शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

गांधी घराण्याचा पक्षाध्यक्ष नकोच, राहुल गांधी ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 6:27 AM

लोकसभा निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून नवीन अध्यक्ष हा गांधी घराण्याशिवाय असावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शनिवारी राहुल यांचा राजीनामा एकमताने फेटाळून लावला असला तरी राहुल आपल्या निर्धारावर ठाम आहेत.कॉँग्रेसने निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली लढविल्या. त्यामुळे यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पदाचा राजीनामा देणे गरजेचे असल्याचे राहुल यांनी सांगितले. मला या जबाबदारीतून मुक्त करून गांधी घराण्याबाहेरील कोणाकडे तरी पक्षाची सूत्रे द्या, असे राहुल यांनी बैठकीत सांगितले. या वेळी कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी याचा निर्णय राहुल यांनीच घ्यावा, असे सांगितले.काँग्रेसच्या अपयशामागील कारणांची व राहुल गांधी यांनी सादर केलेला राजीनामा यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राहुल गांधी यांनी पदत्याग केल्यास काही सदस्यांनी प्रियांका गांधी यांचे नाव सुचवले. मात्र पुढील अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती असावी, असा आग्रह राहुल गांधी यांनी धरला. त्यानंतर पक्षाध्यक्ष पदासाठी ए. के. अ‍ॅन्टोनी, कॅप्टन अमरिंदरसिंग, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे यांची नावे चर्चेत आली.काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या तीन राज्यांतील मुख्यमंत्री बदलण्याबाबतही बैठकीत जोरदार चर्चा झाली. या राज्यांमध्ये कॉँग्रेसची सत्ता असतानाही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात येथील मुख्यमंत्री अपयशी ठरल्याची टीका सदस्यांनी केली. त्यामुळे अशोक गेहलोत, कमलनाथ, भूपेश बघेल यांचे भवितव्य धोक्यात आहे.बैठकीत कॉँग्रेस अध्यक्षांना संघटनेत बदल करण्याचे सर्वाधिकार बहाल करण्यात आले. त्याचबरोबर येत्या महिन्या-दोन महिन्यांत प्रदेशाध्यक्षांसह जिल्हाध्यक्षांमध्येही बदल होणार असल्याचे सूतोवाच या वेळी करण्यात आले. याशिवाय पक्षावर कब्जा केलेल्यांनाही बदलले जाणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या सोशल मीडियावरील प्रचारापेक्षा कॉँग्रेसचा प्रचार कमी पडत असल्याचे अनेक सदस्यांनी यावेळी सांगितले. कॉँग्रेसने या बाबीकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता अनेक सदस्यांनी बोलून दाखविली. भाजपचा मुकाबला करण्यासाठी पक्षाने सोशल मीडियावर अधिक सक्रिय होण्यावर अनेकांनी भर दिला.बैठकीमध्ये संसदेत आणि बाहेरही सरकारला कैचीत पकडण्यासाठी समविचारी पक्षांशी चर्चा करून धोरण निश्चित करण्याची गरज अनेक सदस्यांनी व्यक्त केली. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षाच्या मूलभूत रचनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे सारे अधिकार पक्षाध्यक्षांना कार्यकारिणीने दिले आहेत. लोकसभा निवडणुकांत जनतेने दिलेला कौल काँग्रेसने विनम्रतेने स्वीकारला आहे. काँग्रेसला मत देणाऱ्या मतदारांचे पक्षाने आभार मानले आहेत. यापुढेही काँग्रेस जबाबदार व सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका निभावत राहील, असेही त्यांनी सांगितले.>लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे. मला या जबाबदारीतून मुक्त करून गांधी घराण्याबाहेरील कोणाकडे तरी पक्षाची सूत्रे द्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस