शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

गांधी, नेहरू, आंबेडकर अनिवासी भारतीय होते, काँग्रेस ही NRI ची चळवळ - राहूल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 16:26 IST

काँग्रेस हा पक्ष अनिवासी भारतीयांच्या चळवळीतून जन्माला आला असून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे एनआरआय किंवा अनिवासी भारतीय होते असे उद्गार राहूल गांधी यांनी अमेरिकेत काढले आहेत

ठळक मुद्देया थोर नेत्यांपैकी प्रत्येकजण जग फिरले, त्यांनी जगाचा अनुभव घेतला आणि ते भारतात परत आलेतुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाहीहजारो अनिवासी भारतीयांनी या देशासाठी योगदान दिले आहे परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही

नवी दिल्ली - काँग्रेस हा पक्ष अनिवासी भारतीयांच्या चळवळीतून जन्माला आला असून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे एनआरआय किंवा अनिवासी भारतीय होते असे उद्गार राहूल गांधी यांनी अमेरिकेत काढले आहेत. मूळातली काँग्रेसची चळवळ ही अनिवासी भारतीयांनी केली होती असे ते म्हणाले.

न्यू यॉर्कमध्ये काँग्रेस पक्षाच्या अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी बोलत होते. सध्या ते दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या थोर नेत्यांपैकी प्रत्येकजण जग फिरले, त्यांनी जगाचा अनुभव घेतला आणि ते भारतात परत आले आणि बाहेरच्या जगातून शिकलेल्या कल्पनांमधून त्यांनी भारतात परीवर्तन घडवलं असे गांधी म्हणाले.

अशा हजारो अनिवासी भारतीयांनी या देशासाठी योगदान दिले आहे परंतु त्यांची दखल घेतली गेली नसल्याचे ते म्हणाले. श्वेत क्रांतीच्या वर्गिस कुरीयन यांचा दाखला देत ते ही अनिवासी भारतीय होते असा दाखला त्यांनी दिला. भारतातल्या सगळ्यात मोठ्या यशापैकी दुग्ध क्रांती एक आहे जी कुरीयन या एनआरआयनं घडवली आहे असं ते म्हणाले. कुरीयन अमेरिकेतून आले आणि त्यांनी क्रांती केल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाही असे सांगत असे एनआरआय तर देशाच्या पाठिचा कणा असल्याचे प्रशंसोद्गार राहूल यांनी काढले. अमेरिकेमध्ये असं बघायला मिळतं, की सगळीकडे भारतीय काम करतात. ते अमेरिकेसाठीही काम करतात आणि भारतासाठीही काम करतात. ते अमेरिकेलाही मोठं करतात आणि भारतालाही मोठं करतात. काही जणं भारताला भौगोलिकदृष्ट्या बघतं, परंतु मी भारताला कल्पनांचा संच या दृष्टीने बघतो असं ते म्हणाले. जो कुणी भारतासाठी चांगल्या कल्पना अमलात आणतो तो भारतीय असं त्यांनी सांगितलं.

भाजपाचा उल्लेख न करता, राहूल म्हणाले सगळीकडे लोकं मला विचारतात की भारत सहिष्णू म्हणून ओळखला जायचा आता ती ओळख कुठे आहे? भारतातल्या एकोप्याचं काय झालं? असं विचारत भारतामध्ये दुहीचं राजकारण सुरू असल्याचे राहूल म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस