शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं"; आर्किटेक्टच्या लेकीने फोडला टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:07 IST

जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आर्किटेक्ट शशी भूषण अबरोल यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, पत्नीने करवाचौथचा उपवास ठेवला होता आणि ती व्हिडीओ कॉल करत होती, मात्र शशी यांनी फोन उचलला नाही. याच दरम्यान ५-६ वर्षांची मुलगी आजतकवर रडत म्हणाली की, "दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं."

टनलमध्ये आर्किटेक्ट/डिझाईनर म्हणून काम करणाऱ्या शशी यांची मुलगी म्हणाली, "जेव्हा आई पूजेसाठी तयार होत होती, तेव्हा माझं पप्पांसोबत थोडा वेळ बोलणं झालं. तू काय करतेस असं त्यांनी मला विचारलं. तेव्ही मी बोलले काही नाही, मग मी फोन आईच्या हातात दिला." हे सांगताना मुलगी आईला प्लीज रडू नकोस असं सांगत होती. यावेळी "दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं" असं मुलीने रडत रडत म्हटलं.

पत्नीने सांगितलं की, "काल सहा वाजता त्यांच्याशी बोलणं झालं होतं. व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर मी पुन्हा व्हिडीओ कॉल करेन, असं त्यांना सांगितलं. मग मी रात्रभर फोन करत राहिले, पण त्यांनी फोन उचललाच नाही. दहशतवाद्यांनी सर्वांची घरं उद्ध्वस्त केली. आमचं आता कोणीही नाही."

शशी यांच्या वडिलांनी सरकारकडे मागणी केली की, शशी भूषण यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळावी कारण आता घरात कमावणारं कोणीच नाही. मुलं काय खातील?. शशी यांच्या एका मित्राने ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांनी ७ वर्षे काम केलं, आर्किटेक्ट आहेत. सरकारी मदतीबाबत ते म्हणाले की, आतापर्यंत कोणीही आलेलं नाही. शशी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला