शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

No Confidence Motion : 'अाँखो का खेल आज पुरे देशने देखा'; मोदींचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 22:39 IST

तुमच्या डोळ्यास मी डोळे कसे भिडवणार, मी एका गरिब आईच्या पोटी जन्माला आलो, मी कामगार आहे, तुम्ही नामदार आहात. तुमच्या डोळ्यांना डोळे भिडवण्याचे धाडस माझे नाही.

नवी दिल्ली : ''तुमच्या डोळ्यास मी डोळे कसे भिडवणार, मी एका गरिब आईच्या पोटी जन्माला आलो, मी कामगार आहे, तुम्ही नामदार आहात. तुमच्या डोळ्यांना डोळे भिडवण्याचे धाडस माझे नाही. काँग्रेसच्या नजरेला नजर मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे काय होते, हे आम्ही पाहिले आहे. आज डोळ्यांबाबत बोलताना जो डोळे मारण्याचा खेळ झाला तो सगळ्या देशाने पाहिला आहे'', असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  लोकसभेत राहुल गांधी यांच्या आज सभागृहातील कृतीचा समाचार घेतला. यावेळेस मोदी यांनी बोटांनी डोळे मिचकावण्याची कृती करुन दाखवल्यावर सर्व सभागृहात एकच हशा पिकला.

 

चीनच्या राजदुताला आधी भेट झाल्याचे टाळले नंतर बिचकत बिचकत स्विकारले हे अत्यंत चूक आहे, प्रत्येक गोष्टीत बालिशपणा करण्याची गरज नाही असा पलटवार मोदींनी केला. काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकला जुमला स्ट्राईक म्हणणे कधीही सहन केले जाणार नाही. मला कितीही शिव्या द्या पण भारताच्या सैनिकांचा अपमान सहन करणार नाही असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. ज्या गोष्टीची माहिती नाही त्या विषयावर बोलल्यामुळे कधीकधी कधी देशाचं नुकसान होऊ शकतं. डोकलाम विषयावरती सर्व देश एकवटला असताना विरोधी पक्षाचे नेते चीनच्या राजदुताबरोबर चर्चा करत होते, असा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

 

राफेल खरेदीबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल यांना प्रत्युत्तर देण्याची संधी सोडली नाही. सत्य चिरडून टाकण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला अशी टीका पंतप्रधानांनी केली. राहुल यांच्या संसदेतील चुकीच्या आरोपावर फ्रान्स सरकारनेही स्पष्टीकरण दिले आहे. कौन कहता है, हमारे पास नंबर नही है या वाक्यातून अहंकार दिसतो, हमारे पास 272 लोग है असे म्हणणाऱ्या लोकांनी 1999 सालीही वाजपेयी यांच्या सरकारला एका मताने पराभूत केले होते. अशा शब्दांमध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली.

 

18 वर्षंपूर्वी पंतप्रधान वाजपेयी यांच्याकाळात झारखंड, छत्तिसगड, उत्तराखंड या तीन राज्यांची निर्मिती झाली. ही राज्ये अत्यंत उत्तम कारभार करत आहेत. मात्र संपुआ सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन करणारे विधेयक संमत करताना राज्यसभेचे दरवाजे बंद करुन जोरजबरजस्तीने विधेयक संमत केले. त्याचे परिणाम आजही आपल्याला भोगावे लागत आहेत. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलगू देसमच्या सदस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. रालोआ सरकार आंध्र प्रदेशातील लोकांच्या इच्छा-अपेक्षांचा सन्मान करत आली आहे. हे सरकार 14 व्या वित्त आयोगाच्या नियमांशी बांधिल असल्यामुळे स्पेशल दर्जाप्रमाणेच स्पेशल पॅकेज देण्यात आले. 4 नोव्हेंबर 2016 रोजी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हे पॅकेज स्वीकारून केंद्रीय अर्थमंत्र्यांना धन्यवाद दिले होते याचा पुनरुच्चारही केला. टीडीपीने आपल्या अपयशाला झाकण्यासाठी अविश्वास दर्शक ठरावाचा प्रयत्न केला आहे.

 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधी