शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

गांधी, नेहरू, आंबेडकर अनिवासी भारतीय होते, काँग्रेस ही NRI ची चळवळ - राहूल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 16:26 IST

काँग्रेस हा पक्ष अनिवासी भारतीयांच्या चळवळीतून जन्माला आला असून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे एनआरआय किंवा अनिवासी भारतीय होते असे उद्गार राहूल गांधी यांनी अमेरिकेत काढले आहेत

ठळक मुद्देया थोर नेत्यांपैकी प्रत्येकजण जग फिरले, त्यांनी जगाचा अनुभव घेतला आणि ते भारतात परत आलेतुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाहीहजारो अनिवासी भारतीयांनी या देशासाठी योगदान दिले आहे परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही

नवी दिल्ली - काँग्रेस हा पक्ष अनिवासी भारतीयांच्या चळवळीतून जन्माला आला असून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे एनआरआय किंवा अनिवासी भारतीय होते असे उद्गार राहूल गांधी यांनी अमेरिकेत काढले आहेत. मूळातली काँग्रेसची चळवळ ही अनिवासी भारतीयांनी केली होती असे ते म्हणाले.

न्यू यॉर्कमध्ये काँग्रेस पक्षाच्या अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी बोलत होते. सध्या ते दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या थोर नेत्यांपैकी प्रत्येकजण जग फिरले, त्यांनी जगाचा अनुभव घेतला आणि ते भारतात परत आले आणि बाहेरच्या जगातून शिकलेल्या कल्पनांमधून त्यांनी भारतात परीवर्तन घडवलं असे गांधी म्हणाले.

अशा हजारो अनिवासी भारतीयांनी या देशासाठी योगदान दिले आहे परंतु त्यांची दखल घेतली गेली नसल्याचे ते म्हणाले. श्वेत क्रांतीच्या वर्गिस कुरीयन यांचा दाखला देत ते ही अनिवासी भारतीय होते असा दाखला त्यांनी दिला. भारतातल्या सगळ्यात मोठ्या यशापैकी दुग्ध क्रांती एक आहे जी कुरीयन या एनआरआयनं घडवली आहे असं ते म्हणाले. कुरीयन अमेरिकेतून आले आणि त्यांनी क्रांती केल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाही असे सांगत असे एनआरआय तर देशाच्या पाठिचा कणा असल्याचे प्रशंसोद्गार राहूल यांनी काढले. अमेरिकेमध्ये असं बघायला मिळतं, की सगळीकडे भारतीय काम करतात. ते अमेरिकेसाठीही काम करतात आणि भारतासाठीही काम करतात. ते अमेरिकेलाही मोठं करतात आणि भारतालाही मोठं करतात. काही जणं भारताला भौगोलिकदृष्ट्या बघतं, परंतु मी भारताला कल्पनांचा संच या दृष्टीने बघतो असं ते म्हणाले. जो कुणी भारतासाठी चांगल्या कल्पना अमलात आणतो तो भारतीय असं त्यांनी सांगितलं.

भाजपाचा उल्लेख न करता, राहूल म्हणाले सगळीकडे लोकं मला विचारतात की भारत सहिष्णू म्हणून ओळखला जायचा आता ती ओळख कुठे आहे? भारतातल्या एकोप्याचं काय झालं? असं विचारत भारतामध्ये दुहीचं राजकारण सुरू असल्याचे राहूल म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस