शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोठी बातमी! पृथ्वीराज चव्हाणांकडे काँग्रेसनं सोपवली मोठी जबाबदारी, G-23 नेत्यांमध्ये होते सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 19:25 IST

चव्हाणही G-23 नेत्यांच्या यादीत आहेत. अशात चव्हाणांना स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवल्याने पक्षांतर्गत राजकारण तापण्याची शक्यता आहे.  

ठळक मुद्देकाँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवले आहे.चव्हाणही G-23 नेत्यांच्या यादीत आहेत. चव्हाणांना स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवल्याने पक्षांतर्गत राजकारण तापण्याची शक्यता आहे.

मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना काँग्रेसने मोठी जबाबदारी दिली आहे. काँग्रेसनेपृथ्वीराज चव्हाण यांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवले आहे. महत्वाचे म्हणजे चव्हाणही G-23 नेत्यांच्या यादीत आहेत. अशात चव्हाणांना स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवल्याने पक्षांतर्गत राजकारण तापण्याची शक्यता आहे.  (G23 congress member Prithviraj chavan appointed head of congress screening committee for assam polls)

आसाममध्ये निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. 27 मार्चला येथे मतदान होणार आहे. येथे एकूण तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. अशातच काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवले आहे. चव्हाणांसोबतच रिपून बोरा आणि जितेंद्र सिंह यांनाही मोठी जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे, G-23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रात चव्हानांनीही स्वाक्षरी केली होती. मात्र, गुलाम नबी आझादांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावेळी पृथ्वीराज चव्हाण दिसले नव्हते.

आसाममध्ये काँग्रसेच्या प्रचाराला सुरुवात, प्रियांका गांधींनी केला आदिवासी झूमर डान्स, पाहा VIDEO

चव्हाण यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवून, काँग्रेस एक प्रकारे G-23 नेत्यांना, पक्ष त्यांच्याकडे दूर्लक्ष करत नाही. असा संदेश देत असल्याची चर्चाही आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 126 सदस्य संख्या असलेल्या आसाम विधानसभेसाठी 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर अखेरच्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 6 एप्रिलला होईल. या निवडणुकीचा निकाल 2 मेरोजी लागणार आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 31 मेरोजी संपत आहे. अशात आसाममध्ये सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून प्रचार करत आहेत.

राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसचे जेष्ट नेते गुलाम नबी आझात सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. 27 फेब्रुवारीला गुलाम नबींच्या नेतृत्वात काँग्रेसचे G-23 म्हटले जाणारे नेतेही एकत्र आले होते. यांत कपिल सिब्बल, आनंद शर्मा आणि राज बब्बर यांच्यासारखे दिग्गज नेतेही होते. यावेळी काँग्रेस दुबळी झाली आहे, हे आपण स्वीकारायला हवे, असे सिब्बल यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.

गुलाम नबींच्या समर्थनार्थ एकवटले 'गांधी-23', सिब्बलांचा काँग्रेसला सल्ला; जाणून घ्या, कोण-कोण काय म्हणाले?

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसAssamआसामMaharashtraमहाराष्ट्र