा क्षेत्राने मिळून सर्वाधिक ३५ ते ४० टक्के नोकऱ्या दिल्या आहेत. उद्योगांनी दिलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. 

नवी दिल्ली : देशात निवडणुकीमुळे राजकीय पक्षांकडून नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले जात असतानाच बेरोजगारी घटल्याचे समोर आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात १.७६ कोटी लोकांच्या हातांना काम मिळाल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेच्या अहवालातून हे समोर आले. 

देशात नोकऱ्या वाढल्याचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७-१८ नंतर सर्वाधिक असल्याचा दावा सीएमआयईने केला आहे. शेती आणि सेवा क्षेत्राने मिळून सर्वाधिक ३५ ते ४० टक्के नोकऱ्या दिल्या आहेत. उद्योगांनी दिलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे.  प्रमाण ४.३ टक्क्यांनी वाढले२०२२-२३ या आर्थिक वर्षात देशात नोकरी करणाऱ्यांची एकूण संख्या ४०.५७ कोटी इतकी होती. तर, २०२३-२४ मध्ये हीच संख्या वाढून ४२.३३ कोटी इतकी झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. या वर्षभराच्या कालावधीत नव्या नोकऱ्यांचे प्रमाण जवळपास ४.३ टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. 

गैर-व्यावसायिक सेवांचा वाटा वाढला- सीएमआयईच्या आकडेवारीनुसार सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गैर-व्यावसायिक सेवांचा वाटा २०२२-२३ मध्ये १३.६ टक्के इतका होता.- २०२३-२४ मध्ये यात वाढ होऊन हे प्रमाण १८.१ टक्के इतके झाले आहे. २०२०-२१ मध्ये हे प्रमाण २०.२ टक्के इतके होते तर २०२२-२३ मध्ये यात घट होऊन १६.६ टक्के इतके झाले आहे.

कुणी दिल्या व कुणी घेतल्या कोणत्या नोकऱ्या? सेवा क्षेत्रातील तेजीमुळे रोजगारांच्या निर्मितीला बळ मिळाले आहे. सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये या काळात विक्रमी वाढ झाली. नोकऱ्यांमध्ये २०२२-२३ मध्ये सेवा क्षेत्राने ३६.६ टक्के रोजगार दिल्याचे दिसते. सेवा क्षेत्रातील ७० टक्के कर्मचारी पर्यटन, हॉटेल, किरकोळ विक्री व्यवसाय आणि बिगर व्यावसायिक सेवांमध्ये कार्यरत आहेत. 

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारी