शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

स्वपक्षातील गांधी कुटुंबही मोदींकडून दुर्लक्षीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 16:49 IST

भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या मनेका गांधी यांच्याकडे २०१४ मधील मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी होती. यावेळी मात्र त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर त्यांचे चिरंजीव वरुण गांधी यांना देखील कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत गांधी घरण्यावर टीका करताना दिसले. एवढच काय, अनेक सभांमध्ये मोदींनी गांधी घरणाऱ्याला आणि काँग्रेसला देशातून हद्दपार करा, असे आवाहन केले होते. त्यात मोदींना काही प्रमाणात यशही आले. सलग दुसऱ्यांदा मोदींनी एनडीएला विजय मिळवून देत काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेतेपदासाठी झुरण्यास भाग पाडले. परंतु, विरोधातील गांधी घराण्यावरील राग मोदी स्वपक्षातील गांधी घराण्यावरही काढत आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

सलग दुसऱ्यांदा दारुण पराभव झाल्यामुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. या पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी घेतली असून पक्षाकडे पदाचा राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. या घडामोडींमुळे राजकारणातील गांधी घराण्याचे वर्चस्व कमी करण्याचा मानस मोदींचा काही प्रमाणात यशस्वी झाला, अस म्हणायला हरकत नाहीत. मात्र मोदींच्या धोरणापुढे स्वपक्षातील गांधी घराणं दुर्लक्षीत झालं आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या मनेका गांधी यांच्याकडे २०१४ मधील मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी होती. यावेळी मात्र त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर त्यांचे चिरंजीव वरुण गांधी यांना देखील कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. याउलट लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी आणि मनेका गांधी यांच्या मतदार संघांची अदलाबदली करण्यात आली होती.

दरम्यान वरुण गांधी आणि मनेका गांधी यांच्यापैकी कुणालाही मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधातील गांधी घराण्यासह स्वपक्षातील गांधी घराण्यावर सपशेल फुली मारली का, असा प्रश्न मनेका गांधी यांच्या समर्थकांना पडला आहे.