शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गांधी, नेहरू, आंबेडकर अनिवासी भारतीय होते, काँग्रेस ही NRI ची चळवळ - राहूल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 16:26 IST

काँग्रेस हा पक्ष अनिवासी भारतीयांच्या चळवळीतून जन्माला आला असून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे एनआरआय किंवा अनिवासी भारतीय होते असे उद्गार राहूल गांधी यांनी अमेरिकेत काढले आहेत

ठळक मुद्देया थोर नेत्यांपैकी प्रत्येकजण जग फिरले, त्यांनी जगाचा अनुभव घेतला आणि ते भारतात परत आलेतुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाहीहजारो अनिवासी भारतीयांनी या देशासाठी योगदान दिले आहे परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही

नवी दिल्ली - काँग्रेस हा पक्ष अनिवासी भारतीयांच्या चळवळीतून जन्माला आला असून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे एनआरआय किंवा अनिवासी भारतीय होते असे उद्गार राहूल गांधी यांनी अमेरिकेत काढले आहेत. मूळातली काँग्रेसची चळवळ ही अनिवासी भारतीयांनी केली होती असे ते म्हणाले.

न्यू यॉर्कमध्ये काँग्रेस पक्षाच्या अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी बोलत होते. सध्या ते दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या थोर नेत्यांपैकी प्रत्येकजण जग फिरले, त्यांनी जगाचा अनुभव घेतला आणि ते भारतात परत आले आणि बाहेरच्या जगातून शिकलेल्या कल्पनांमधून त्यांनी भारतात परीवर्तन घडवलं असे गांधी म्हणाले.

अशा हजारो अनिवासी भारतीयांनी या देशासाठी योगदान दिले आहे परंतु त्यांची दखल घेतली गेली नसल्याचे ते म्हणाले. श्वेत क्रांतीच्या वर्गिस कुरीयन यांचा दाखला देत ते ही अनिवासी भारतीय होते असा दाखला त्यांनी दिला. भारतातल्या सगळ्यात मोठ्या यशापैकी दुग्ध क्रांती एक आहे जी कुरीयन या एनआरआयनं घडवली आहे असं ते म्हणाले. कुरीयन अमेरिकेतून आले आणि त्यांनी क्रांती केल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाही असे सांगत असे एनआरआय तर देशाच्या पाठिचा कणा असल्याचे प्रशंसोद्गार राहूल यांनी काढले. अमेरिकेमध्ये असं बघायला मिळतं, की सगळीकडे भारतीय काम करतात. ते अमेरिकेसाठीही काम करतात आणि भारतासाठीही काम करतात. ते अमेरिकेलाही मोठं करतात आणि भारतालाही मोठं करतात. काही जणं भारताला भौगोलिकदृष्ट्या बघतं, परंतु मी भारताला कल्पनांचा संच या दृष्टीने बघतो असं ते म्हणाले. जो कुणी भारतासाठी चांगल्या कल्पना अमलात आणतो तो भारतीय असं त्यांनी सांगितलं.

भाजपाचा उल्लेख न करता, राहूल म्हणाले सगळीकडे लोकं मला विचारतात की भारत सहिष्णू म्हणून ओळखला जायचा आता ती ओळख कुठे आहे? भारतातल्या एकोप्याचं काय झालं? असं विचारत भारतामध्ये दुहीचं राजकारण सुरू असल्याचे राहूल म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस