शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

स्वपक्षातील गांधी कुटुंबही मोदींकडून दुर्लक्षीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 16:49 IST

भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या मनेका गांधी यांच्याकडे २०१४ मधील मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी होती. यावेळी मात्र त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर त्यांचे चिरंजीव वरुण गांधी यांना देखील कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत गांधी घरण्यावर टीका करताना दिसले. एवढच काय, अनेक सभांमध्ये मोदींनी गांधी घरणाऱ्याला आणि काँग्रेसला देशातून हद्दपार करा, असे आवाहन केले होते. त्यात मोदींना काही प्रमाणात यशही आले. सलग दुसऱ्यांदा मोदींनी एनडीएला विजय मिळवून देत काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेतेपदासाठी झुरण्यास भाग पाडले. परंतु, विरोधातील गांधी घराण्यावरील राग मोदी स्वपक्षातील गांधी घराण्यावरही काढत आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

सलग दुसऱ्यांदा दारुण पराभव झाल्यामुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. या पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी घेतली असून पक्षाकडे पदाचा राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. या घडामोडींमुळे राजकारणातील गांधी घराण्याचे वर्चस्व कमी करण्याचा मानस मोदींचा काही प्रमाणात यशस्वी झाला, अस म्हणायला हरकत नाहीत. मात्र मोदींच्या धोरणापुढे स्वपक्षातील गांधी घराणं दुर्लक्षीत झालं आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या मनेका गांधी यांच्याकडे २०१४ मधील मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी होती. यावेळी मात्र त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर त्यांचे चिरंजीव वरुण गांधी यांना देखील कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. याउलट लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी आणि मनेका गांधी यांच्या मतदार संघांची अदलाबदली करण्यात आली होती.

दरम्यान वरुण गांधी आणि मनेका गांधी यांच्यापैकी कुणालाही मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधातील गांधी घराण्यासह स्वपक्षातील गांधी घराण्यावर सपशेल फुली मारली का, असा प्रश्न मनेका गांधी यांच्या समर्थकांना पडला आहे.